शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

१३५ जण सुरक्षितस्थळी

By admin | Updated: August 3, 2016 00:16 IST

अहमदनगर : नाशिक जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला. रात्री उशिराने नदी पात्रातील विसर्ग वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून

अहमदनगर : नाशिक जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला. रात्री उशिराने नदी पात्रातील विसर्ग वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील नदीकाठच्या चार गावातील १३५ जणांना सुरक्षीत स्थळी हलविले. तसेच कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आदी नेवासा तालुक्यातील नदी काठच्या गावांना भेटी देऊन नागरिकांना स्थलांतरीत होण्याच्या सूचना तलाठ्यांमार्फत देण्यात आल्या आहेत.नदीकाठाच्या गावांतील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्याची मोहीम रात्री उशिराने प्रशासनाने हाती घेतली़ कोपरगाव तालुक्यातील मायेगावदेवी- २८, नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम-४७ श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर- २५, नाऊर-३५ जणांना सुरक्षितस्थळी हालविण्यात आले आहे़ याशिवाय नेवासा तालुक्यातील ३५ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्याची मोहीम नेवासाचे तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती़ ४डाऊच बुद्रूक शिवारातील डाऊच व कुरण बेट परिसरात भिल्ल आदिवासी समाजातील कुटुंबाची वस्ती आहे. शेती करून या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सकाळपासून गोदावरीला पाणी वाढू लागताच तहसीलदार प्रशांत खेडेकर, निवासी नायब तहसीलदार शिवाजी सुसरे व तलाठ्यांच्या पथकाने या लोकांना बाहेर येण्याचे आवाहन केले. मात्र कुणीही ऐकले नाही़ सायंकाळी डाऊच व कुरण बेटाला गोदावरीच्या पाण्याने वेढा घातला. त्यामुळे रामदास सावळेराम शाख, लहू सावळेराम शाख, अर्जुन रामदास शाख, अनिल भास्कर शाख, भास्कर रामदास शाख, विष्णू फकीरा मोरे आदींसह एकूण २२ जण या बेटावर अडकून पडले. त्यांना वाचविण्यासाठी खेडेकर यांनी होडी पाठवून मदतीचे प्रयत्न केले. मात्र अंधार पडल्यावर मदत कार्यात अडथळे येत असल्याने प्रशासन हतबल झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सायंकाळी सात वाजता प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सरपंच कांताबाई दहे आदी उपस्थित होते.