शहरं
Join us  
Trending Stories
1
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
4
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
5
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
6
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
7
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
8
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
9
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
10
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
11
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
12
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
13
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
14
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
15
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
16
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
17
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
18
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
19
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
20
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना

बाधित रुग्णाच्या संपर्कातील २० जणांची चाचणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:55 IST

अहमदनगर : कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील किमान २० लोकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. ...

अहमदनगर : कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील किमान २० लोकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तापाची लक्षणे असलेल्यांची कोरोना चाचणी बंधनकारक असून, अशा रुग्णांना कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे पाठविण्याची खासगी डॉक्टरांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होते की नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर नियमांचे पालन केले जात नसेल तर कधीही लॉकडाऊन करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी विशेष आदेश जारी करून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचा आदेश दिला. जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त झाली असून, त्यावर तत्काळ नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

------------

सर्व कोविड केअर सेंटरची तपासणी करून ते उपचारासाठी सज्ज ठेवणे

कोविडबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २० व्यक्तींचा शोध घेणे

संपर्कातील सापडलेल्या सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करणे

खासगी डाॉक्टरांकडून नियमित माहिती घेणे

तापाची लक्षणे असलेल्या संशयितांची आरटीपीसीआर चाचणी करणे

दूध विक्रेते, फेरीवाले, दुकानदार आदी नियमांचे पालन करीत नसल्यास कारवाई करणे

रुग्णांची संख्या वाढणारा भाग कन्टोन्मेंट म्हणून घोषित करणे

शाळा, महाविद्यालयात नियमांचे पालन आवश्यक

गर्दीच्या ठिकाणी नियम न पाळल्यास थेट कारवाई

मास्क न वापरणाऱ्यांवर फिरत्या पथकांद्वारे दंडात्मक कारवाई

एस.टी., खासगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास कारवाई

हॉटेल, रेस्टाॅरंट्‌सना ५० टक्के क्षमतेइतके ग्राहक राहणार

--------------------

लग्नसमारंभात नियम न पाळल्यास कारवाई

सध्या लग्नसमारंभांना मोठी गर्दी आढळून येत आहे. एका मंगल कार्यालयात पाचशे ते एक हजारांपेक्षा जास्त लोक जमा होत आहेत. तसेच अशा गर्दीच्या ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभात एकाच वेळी ५० व्यक्ती राहणार नाहीत, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मंगल कार्यालयात मास्कचा वापर करताना आढळून न आल्यास त्याबाबत जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार आहे.

--------------

या नियमांचे पालन होणार

पाचपेक्षा जास्त लोकांची गर्दी दिसल्यास कारवाई

दुकानांची वेळ सकाळी ९ ते रात्री ९

रात्रीची संचारबंदी कायम

स्थानिक अधिकाऱ्यांच्या पथकांची नियुक्ती

------------