शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

१०० गुंठ्यात दहा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 11:50 IST

श्रीक्षेत्र धामणगाव देवीचे (ता.पाथर्डी) येथील रामकिसन काकडे व प्रयागाबाई काकडे यांनी वयाच्या साठीनंतरही अथक परिश्रम, हायटेक तंत्राची कास धरीत सेंद्रीय शेणखत आणि विद्राव्य खतांव्दारे शंभर गुंठे जमीन क्षेत्रावर केवळ पाचशे संत्रीचे झाडांची लागवड केली होती.

चंद्रकांत गायकवाडपाथर्डी : श्रीक्षेत्र धामणगाव देवीचे (ता.पाथर्डी) येथील रामकिसन काकडे व प्रयागाबाई काकडे यांनी वयाच्या साठीनंतरही अथक परिश्रम, हायटेक तंत्राची कास धरीत सेंद्रीय शेणखत आणि विद्राव्य खतांव्दारे शंभर गुंठे जमीन क्षेत्रावर केवळ पाचशे संत्रीचे झाडांची लागवड केली होती. दुसऱ्या वर्षी सुमारे ३१ टन संत्री फळाचे उत्पादन घेतले. लहान, मोठे फळाचे आकारमान व प्रतवारीनुसार तीस ते चाळीस रुपये प्रतिकिलोचा दर मिळाल्याने यातून या पती-पत्नीला सुमारे दहा लाख साठ हजार रुपयाची अर्थप्राप्ती झाली.२०१२ मध्ये काकडे यांनी धामणगावच्या पूर्वेला गावकुसाला उत्तरमुखी वाहणा-या जमनागिरी नदीच्या किना-यालगतच्या सोमाचा मळा या क्षारपड पोयटा जमिनीत १५ बाय १५ फूट अंतरावर पाचशे संत्रीची झाडे लावली. खोल खड्डे घेवून ती लिंबाचा पाला, शेणखताने भरली. काही दिवस सरळ सरीओरंबा करून पाणी दिले. त्यामुळे रोपे निरोगी व कसदार वाढली. पुढे पाणी व विद्राव्य खते देण्यासाठी आधुनिक फिल्टर टाकी ठिबक सिंचन संच बसविला. आंतरमशागती ट्रॅक्टरने करीत असल्याने आंतरपिके टाळली. त्यामुळे झाडांचा चौफेर परीघ तणरहित राहून २०१६ साली चौथ्या वर्षीच झाडे डेरेदार होऊन बहरली.१५ मे २०१८ अखेर अखेरची बारीक सारीक फळे तोडून २० किलो वजनाचे ७० कॅरेट भरले गेले. या महिन्यात पंधरा दिवसांपासून झाडांना पाणीच पुरले नसल्याने सुकलेली फळे वजनदार झाली नसल्याचे वास्तव नजरेस आले. काकडे यांना अजित व अतुल अशी दोन विवाहित मुले आहेत. मोठा अजित कृषी पदवीधारक असून नामांकित बियाणे कंपनीत सेवेत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली अतुलच्या मदतीने फळशेतीचे काम कमी मजुरीत जमिनीत मुबलक शेणखत टाकून तर ठिबकद्वारा विद्राव्य खते देत ट्रॅक्टरने अंतरमशागत करीत आहे, असे रामकिसन काकडे यांनी सांगितले.पहिल्या वर्षी पाच लाख पदरी पडले. यावर्षी बहार धरणे खते देणे व अचूक वेळा मशागत व सेंद्रिय पद्धतीची खते फवारणी अशी त्रिसुत्री जमली. त्यामुळे फळांचे आकारमान व संख्या यांनी झाडे वाकून गेली. बांबूचा आधार द्यावा लागला. सुरुवातीची काही फळे थेट बाजारात नेऊन विकली. तर आता प्रतवारी परिचित झाल्याने व्यापारी जागेवरच येवून खरेदी करीत आहेत. त्यामुळे दर कमी मिळत असला तरी तोडणी वाहतूक हमाली आडत खर्च लागत नाही.त्यामुळे पदरी समाधान आहे, असे प्रयागाबाई म्हणाल्या. चार गायी, तीन म्हशींची दावण असल्याने फळशेतीला मुबलक प्रमाणात शेणखत मिळते. गरज पडेल तेव्हा नत्र म्हणून याच पशुधनाचे मूत्र देखील मजुराद्वारा आम्ही झाडांना देतो. जनावरांच्या चारा, पाणी यांचा दुष्काळात त्रास होतो. पण हा फळशेतीचा सुप्त फायदा होतो, असे संत्रा उत्पादक शेतकरी रामकिसन काकडे यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी