शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

10 कोटीच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण : 4 तासांत सुटका, 4 तरुण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 12:18 IST

दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या बारा वर्षांच्या मुलाची शुक्रवारी (दि़९)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासांत सुटका करून चौघा आरोपींना पाठलाग करून अटक केली.

अहमदनगर / संगमनेर : दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या बारा वर्षांच्या मुलाची शुक्रवारी (दि़९)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासांत सुटका करून चौघा आरोपींना पाठलाग करून अटक केली. विरेश शामराव गिरी (वय ३५ रा. साईश्रद्धा कॉलनी, संगमनेर), जनार्धन खंडू बोडखे (वय १९ रा. पंचवटी, नाशिक), सचिन पोपट लेवे (वय १९ रा. सोमेश्वर बारदण फाटा, नाशिक) व मयूर उर्फ पंकज प्रकाश उदावंत (वय २१ रा. साईश्रद्धा चौक, संगमनेर) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.संगमनेर येथील प्रसिद्ध व्यापारी प्रकाश फुलचंद कटारिया (वय ६५ रा. वृंदावन कॉलनी मालपाणी प्लाझा) यांचा बारा वर्षांचा नातू दक्ष महेश कटारिया हा शुक्रवारी सकाळी ७ वाजता शाळेत जात असताना त्याचे वरील चौघा आरोपींनी अपहरण केले. याबाबत कटारिया यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. आरोपींनी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता कटारिया यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून दहा कोटींच्या खंडणीची मागणी केली. तसेच पैसे कोठे घेऊन यायचे हे सायंकाळी ७ वाजता फोन करून सांगतो असा मेसेजमध्ये उल्लेख होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार त्यांचे पथक व संगमनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांनी तोपर्यंत आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान आरोपींनी दक्ष कटारिया याला संगमनेर-मालदाड रोडवरील पेरुच्या बागेजवळ डांबून ठेवल्याची माहिती मिळाली़ पोलीस पथकाने तत्काळ त्या ठिकाणी छापाटाकला. पोलीस येत असल्याची चाहूल लागताच आरोपींनी अपहरण केलेल्या मुलाला रस्त्यावर सोडून मोटारसायकलवर पसार झाले. पोलिसांनी तत्काळ आरोपींचा पाठलाग सुरू केला़ अखेर पोलिसांनी संगमनेर कारखाना गेटसमोर आरोपींच्या मोटार सायकलला गाडी आडवी लावली. आरोपींनी दुचाकी सोडून देत वेगवेगळ्या दिशेने धूम ठोकली़ पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पळणा-या आरोपींना पकडले. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, एक चाकू, एक मोटारसायकल, मोबाईल असा १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांच्या दक्षतेमुळे ‘दक्ष’ ची सुटकासंगमनेर येथील विरेश गिरी याने दक्ष कटारिया याच्या अपहरणाचा कट आखला. यासाठी त्याने शहरातीलच एक आणि नाशिकमधील दोघांची साथ घेतली. आरोपींनी सकाळी ७़ १५ वाजता दक्ष याचे अपहरण केल्याची घटना तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती. या फुटेजचा आधार घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींना गजाआड केले.यांनी केली कारवाई यशस्वीजिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपाधीक्षक रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, निरीक्षक अभय परमार, सहायक निरीक्षक संदीप पाटील, पाटील, कवडे, गायकवाड, पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, देविदास काळे, मल्लीकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, भागिनाथ पंचमुखी, संदीप दरंदले, योगेश सातपुते, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, बबन बेरड, अमित महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर