शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

संगमनेर तालुक्यातील १२ गावे समृद्ध गाव स्पर्धेसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : ग्रामीण पर्यावरण व्यवस्थेचा आणि अर्थशास्त्राचा कायापालट करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संगमनेर : ग्रामीण पर्यावरण व्यवस्थेचा आणि अर्थशास्त्राचा कायापालट करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात संगमनेर तालुक्यातील १२ गावे पात्र ठरली आहेत. जलसंधारणातून गावात जलसमृद्धी आणण्यासाठी येथील ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.

राज्यातील ४० तालुक्यांमधील एक हजाराहून अधिक गावांची समृद्ध गाव स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. कोरोनाच्या परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण घेत संगमनेर तालुक्यातील मांची, सावरगाव तळ, पेमगिरी, भोजदरी, कुंभारवाडी, खंदरमाळवाडी, पिंपळगाव माथा, पिंपळगाव देपा, मोधळवाडी, खरशिंदे, कणसेवाडी, म्हसवंडी या १२ गावांनी पहिल्या टप्प्यातील काम यशस्वीरित्या पूर्ण केल्याने ही गावे स्पर्धेसाठी पात्र ठरली आहेत. समृद्ध गाव स्पर्धेत प्रामुख्याने जल व्यवस्थापन आणि पर्यावरणाचे आरोग्य सुधारणे या गोष्टींवर भर देण्यात येत आहे. काही गावांमध्ये पाण्याचा भरमसाठ उपसा होऊ लागला. पाण्याचा अनियंत्रित वापर होऊ लागल्याने उन्हाळा सुरू होताच दुष्काळाचे संकट समोर उभे राहते. जलसंधारण करून दुष्काळाचे संकट दूर होणार नाही. याशिवाय हवामान बदलाच्या संकटामुळे शेतीतील अनिश्चितता आणि दुष्काळ या समस्यांनी अधिक उग्र रूप धारण केले आहे. याच समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि दुष्काळाच्या समस्येचा समूळ नाश करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांना समृद्ध करण्यावर भर देण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात १२० गुणांसाठी काम होणे अपेक्षित होते. संगमनेर तालुक्यातील १२ गावांपैकी ७ गावांनी १२०पैकी १२० गुण मिळवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अमीर खान, किरण राव यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने आयोजित कार्यक्रमात संगमनेर तालुक्यातील गावांचा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते या गावांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

------------

पाणी फाऊंडेशनच्यावतीने २०१९मधील ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील १०० गावांनी सहभाग घेतला होता. या गावांमध्ये जलसंधारणाची कामे झाली. पाणी फाऊंडेशनच्या सर्व स्पर्धांना ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- राजेंद्र जाधव, संगमनेर तालुका समन्वयक, पाणी फाऊंडेशन

-------------

पाणी फाऊंडेशनच्यावतीने खंदरमाळवाडीत भरीव काम झाले आहे, होत आहे. यासाठी ग्रामस्थांचा मोठा सहभाग मिळतो आहे. समृद्ध गाव स्पर्धेत आमच्या गावाने सहभाग घेतला असून, शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.

- किशोर डोके, सामाजिक कार्यकर्ते, खंदरमाळवाडी