शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बाधित रुग्णाच्या संपर्कातील २० जणांची चाचणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:55 IST

अहमदनगर : कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील किमान २० लोकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. ...

अहमदनगर : कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील किमान २० लोकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तापाची लक्षणे असलेल्यांची कोरोना चाचणी बंधनकारक असून, अशा रुग्णांना कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे पाठविण्याची खासगी डॉक्टरांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होते की नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर नियमांचे पालन केले जात नसेल तर कधीही लॉकडाऊन करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी विशेष आदेश जारी करून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचा आदेश दिला. जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त झाली असून, त्यावर तत्काळ नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

------------

सर्व कोविड केअर सेंटरची तपासणी करून ते उपचारासाठी सज्ज ठेवणे

कोविडबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २० व्यक्तींचा शोध घेणे

संपर्कातील सापडलेल्या सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करणे

खासगी डाॉक्टरांकडून नियमित माहिती घेणे

तापाची लक्षणे असलेल्या संशयितांची आरटीपीसीआर चाचणी करणे

दूध विक्रेते, फेरीवाले, दुकानदार आदी नियमांचे पालन करीत नसल्यास कारवाई करणे

रुग्णांची संख्या वाढणारा भाग कन्टोन्मेंट म्हणून घोषित करणे

शाळा, महाविद्यालयात नियमांचे पालन आवश्यक

गर्दीच्या ठिकाणी नियम न पाळल्यास थेट कारवाई

मास्क न वापरणाऱ्यांवर फिरत्या पथकांद्वारे दंडात्मक कारवाई

एस.टी., खासगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास कारवाई

हॉटेल, रेस्टाॅरंट्‌सना ५० टक्के क्षमतेइतके ग्राहक राहणार

--------------------

लग्नसमारंभात नियम न पाळल्यास कारवाई

सध्या लग्नसमारंभांना मोठी गर्दी आढळून येत आहे. एका मंगल कार्यालयात पाचशे ते एक हजारांपेक्षा जास्त लोक जमा होत आहेत. तसेच अशा गर्दीच्या ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभात एकाच वेळी ५० व्यक्ती राहणार नाहीत, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मंगल कार्यालयात मास्कचा वापर करताना आढळून न आल्यास त्याबाबत जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार आहे.

--------------

या नियमांचे पालन होणार

पाचपेक्षा जास्त लोकांची गर्दी दिसल्यास कारवाई

दुकानांची वेळ सकाळी ९ ते रात्री ९

रात्रीची संचारबंदी कायम

स्थानिक अधिकाऱ्यांच्या पथकांची नियुक्ती

------------