शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

जिल्ह्यात १०२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:19 IST

अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी २३१२ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ३५९२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू ...

अहमदनगर : जिल्ह्यात रविवारी २३१२ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ३५९२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १९९०५ इतकी झाली आहे. खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे झालेल्या मृत्यूची नोंद उशिराने व एकाच दिवशी केल्याने जिल्हा प्रशासनाच्या पोर्टलवर २४ तासांत १०२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी शनिवारी कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी प्रशासन मृत्यूचा आकडा लपविणार नसल्याचे सांगितले. तसेच अधिकाऱ्यांनीही खासगी रुग्णालयांकडून माहिती वेळेत अपलोड होत नसल्याने त्याची पोर्टलवर उशिरा नोंद होते. मात्र, कोणतीही माहिती लपविली जात नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर रविवारी खासगी रुग्णालयांनी व शासकीय यंत्रणेने तातडीने झालेल्या मृत्यूची नोंद केल्याने ही संख्या अचानक वाढली असून ते एकाच दिवसातील नव्हे, तर आठ दिवसांत झालेले मृत्यू असल्याचे यंत्रणेने स्पष्ट केले.

रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ७१३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९६७ आणि अँटीजेन चाचणीत १९१२ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर १७६, अकोले ६७, जामखेड ४८, कर्जत ७०, कोपरगाव २६, नगर ग्रामीण ५२, नेवासा ३०, पारनेर ३६, पाथर्डी ५८, राहता २१, राहुरी ३२, संगमनेर ११, शेवगाव ०७, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ०७, कॅंटोन्मेंट बोर्ड २८, मिलिटरी हॉस्पिटल १२ आणि इतर जिल्हा ०२ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ३८०, अकोले २५, जामखेड ३, कर्जत ८, कोपरगाव २१, नगर ग्रामीण ६८, नेवासा ९, पारनेर १५, पाथर्डी २३, राहाता ८१, राहुरी १३, संगमनेर १३५, शेवगाव १४, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर २२, कॅंटोन्मेंट बोर्ड २९ आणि इतर जिल्हा ९४ आणि इतर राज्य १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १९१२ जण बाधित आढळून आले. नगर शहर २९३, अकोले ९७, जामखेड २९, कर्जत ८१, कोपरगाव ९७, नगर ग्रामीण २२७, नेवासा १६७, पारनेर ७३, पाथर्डी ११४, राहाता २१०, राहुरी १५७, संगमनेर ७१, शेवगाव १३२, श्रीगोंदा ४४, श्रीरामपूर ६९, कॅन्टोन्मेंट बोर्ड २० आणि इतर जिल्हा ३१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

-----------

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या : १,१४,६४२

उपचार सुरू असलेले रुग्ण : १९९०५

मृत्यू : १५८२

एकूण रुग्णसंख्या : १,३६,१२९