शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

मनुष्य पाप तरी का करतो..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:35 IST

विहित कर्माचे आचरण न करणे, निषिद्ध कर्माचे आचरण करणे व विषयभोगात आसक्त असणे म्हणजे पाप..!

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

नाम चिंतनाने जन्म जन्मांतरीचे पाप नाहिसे होते असे तुकोबा म्हणाले, पापाचे पर्वत असोत वा कोटी ब्रह्म हत्या असोत नामाग्नीच्या सहाय्याने त्यांचे भस्म होते. संतश्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात -

नामदेव म्हणे नामाग्निच्या पोटी ।नाना पाप कोटी दग्ध होती ॥

नामोच्चारणाने पापनाश होतो याबद्दल सर्व संतांचे एकमत आहे. याबद्दल कुणालाही शंका नाही पण प्रश्न असा आहे की, मी करतो हे कर्म पाप आहे, हे कळून देखील जीवात्मा हे पाप का करतो..? या प्रश्नाचे उत्तर देतांना आपण प्रथम पाप म्हणजे काय..? याचा विचार करु.. शास्त्रकार म्हणतात -

अकुर्वन्विहितं कर्म निन्दितं च समाचरन् ।प्रसक्तश्चेन्द्रि यार्थेषु प्रायश्चित्तीयते नरः ॥

विहित कर्माचे आचरण न करणे, निषिद्ध कर्माचे आचरण करणे व विषयभोगात आसक्त असणे म्हणजे पाप..!

अर्जुनाने भगवंताला विचारले, देवा..! स्वतःची इच्छा नसतांना मनुष्य पाप करतोच का..? भगवान म्हणाले, अर्जुना..!

काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः ।महाशनो महापाप्मा विध्येनमिह वैरिणाम ॥

रजोगुणापासून उत्पन्न झालेला काम व क्रोध हेच पापाला प्रवृत्त करतात. खरं तर काम आणि क्रोध हेच महापापी आहेत तेच माणसाचे खरे वैरी आहेत मग माणसाच्या मनांत काम आणि क्रोध तरी का उत्पन्न होतात..? असा प्रश्न पडतो..भगवान त्याचे पण उत्तर देतात -

ध्यायतो विषयान्पुंसः संगस्तेषूपजायते ।संगासंजायते कामःकामात्क्रोधोभि जायते ॥

विषयाच्या अखंड चिंतनामुळे काम निर्माण होतो. कामप्राप्ती झाली नाही तर क्रोध निर्माण होतो व काम पूर्ण झाला तर लोभ निर्माण होतो याच क्रमाने सर्व विकार निर्माण होतात व जीवाचा अधःपात होतो. शेवटी काय तर विषयवासना हेच सर्व पापांचे मूळ कारण ठरते.आता विषय वासना तरी का निर्माण होते..? तर याचे उत्तर असे की, देहाला सुख पाहिजे म्हणून मनुष्य विषयांचे ध्यान करतो. मी देह आहे या भ्रामक समजुतीमुळे देहालाच सर्वस्व समजून तो सुखाची इच्छा करतो. शेवटी काय तर देहात्मबुद्धी हेच खरे पापाचे कारण आहे. तुकाराम महाराज म्हणतात -

बळे देह मी म्हणता । कोटी ब्रह्म हत्या पाप ॥

हे मानवा तू पंचमहाभूतांचा देह नसून तू सद् चिद् आनंद स्वरूप ब्रह्म आहेस. अविद्येमुळे आत्म्याच्या ठिकाणी तू अहं ची उपाधी लावून घेतलीस व पापाचरणाला प्रवृत्त झालास. तू देह नाहीस तर नित्य, शुध्द, बुद्ध, मुक्त, निर्विकल्प असा आत्मा आहेस तेव्हा विषय चिंतनाने पापकर्म करून देहाला जन्म मरणाच्या दुःख सागरात लोटु नकोस..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक ९४२१३४४९६० )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक