शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २३, जिथे अपाय आहे तिथे उपाय हा असतोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 15:00 IST

आपल्याला सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे याऐवजी सुख हे पर्वताएवढे दु:ख  जवाएवढे असे करायचे असेल तर हे करता येणे शक्य आहे का? तर हो हे करता येणे शक्य आहे पण यासाठी अखिल मानवजातीचा विचार करून प्रयत्न केले गेले पाहिजेत.

ठळक मुद्देमाणूस हा प्राणीच उपाय करु शकेल कारण इतर प्राण्यांकडे ती बुध्दी नाही.माणसाच्या ठिकाणी जी बुध्दी आहे त्या बुध्दीच्या बळावर त्याने प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे.प्रतिसृष्टीलाच आपण विज्ञान असे आपण म्हणतो. या विज्ञानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

- सदगुरू श्री वामनराव पै आपल्याला सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे याऐवजी सुख हे पर्वताएवढे दु:ख  जवाएवढे असे करायचे असेल तर हे करता येणे शक्य आहे का? तर हो हे करता येणे शक्य आहे पण यासाठी अखिल मानवजातीचा विचार करून प्रयत्न केले गेले पाहिजेत. पण आज अशी परिस्थिती नाही. आज माणसाला आपण सुखी असावे असे वाटते. तशी त्यांची इच्छा देखील असते व त्यासाठी माणूस प्रयत्नही करतो अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत तो त्यासाठी धडपड करतो तरीही त्याच्या वाटयाला दु:ख येते. याचे कारण याचा कुणी विचारच करत नाही. माणसाला असे वाटते की इतिहासाची पुर्नरावृत्ती होतच रहाणार. लोकांचा समजही असाच आहे की इतिहासाची पुर्नरावृती होतच रहाणार. लोक म्हणतात वामनराव याला काहीच उपाय नाही.जीवनविद्येला हे मुळीच मान्य नाही. जीवनविद्या असे सांगते की जिथे अपाय आहे तिथे उपाय हा असतोच. त्यामुळे या समस्येवर उपाय केला पाहिजे. माणूस हा प्राणीच उपाय करु शकेल कारण इतर प्राण्यांकडे ती बुध्दी नाही. इतर प्राणी आहार, निद्रा, भय, आणि मैथून यांच्या पलिकडे जात नाहीत. याच्या पलिकडे त्यांचे जग नाही.या चारांच्या पलिकडे इतर प्राणी जाऊ शकत नाही पण माणसाचे तसे नाही. माणूस या चारांच्या पलिकडे जावू शकतो व तो गेलेला देखील आहे. त्याने आतापार्यंत जे काही चमत्कार केलेले आहेत (मी हातचलाखीचे चमत्कार म्हणत नाही)विज्ञानाचे चमत्कार म्हणत आहे. कारण विज्ञानाचे चमत्कार वेगळे व बुवाबाबा करतात ते चमत्कार वेगळे. विज्ञानाने केलेले खरे चमत्कार जे आहेत ते डोळे दिपवून टाकणारे आहेत,मनाला चकित करणारे आहेत. माणसाच्या ठिकाणी जी बुध्दी आहे त्या बुध्दीच्या बळावर त्याने प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे. काही लोकांना प्रतिसृष्टी म्हणजे काय हे माहित नसेल. माणसाने प्रतिसृष्टी निर्मांण केली म्हणजे नेमके काय केले तर देवाने निर्माण केलेली सृष्टी म्हणजे डोंगर, नदया, झाडे, दगड, खनिजे वगैरे वगैरे पण हया सर्वांना एकत्र आणून माणसाने एक वेगळी सृष्टी निर्माण केली. उदाहरण दयायचे झाले तर घर अथवा इमारत बांधणे.परमेश्वराने जे काही निर्माण केलेले आहे ते माणूस एकत्र करतो व तो घर किंवा इमारत बांधतो. पण जर परमेश्वराने ते निर्मांणच केले नसते तर माणूसही काही करू  शकला नसता.देवाने सृष्टी निर्माण केली व माणसाने प्रतिसृष्टी निर्माण केली. विमान हे माणसाने निर्माण केलेली प्रतिसृष्टी आहे. पूर्वी उडण्याचा अधिकार फक्त पक्ष्यांनाच होता पण आज विमानाच्या सहाय्याने माणूसही हवेत उडतो आहे. पंख लावून उडणारी माणसेही टी.व्ही त दाखविली जातात. माणसाने निर्माण केलेल्या हया प्रतिसृष्टीलाच आपण विज्ञान असे आपण म्हणतो. या विज्ञानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.