शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतींना नाही स्वत:ची इमारत

By चंद्रकांत शेळके | Updated: July 18, 2023 23:01 IST

या ग्रामपंचायतींचा कारभार चक्क शाळेची इमारत, मंदिराच्या सभागृहातून किंवा समाज मंदिरातून चालतो.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना मोठे महत्व आहे. आजही वित्त आयोगाचा ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना मिळतो. म्हणजे ग्रामपंचायती या ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असतात. परंतु जिल्ह्यात १५७ ग्रामपंचायती अशा आहेत ज्यांना स्वत: चे कार्यालयच नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभार चक्क शाळेची इमारत, मंदिराच्या सभागृहातून किंवा समाज मंदिरातून चालतो.

गावचा कारभार हा ग्रामपंचायतीमधून पाहिला जातो. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर ग्रामस्थांकडून वसूल केले जातात. तसेच शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीमार्फत राबविल्या जातात. अशा स्थितीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना बसायला कार्यालयच नसेल तर ती मोठी नामुष्की ठरते.

नगर जिल्ह्यात १३२० ग्रामपंचायतींपैकी ११६३ ग्रामपंचायतींकडे स्वमालकीचे कार्यालय आहे. तर १५७ ग्रामपंचायतीकडे स्वत: ची इमारत नसल्याने त्यांचा कारभार गावातील इतरत्र भागातील इमारतींमध्ये चालतो. १५७ ग्रामपंचायतींना स्वत: ची इमारतच नसल्याने गावातील विकासाची कामे रेंगाळली आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच गाव, वाड्या, तांड्यावर पायाभूत सुविधा पुरविल्या जातात. त्याचबरोबर गावातील विविध योजनेतील लाखो रुपयांची कामे ग्रामपंचायतीमार्फत राबविले जातात. या कामांची महत्त्वाची कागदपत्रे भाड्याच्या किंवा पर्यायी जागेत ठेवली जातात. त्यामुळे ही कागदपत्रे किती सुरक्षित राहत असतील? असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.इमारत नसलेल्या ग्रामपंचायती

अकोले २४संगमनेर १५कोपरगाव ६राहाता -श्रीरामपूर ४नेवासा १६शेवगाव १८पाथर्डी ३३नगर ४राहुरी ७पारनेर ७श्रीगोंदा ६कर्जत १०जामखेड ७एकूण १५७ग्रामसभा भरते चावडीवर

१५७ ग्रामपंचायतींना स्वत: ची इमारत नसल्याने त्यातील बहुतेक ग्रामपंचायतींच्या वर्षभरातील ग्रामसभा चावडीवर, ओट्यावर किंवा एखाद्या समाजमंदिरात भरण्याची वेळ आलेली आहे.ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी शासनाकडून निधी दिला जातो. दरवर्षी त्याचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. त्या उद्दिष्टाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. - समर्थ शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जि. प.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर