शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

१४४ जागा, अन्यथा स्वबळावर निवडणुका!

By admin | Updated: July 5, 2014 00:33 IST

अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर कार्यकर्त्यांनी २८८ जागा लढवण्याची तयारी ठेवावी, असा आदेश देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी

अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर कार्यकर्त्यांनी २८८ जागा लढवण्याची तयारी ठेवावी, असा आदेश देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘हिंमत असेल तर स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जा आणि जनतेचा कौल कोणाला आहे, हे जाणून घ्या’, असे आव्हान मित्रपक्ष काँग्रेससह भाजपा, सेना, मनसेला दिले आहे.जिल्हा राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात शुक्रवारी उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेस पेक्षा दुप्पट जागा मिळाल्या आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्हाला निम्म्या जागा मिळाल्या पाहिजे. जर मायावती, मुलायम सिंग, जयललिता त्यांच्या राज्यात त्यांच्या विचारांचे सरकार आणू शकतात. तर महाराष्ट्रात शरद पवार यांच्या विचारांचे राज्य यावे, अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बाळगली, यात वावगे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्या वेळी स्वतंत्रपणे लढले, त्यावेळी राष्ट्रवादीच्या जागा वाढलेल्या आहेत. यामुळे एकदा काँग्रेस, भाजपा, सेना, मनसे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवित जनतेचा कौल जाणून घ्यावा. निकालानंतर पाहिजे तर समविचारी पक्ष सत्तेवर येतील, असे ते म्हणाले. विरोधी पक्षाचा समाचार घेतांना पवार यांनी काँग्रेसला देखील चिमटे काढले. ‘मित्रपक्षाबद्दल न बोललेले बरे’ असा टोमणा मारत त्यांनी आपली नाराजी जाहीर केली. युतीच्या काळात करण्यात आलेल्या घोषणा, मनसेची लोकसभा निवडणुकीतील स्थिती, नाशिक महापालिकेत मनसेचा कारभार यावर कोणीच बोलण्यास तयार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीचे वेगवेगळ्या पातळीवर चारित्र्यहनन सुरू आहे. एसआयटीने मला आणि सुनील तटकरे यांना क्लिन चिट दिलेली असतांना विरोधकांकडून जाणीवपूर्वक बदनामी सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)कठोर निर्णय म्हणजे जनतेच्या खिशाला कात्री लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात ‘अच्छे दिन आनेवाले है’ असा प्रचार भाजपाकडून सुरू होता. निवडणुकीचा निकाल लागताच रेल्वे भाडे वाढ, पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढलेले आहेत. महागाई रोखण्यात मोदी सरकार अपयशी ठरत असतांना देशाच्या अर्थ व्यवस्थेसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. कठोर निर्णय म्हणजे जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचेच काम ना? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.