शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

10 कोटीच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण : 4 तासांत सुटका, 4 तरुण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 12:18 IST

दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या बारा वर्षांच्या मुलाची शुक्रवारी (दि़९)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासांत सुटका करून चौघा आरोपींना पाठलाग करून अटक केली.

अहमदनगर / संगमनेर : दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या बारा वर्षांच्या मुलाची शुक्रवारी (दि़९)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासांत सुटका करून चौघा आरोपींना पाठलाग करून अटक केली. विरेश शामराव गिरी (वय ३५ रा. साईश्रद्धा कॉलनी, संगमनेर), जनार्धन खंडू बोडखे (वय १९ रा. पंचवटी, नाशिक), सचिन पोपट लेवे (वय १९ रा. सोमेश्वर बारदण फाटा, नाशिक) व मयूर उर्फ पंकज प्रकाश उदावंत (वय २१ रा. साईश्रद्धा चौक, संगमनेर) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.संगमनेर येथील प्रसिद्ध व्यापारी प्रकाश फुलचंद कटारिया (वय ६५ रा. वृंदावन कॉलनी मालपाणी प्लाझा) यांचा बारा वर्षांचा नातू दक्ष महेश कटारिया हा शुक्रवारी सकाळी ७ वाजता शाळेत जात असताना त्याचे वरील चौघा आरोपींनी अपहरण केले. याबाबत कटारिया यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. आरोपींनी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता कटारिया यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून दहा कोटींच्या खंडणीची मागणी केली. तसेच पैसे कोठे घेऊन यायचे हे सायंकाळी ७ वाजता फोन करून सांगतो असा मेसेजमध्ये उल्लेख होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार त्यांचे पथक व संगमनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांनी तोपर्यंत आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान आरोपींनी दक्ष कटारिया याला संगमनेर-मालदाड रोडवरील पेरुच्या बागेजवळ डांबून ठेवल्याची माहिती मिळाली़ पोलीस पथकाने तत्काळ त्या ठिकाणी छापाटाकला. पोलीस येत असल्याची चाहूल लागताच आरोपींनी अपहरण केलेल्या मुलाला रस्त्यावर सोडून मोटारसायकलवर पसार झाले. पोलिसांनी तत्काळ आरोपींचा पाठलाग सुरू केला़ अखेर पोलिसांनी संगमनेर कारखाना गेटसमोर आरोपींच्या मोटार सायकलला गाडी आडवी लावली. आरोपींनी दुचाकी सोडून देत वेगवेगळ्या दिशेने धूम ठोकली़ पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पळणा-या आरोपींना पकडले. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, एक चाकू, एक मोटारसायकल, मोबाईल असा १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांच्या दक्षतेमुळे ‘दक्ष’ ची सुटकासंगमनेर येथील विरेश गिरी याने दक्ष कटारिया याच्या अपहरणाचा कट आखला. यासाठी त्याने शहरातीलच एक आणि नाशिकमधील दोघांची साथ घेतली. आरोपींनी सकाळी ७़ १५ वाजता दक्ष याचे अपहरण केल्याची घटना तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती. या फुटेजचा आधार घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींना गजाआड केले.यांनी केली कारवाई यशस्वीजिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपाधीक्षक रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, निरीक्षक अभय परमार, सहायक निरीक्षक संदीप पाटील, पाटील, कवडे, गायकवाड, पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, देविदास काळे, मल्लीकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, भागिनाथ पंचमुखी, संदीप दरंदले, योगेश सातपुते, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, बबन बेरड, अमित महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर