शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नगरमध्ये मेहेरबाबांच्या आगमनाला १०० वर्षे पूर्ण, विविध कार्यक्रमांचे आयोजन

By अरुण वाघमोडे | Updated: May 3, 2023 13:28 IST

४ व ५ मे रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

अरुण वाघमोडे / अहमदनगर: अवतार मेहेरबाबा हे ४ मे १९२३ रोजी नगर शहराजवळील आरणगाव येथे आले हाेते. या घटनेला आता १०० पूर्ण होत असून यानिमित्त ४ व ५ मे रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मेहेरबाबा ट्रस्टचे विश्वस्त डॉ. मेहेरनाथ कलचुरी यांनी सांगितले.

डॉ. कलचुरी यांनी सांगितले की, नगरमधील खुशरु क्वार्टरमधून अवतार मेहेरबाबा आपल्या निवडक शिष्यांबरोबर अरणगाव येथे पायी गेले. तेथे ते प्रथम लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. अरणगावमधील हे ठिकाण खुशरु इराणी व गुलुमाई इराणी यांच्या मालकीचे होते. त्यावेळी याला मेहेराबाद नव्हे तर अरणगाव असे म्हणत कारण ते जवळच्या गावाचे नाव होते. त्यानंतर या ठिकाणाला बाबांनी मेहेराबाद असे नाव दिले. बाबा येण्यापूर्वी पहिल्या महायुद्धात (१९१४ ते १९१८) हा भाग ब्रिटिश लष्करी तळ म्हणून वापरला जात होता.

युद्धानंतर जमीन आणि इमारतींचा लिलाव झाला आणि ही मालमत्ता इराणी कुटुंबियांनी विकत घेतली. या ठिकाणी बाबांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी येथील रेल्वे लाइन शेजारी असणारे ब्रिटिशकालीन पोस्ट ऑफिस, मेसक्वार्टरची दुरुस्ती करून स्वच्छ करून राहण्यायोग्य बनविले. याठिकाणी बाबा ४ ते २५ मे पर्यंत प्रथम राहिले व २५ मे ला येथे त्यानी मेहराबादचा बोर्ड लावला तेव्हापासून या ठिकाण प्रसिद्ध झाले. मेहेराबाद येथे ४ व ५ मे रोजी स्वागत, भजन, पदयात्रा, प्रवचन, व्याखान, महितीपट आदी कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याला देश-विदेशातून भाविक येणार असल्याचे डाू. कलचुरी यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर