शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

तुज नारायणा बोल नाही..! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 19:35 IST

प्रारब्धाचे भोग भोगावेच लागतात त्यासाठीच हा देह आहे.

- ह.भ.प.भरतबुवा रामदासी (बीड)

आपले पूर्वाजित कर्मच आपल्या सुख दुःखास कारण असते. खरं तर सुखाचा भोग प्राप्त झाला तर, कुणाचीच तक्रार नसते पण दुःखाचे भोग भोगतांना आपण देवासच दोष देतो. मी काहीही कर्म केले नसतांना देवाने हे दुःखाचे भोग माझ्या नशिबी का आणले..? असा आरोप माणूस करीत असतो. शास्त्रीय भाषेत याला अकृताभ्यागम दोष असे म्हणतात. प्रत्येक जीवाच्या हातून रागद्वेषादिक भावनेतूनच कर्मे अधिक झालेली असतात त्यामुळे त्याच कर्माचे फळ दुःख रूपाने मिळत असते. कर्माचे फळ तर, देवादिकांनाही चुकत नाही मग माणसाला कसे चुकेल..?

स्वपूर्वार्जित कर्मेव कारणं सुखदुःखयोः

असाच शास्त्र सिद्धांत आहे. पुराणात अशी अनेक उदाहरणे आली आहेत. श्रावण बाळाला चुकून बाण लागला व त्याचा वध झाला. पुत्र वधाने विव्हळ झालेल्या श्रावणाच्या पित्याने दशरथ राजास शाप दिला. राजा..! अंतसमयी तुला देखील पुत्र पुत्र करून मरावे लागेल.विद्यारण्य स्वामी पंचदशी ग्रंथात वर्णन करतात -

अवश्यं भाविभावानां प्रतिकारो भवेद्यदितदा दुःखैर्नलिप्येरन् नल राम युधिष्ठिराः

संचिताचा प्रतिकार करता आला असता तर श्रीराम, नलराजा ,धर्म राजा यांनी दुःख भोगलेच नसते. तुकाराम महाराज म्हणतात -

पापाचे संचित देहासी दंडणातुज नारायणा बोल नाही

सामान्य माणसाला आपल्या पूर्वजन्मीचे कर्म माहित नसल्यामुळे तो ईश्वरावर दोषारोप करतो. वास्तवात हा देहच प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी प्राप्त झाला आहे. 

प्रारब्ध कर्मणां भोगादेव क्षयः

एकदा समर्थ रामदास स्वामींना प्रचंड ताप आला. अंगावर घोंगडी घेऊन समर्थ झोपले होते इतक्यात सज्जनगडावर छत्रपती शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनासाठी आले. शिष्यांनी राजाला समर्थांना ताप आल्याचे सांगितले. राजे समर्थ दर्शनासाठी आले त्यांनी समर्थ चरणावर मस्तक टेकवले. समर्थ जागे झाले. राजांना बघून त्यांनी आपला ताप घोंगडीला दिला. राजे म्हणाले, गुरूदेव..! आपल्याला ताप आल्याचे ऐकले पण आता तर, आपले अंग थंड लागत आहे. गुरूदेव म्हणाले, ऐकले ते खोटे नव्हे. आपल्याशी निवांत बोलता यावे म्हणून मी थोड्या वेळापुरता हा ताप या घोंगडीला दिला आहे. राजाने घोंगडीला हात लावताच राजाला चटका बसला. राजे म्हणाले, गुरूदेव.! ताप जर घोंगडीला देता येतो तर घेताच कशाला..? समर्थ रामदास स्वामी म्हणाले; राजे.! प्रारब्धाचे भोग भोगावेच लागतात त्यासाठीच हा देह आहे.

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत.त्यांचा संपर्क क्रमांक 8329878467 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक