शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

निराकाराची उपासना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 03:07 IST

हे तत्त्व फक्त विवेक संपन्न योगी पुरुषांच्या ज्ञानकक्षेत सहजपणे प्रवेश करते.

- वामन देशपांडे

भक्तीयोग श्रेष्ठ आहे, हे त्रिवार सत्य आहे. किंबहुना ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन योगांचे फल म्हणजे भक्तीयोग, असे भगवंतांचे निश्चित मत आहे. स्वत: भगवंतांनी हे आपले मत मांडताना भक्तश्रेष्ठ अर्जुनाला एक महत्त्वाचा विचार गीतेच्या पाचव्या अध्यायाच्या शेवटी मांडला होता की,भांत्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्।सुहृद सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति।।पार्था, परमेश्वर सत्य आहे आणि त्रैलोक्यावर फक्त त्याचीच सत्ता आहे हे सत्य प्रत्येक साधकाला ज्ञात असणे अत्यावश्यक आहे. साधकाच्या हे लक्षात यायला हवे की, एका परमेश्वरी सत्तेशिवाय या त्रिभुवनात दुसऱ्या कोणाचीही सत्ता चालत नाही. पार्था तू फक्त एकच सत्य ग्रहण कर की, मी परमेश्वर आहे. सर्व यज्ञांचा, सर्व प्रकारच्या तपांचा, मीच भोक्ता आहे. हे तू एकदा भक्तीपातळीवर ज्ञानमार्गाने जाणून घेतलेस आणि निष्काम वृत्तीने प्रत्येक विहित कर्म, फलाशा विरहित पूर्ण करून फलासहित तू मलाच अर्पण केलेस, तर तुला परमशांती सहजगत्या प्राप्त होईल. पार्था, मी तुझा प्राणप्रिय सखा, मित्र आणि गुरू आहे. सर्वांचा हितकर्ता आहे. हे जाणणे हीच तर खरी भक्ती आहे रे, पार्था.. निर्गुण निराकार परमेश्वराच्या उपासनेत काठीण्य अधिक आहे. कारण एकच. परमेश्वर हा मानवी इंद्रियांचा विषय होतच नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर, परमेश्वरी अनुभव इंद्रियगोचर होत नाही. निर्गुण निराकाराची उपासना करणाºया साधक भक्तांपाशी प्रखर वैराग्य आणि जबरदस्त विवेकबुद्धी असणे अत्यंत आवश्यक असते. जर मन आसक्त स्थितीत सदैव वावरत असेल तर निर्गुण उपासना खूपच कठीण जाते. हे तत्त्व फक्त विवेक संपन्न योगी पुरुषांच्या ज्ञानकक्षेत सहजपणे प्रवेश करते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक