शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

निराकाराची उपासना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 03:07 IST

हे तत्त्व फक्त विवेक संपन्न योगी पुरुषांच्या ज्ञानकक्षेत सहजपणे प्रवेश करते.

- वामन देशपांडे

भक्तीयोग श्रेष्ठ आहे, हे त्रिवार सत्य आहे. किंबहुना ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन योगांचे फल म्हणजे भक्तीयोग, असे भगवंतांचे निश्चित मत आहे. स्वत: भगवंतांनी हे आपले मत मांडताना भक्तश्रेष्ठ अर्जुनाला एक महत्त्वाचा विचार गीतेच्या पाचव्या अध्यायाच्या शेवटी मांडला होता की,भांत्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्।सुहृद सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति।।पार्था, परमेश्वर सत्य आहे आणि त्रैलोक्यावर फक्त त्याचीच सत्ता आहे हे सत्य प्रत्येक साधकाला ज्ञात असणे अत्यावश्यक आहे. साधकाच्या हे लक्षात यायला हवे की, एका परमेश्वरी सत्तेशिवाय या त्रिभुवनात दुसऱ्या कोणाचीही सत्ता चालत नाही. पार्था तू फक्त एकच सत्य ग्रहण कर की, मी परमेश्वर आहे. सर्व यज्ञांचा, सर्व प्रकारच्या तपांचा, मीच भोक्ता आहे. हे तू एकदा भक्तीपातळीवर ज्ञानमार्गाने जाणून घेतलेस आणि निष्काम वृत्तीने प्रत्येक विहित कर्म, फलाशा विरहित पूर्ण करून फलासहित तू मलाच अर्पण केलेस, तर तुला परमशांती सहजगत्या प्राप्त होईल. पार्था, मी तुझा प्राणप्रिय सखा, मित्र आणि गुरू आहे. सर्वांचा हितकर्ता आहे. हे जाणणे हीच तर खरी भक्ती आहे रे, पार्था.. निर्गुण निराकार परमेश्वराच्या उपासनेत काठीण्य अधिक आहे. कारण एकच. परमेश्वर हा मानवी इंद्रियांचा विषय होतच नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर, परमेश्वरी अनुभव इंद्रियगोचर होत नाही. निर्गुण निराकाराची उपासना करणाºया साधक भक्तांपाशी प्रखर वैराग्य आणि जबरदस्त विवेकबुद्धी असणे अत्यंत आवश्यक असते. जर मन आसक्त स्थितीत सदैव वावरत असेल तर निर्गुण उपासना खूपच कठीण जाते. हे तत्त्व फक्त विवेक संपन्न योगी पुरुषांच्या ज्ञानकक्षेत सहजपणे प्रवेश करते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक