शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतींना नाही स्वत:ची इमारत

By चंद्रकांत शेळके | Updated: July 18, 2023 23:01 IST

या ग्रामपंचायतींचा कारभार चक्क शाळेची इमारत, मंदिराच्या सभागृहातून किंवा समाज मंदिरातून चालतो.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना मोठे महत्व आहे. आजही वित्त आयोगाचा ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना मिळतो. म्हणजे ग्रामपंचायती या ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असतात. परंतु जिल्ह्यात १५७ ग्रामपंचायती अशा आहेत ज्यांना स्वत: चे कार्यालयच नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार चक्क शाळेची इमारत, मंदिराच्या सभागृहातून किंवा समाज मंदिरातून चालतो.

गावचा कारभार हा ग्रामपंचायतीमधून पाहिला जातो. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर ग्रामस्थांकडून वसूल केले जातात. तसेच शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीमार्फत राबविल्या जातात. अशा स्थितीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना बसायला कार्यालयच नसेल तर ती मोठी नामुष्की ठरते.

नगर जिल्ह्यात १३२० ग्रामपंचायतींपैकी ११६३ ग्रामपंचायतींकडे स्वमालकीचे कार्यालय आहे. तर १५७ ग्रामपंचायतीकडे स्वत: ची इमारत नसल्याने त्यांचा कारभार गावातील इतरत्र भागातील इमारतींमध्ये चालतो. १५७ ग्रामपंचायतींना स्वत: ची इमारतच नसल्याने गावातील विकासाची कामे रेंगाळली आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच गाव, वाड्या, तांड्यावर पायाभूत सुविधा पुरविल्या जातात. त्याचबरोबर गावातील विविध योजनेतील लाखो रुपयांची कामे ग्रामपंचायतीमार्फत राबविले जातात. या कामांची महत्त्वाची कागदपत्रे भाड्याच्या किंवा पर्यायी जागेत ठेवली जातात. त्यामुळे ही कागदपत्रे किती सुरक्षित राहत असतील? असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.इमारत नसलेल्या ग्रामपंचायती

अकोले २४संगमनेर १५कोपरगाव ६राहाता -श्रीरामपूर ४नेवासा १६शेवगाव १८पाथर्डी ३३नगर ४राहुरी ७पारनेर ७श्रीगोंदा ६कर्जत १०जामखेड ७एकूण १५७ग्रामसभा भरते चावडीवर

१५७ ग्रामपंचायतींना स्वत: ची इमारत नसल्याने त्यातील बहुतेक ग्रामपंचायतींच्या वर्षभरातील ग्रामसभा चावडीवर, ओट्यावर किंवा एखाद्या समाजमंदिरात भरण्याची वेळ आलेली आहे.ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी शासनाकडून निधी दिला जातो. दरवर्षी त्याचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. त्या उद्दिष्टाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. - समर्थ शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जि. प.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर