शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

१०० गुंठ्यात दहा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 11:50 IST

श्रीक्षेत्र धामणगाव देवीचे (ता.पाथर्डी) येथील रामकिसन काकडे व प्रयागाबाई काकडे यांनी वयाच्या साठीनंतरही अथक परिश्रम, हायटेक तंत्राची कास धरीत सेंद्रीय शेणखत आणि विद्राव्य खतांव्दारे शंभर गुंठे जमीन क्षेत्रावर केवळ पाचशे संत्रीचे झाडांची लागवड केली होती.

चंद्रकांत गायकवाडपाथर्डी : श्रीक्षेत्र धामणगाव देवीचे (ता.पाथर्डी) येथील रामकिसन काकडे व प्रयागाबाई काकडे यांनी वयाच्या साठीनंतरही अथक परिश्रम, हायटेक तंत्राची कास धरीत सेंद्रीय शेणखत आणि विद्राव्य खतांव्दारे शंभर गुंठे जमीन क्षेत्रावर केवळ पाचशे संत्रीचे झाडांची लागवड केली होती. दुसऱ्या वर्षी सुमारे ३१ टन संत्री फळाचे उत्पादन घेतले. लहान, मोठे फळाचे आकारमान व प्रतवारीनुसार तीस ते चाळीस रुपये प्रतिकिलोचा दर मिळाल्याने यातून या पती-पत्नीला सुमारे दहा लाख साठ हजार रुपयाची अर्थप्राप्ती झाली.२०१२ मध्ये काकडे यांनी धामणगावच्या पूर्वेला गावकुसाला उत्तरमुखी वाहणा-या जमनागिरी नदीच्या किना-यालगतच्या सोमाचा मळा या क्षारपड पोयटा जमिनीत १५ बाय १५ फूट अंतरावर पाचशे संत्रीची झाडे लावली. खोल खड्डे घेवून ती लिंबाचा पाला, शेणखताने भरली. काही दिवस सरळ सरीओरंबा करून पाणी दिले. त्यामुळे रोपे निरोगी व कसदार वाढली. पुढे पाणी व विद्राव्य खते देण्यासाठी आधुनिक फिल्टर टाकी ठिबक सिंचन संच बसविला. आंतरमशागती ट्रॅक्टरने करीत असल्याने आंतरपिके टाळली. त्यामुळे झाडांचा चौफेर परीघ तणरहित राहून २०१६ साली चौथ्या वर्षीच झाडे डेरेदार होऊन बहरली.१५ मे २०१८ अखेर अखेरची बारीक सारीक फळे तोडून २० किलो वजनाचे ७० कॅरेट भरले गेले. या महिन्यात पंधरा दिवसांपासून झाडांना पाणीच पुरले नसल्याने सुकलेली फळे वजनदार झाली नसल्याचे वास्तव नजरेस आले. काकडे यांना अजित व अतुल अशी दोन विवाहित मुले आहेत. मोठा अजित कृषी पदवीधारक असून नामांकित बियाणे कंपनीत सेवेत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली अतुलच्या मदतीने फळशेतीचे काम कमी मजुरीत जमिनीत मुबलक शेणखत टाकून तर ठिबकद्वारा विद्राव्य खते देत ट्रॅक्टरने अंतरमशागत करीत आहे, असे रामकिसन काकडे यांनी सांगितले.पहिल्या वर्षी पाच लाख पदरी पडले. यावर्षी बहार धरणे खते देणे व अचूक वेळा मशागत व सेंद्रिय पद्धतीची खते फवारणी अशी त्रिसुत्री जमली. त्यामुळे फळांचे आकारमान व संख्या यांनी झाडे वाकून गेली. बांबूचा आधार द्यावा लागला. सुरुवातीची काही फळे थेट बाजारात नेऊन विकली. तर आता प्रतवारी परिचित झाल्याने व्यापारी जागेवरच येवून खरेदी करीत आहेत. त्यामुळे दर कमी मिळत असला तरी तोडणी वाहतूक हमाली आडत खर्च लागत नाही.त्यामुळे पदरी समाधान आहे, असे प्रयागाबाई म्हणाल्या. चार गायी, तीन म्हशींची दावण असल्याने फळशेतीला मुबलक प्रमाणात शेणखत मिळते. गरज पडेल तेव्हा नत्र म्हणून याच पशुधनाचे मूत्र देखील मजुराद्वारा आम्ही झाडांना देतो. जनावरांच्या चारा, पाणी यांचा दुष्काळात त्रास होतो. पण हा फळशेतीचा सुप्त फायदा होतो, असे संत्रा उत्पादक शेतकरी रामकिसन काकडे यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी