शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

११३ शेतकऱ्यांना ३१ कोटींचा मोबदला

By admin | Updated: December 23, 2015 23:26 IST

अहमदनगर : सुपा औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन क्षेत्रात ६१ हेक्टरची भर पडली आहे़ पळवे व वाघुंडे येथील ११३ शेतकऱ्यांनी संमतीपत्र प्रशासनास सादर केले

अहमदनगर : सुपा औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन क्षेत्रात ६१ हेक्टरची भर पडली आहे़ पळवे व वाघुंडे येथील ११३ शेतकऱ्यांनी संमतीपत्र प्रशासनास सादर केले असून, या शेतकऱ्यांशी करार करण्याची प्रक्रिया बुधवारी सुरू करण्यात आली आहे़ कराराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३१ कोटी जमा करण्यात येणार आहेत़ त्यामुळे सुपा औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणाचा मार्ग सुकर झाला आहे़ पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्यात येत आहे़ त्यासाठी परिसरातील पाच गावांतील ९४६ हेक्टर जमीन आरक्षित करण्यात आली आहे़ मात्र शेतकऱ्यांनी सुरुवातीला जमिनी देण्यास विरोध केला़ शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने मोबदल्यात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला़ जिरायती जमिनींसाठी हेक्टरी ५० लाख रुपये देण्याचे ठरले़ त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध ओसरला़ वाघुंडे गावातील शेतकऱ्यांनी संमती दिल्याने १०५ हेक्टर क्षेत्र पहिल्या टप्प्यात संपादित करण्यात आले़ शेतकऱ्यांनी स्वत: संमतीपत्र दाखल केले़ त्यामुळे एकूण २१३ हेक्टर क्षेत्र संपादित झाले़ जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना १०० कोटी रुपयांचे वाटप करून झाले आहे़ नव्याने वाघुंडे व पळवे गावातील ११३ शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे संमतीपत्र दाखल केले होते़ तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सरकारला पाठविला होता़ त्यास मंजुरी मिळाली आहे़ त्याचबरोबर मोबदल्यासाठीचे ३१ कोटी रुपयेही महसूलकडे वर्ग करण्यात आले आहेत़ महसूल खात्याने शेतकऱ्यांशी रितसर करार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे़ करार पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मोबदल्याची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले़सुपा औद्योगिक वसाहतीत गुंतवणूक करण्यासाठी विदेशी कंपन्यांनीही तयारी दर्शविली आहे़ उद्योजकांनी वसाहतीची पाहणी करून जागेची मागणी केली आहे़ पण, गेल्या काही दिवसांपासून भूसंपादन रखडले होते़ त्यास आता गती मिळाली असून, शेतकरी स्वत:हून संमतीपत्र दाखल करू लागले आहेत़ मात्र सलग जमिनी प्रशासनाच्या ताब्यात आल्या नाहीत़ त्यामुळे भूखंडाचा आराखडा लांबणीवर पडला आहे़ एक सलग जमीन ताब्यात घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे़ त्यासाठी शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येईल़ सलग जमिनी ताब्यात आल्यानंतरच जमिनी उद्योगासाठी देणे शक्य होणार आहे़ (प्रतिनिधी)