शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

१३५ जण सुरक्षितस्थळी

By admin | Updated: August 3, 2016 00:16 IST

अहमदनगर : नाशिक जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला. रात्री उशिराने नदी पात्रातील विसर्ग वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून

अहमदनगर : नाशिक जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला. रात्री उशिराने नदी पात्रातील विसर्ग वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील नदीकाठच्या चार गावातील १३५ जणांना सुरक्षीत स्थळी हलविले. तसेच कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आदी नेवासा तालुक्यातील नदी काठच्या गावांना भेटी देऊन नागरिकांना स्थलांतरीत होण्याच्या सूचना तलाठ्यांमार्फत देण्यात आल्या आहेत.नदीकाठाच्या गावांतील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्याची मोहीम रात्री उशिराने प्रशासनाने हाती घेतली़ कोपरगाव तालुक्यातील मायेगावदेवी- २८, नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम-४७ श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर- २५, नाऊर-३५ जणांना सुरक्षितस्थळी हालविण्यात आले आहे़ याशिवाय नेवासा तालुक्यातील ३५ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्याची मोहीम नेवासाचे तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती़ ४डाऊच बुद्रूक शिवारातील डाऊच व कुरण बेट परिसरात भिल्ल आदिवासी समाजातील कुटुंबाची वस्ती आहे. शेती करून या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सकाळपासून गोदावरीला पाणी वाढू लागताच तहसीलदार प्रशांत खेडेकर, निवासी नायब तहसीलदार शिवाजी सुसरे व तलाठ्यांच्या पथकाने या लोकांना बाहेर येण्याचे आवाहन केले. मात्र कुणीही ऐकले नाही़ सायंकाळी डाऊच व कुरण बेटाला गोदावरीच्या पाण्याने वेढा घातला. त्यामुळे रामदास सावळेराम शाख, लहू सावळेराम शाख, अर्जुन रामदास शाख, अनिल भास्कर शाख, भास्कर रामदास शाख, विष्णू फकीरा मोरे आदींसह एकूण २२ जण या बेटावर अडकून पडले. त्यांना वाचविण्यासाठी खेडेकर यांनी होडी पाठवून मदतीचे प्रयत्न केले. मात्र अंधार पडल्यावर मदत कार्यात अडथळे येत असल्याने प्रशासन हतबल झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सायंकाळी सात वाजता प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सरपंच कांताबाई दहे आदी उपस्थित होते.