शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

२००६ पूर्वीची ईव्हीएम होणार नष्ट : निवडणूक आयोगाचा आदेश

By चंद्रकांत शेळके | Updated: August 31, 2019 13:09 IST

सन २००६ पूर्वीची एम १ श्रेणीची सर्व मतदान यंत्रे नष्ट करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने संबंधित मतदान यंत्र कंपन्यांना दिले आहेत.

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : सन २००६ पूर्वीची एम १ श्रेणीची सर्व मतदान यंत्रे नष्ट करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने संबंधित मतदान यंत्र कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून गोडावूनमध्ये धूळखात पडलेल्या व सुरक्षेच्या कारणास्तव कोट्यवधींचा खर्च होणाऱ्या मतदान यंत्रांचा प्रश्न निकाली निघणार आहे.गेल्या पाच वर्षांपासून एम १ श्रेणीच्या मतदान यंत्रांचा वापर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने बंद केला होता. २०१५नंतर ही ईव्हीएम पुन्हा वापरलेली नाहीत. ही मशीन्स आकाराने मोठी आणि सतत नादुरूस्त होत होती. व्हीव्हीपॅट यंत्रे आल्यानंतर एम१ ईव्हीएम कालबाह्य झाली. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून ही यंत्रे देशात, राज्यात त्या त्या जिल्हा प्रशासनाकडे पडून आहेत. मोठमोठ्या इमारतीत ही यंत्रे ठेवलीअसून त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. या बंदोबस्तावर शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च होत आहेत. शिवाय शाळा, महामंडळांच्या इमारती यंत्रांसाठी अडकून पडल्या आहेत.अहमदनगरमध्ये एम१ श्रेणीची सुमारे आठ हजार यंत्रे असून ती केडगाव जिल्हा परिषद शाळेत गेल्या पाच वर्षांपासून पोलीस बंदोबस्तात आहेत. पुणे, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांकडे ही जुनी यंत्रे सर्वाधिक आहेत.आयोगाने गत १९ आॅगस्टला या यंत्रांच्या उत्पादित कंपन्यांना यंत्रे नष्ट करण्याचे आदेश दिले. बँगलोर येथील भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड व तेलंगणा येथील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आॅॅफ इंडिया लिमिटेड या कंपन्यांनी ही ईव्हीएम उत्पादित केलेली आहेत. केंद्र आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या विहित ई-कचरा विघटनाच्या नियमांनुसार या यंत्रांची विल्हेवाट लावायची आहे.संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही मशीन्स नष्ट करायची असून त्याचे व्हीडीओ चित्रीकरण निवडणूक आयोगाला पाठवायचे आहे, असे आदेशात म्हटले आहे.राज्यात सुमारे २ लाख ईव्हीएमराज्यात सुमारे २ लाख एम १ श्रेणीतील ईव्हीएम असण्याची शक्यता आहे. या सर्व मशिन्सच्या देखभालीसाठी गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रूपयांचा खर्च शासनाने केला. त्यासाठी हजारो पोलीस कर्मचारी अडकून पडले.अखेर पाच वर्षांनंतर आयोगाने ही यंत्रे नष्ट करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सर्वच जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय