शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ईश्वराची उपासना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:57 IST

भगवंतच या संपूर्ण दृश्य विश्वाचा निर्माता, त्राता आणि संहारकर्ता आहे, हे ज्ञानमार्गानेच कळते. चराचरात एक भगवंतच व्यापून आहे हे सत्य जेव्हा साधकाला जाणवते तेव्हाच त्याला ‘वासुदेव: सर्वामिति’ या भगवंत वचनाचा अनुभव येईल.

- वामन देशपांडेभगवंतच या संपूर्ण दृश्य विश्वाचा निर्माता, त्राता आणि संहारकर्ता आहे, हे ज्ञानमार्गानेच कळते. चराचरात एक भगवंतच व्यापून आहे हे सत्य जेव्हा साधकाला जाणवते तेव्हाच त्याला ‘वासुदेव: सर्वामिति’ या भगवंत वचनाचा अनुभव येईल. त्या दिव्य क्षणी त्याचे हे जगणे केवळ भगवंताच्या नामाने अक्षरश: सदैव झंकारत राहील आणि त्याचे अवघे अस्तित्व चंदनगंधी होईल...साधक भगताने आपल्या साधनेची धृवदिशा, भगवंत अस्तित्व हेच केवळ सत्य आहे, त्या विचाराशी स्थिर करून नामसाधनेत आपला प्रत्येक क्षण जर गुंफला तरच त्याला असा साक्षात्कार होईल की सर्वत्र जसे एक आकाशच पसरलेले आहे तसा सर्वत्र एक भगवंतच आहे. निर्गुण निराकार अवकाशव्यापी परमेश्वराची उपासना श्रेष्ठ मानणारे साधक भक्त विवेकाच्या साहाय्याने परमेश्वरी सान्निध्याचा अनुभव अष्टौप्रहर भोगत राहतील आणि सगुण साकार भगवंताची उपासना करणारे भक्तीहृदयी श्रेष्ठ भक्तीने भारलेल्या आपल्या सर्वांगाने परमेश्वरी सान्निध्याचा संवादी अनुभव भोगताना त्यांचे अवघे आनंदमय झालेले अस्तित्व म्हणजे आनंदाचा अक्षय तृप्तीचा डोह होईल. सत्यच सांगायचे झाले तर, ज्ञानमार्गी साधक भक्त, परमेश्वरी अस्तित्व आहे असे मानतो तर भक्तीमार्गी परमभक्त केवळ मानतच नाही तर तो परमेश्वरी अस्तित्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेत राहतो. दोन्ही प्रकारच्या भक्तांच्या हृदयवीणा भगवंत नामातच सदैव झंकारत असतात. भक्ती दोघांचीही अतुटच असते. तरीही भगवंत आपल्या परमप्रिय भक्ताला आवर्जून एक रहस्य त्यासंदर्भात सांगतात की,ज्ञानी त्वामैव मे मतम।।पार्था, जो ज्ञानमार्गाने माझे अस्तित्व प्रत्यक्ष आनंदाने अनुभवतो, तो खरा भक्त असतो. कारण तो माझे स्वरूपच असतो. हे माझे मत तू प्रथम ध्यानात घे... कामनाविरहित, आसक्तीविरहित उपासना भगवंतांना अधिक प्रिय असते. भाग्याने लाभलेल्या या मानवी योगीचा आपण सदुपयोगच तर केला पाहिजे ना... विषयभोग हा मानवी योनीचा मूळत: उद्देशच नाही. तो विषयभोग इतर योनींसाठी आहे, हे साधक भक्ताने कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सर्वत्र एक परमेश्वरच गच्च भरून आहे, याचे भान फक्त मानवी योनीपाशी आहे. कारण माणसाला आपल्या बुद्धीचा वापर आत्मकल्याणासाठी करता येतो. इतर योनी परमेश्वरी अस्तित्वासंबंधी अनभिज्ञ आहे.

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक