शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सुख म्हणजे काय असते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 14:15 IST

आपल्याला आवडणारी गोष्ट जर सुख देण्यासाठी समर्थ असेल तर ती गोष्ट सर्वांनाच सुख देऊ शकेल काय?

मनुष्याला नेहमी आनंदाची अपेक्षा असते. आपल्या जीवनात असलेले दु:ख नष्ट व्हावे आणि आपल्याला सुख प्राप्त व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. हा आनंद मिळवण्यासाठी माणूस धन-स्त्री-मित्र-नानाविध भोग्य पदार्थ यांच्यामागे लागतो. आपल्याला जे काही सापडते त्याच्यातच आनंद आहे, असे माणसाला वाटते. परंतु, आपल्याला आवडणारी गोष्ट जर सुख देण्यासाठी समर्थ असेल तर ती गोष्ट सर्वांनाच सुख देऊ शकेल काय? याचा विचार आपण केला पाहिजे.

पदार्थजन्य सुखाच्या मागे लागताना आपण ज्या पदार्थांच्या मागे सुखाच्या अपेक्षेने लागतो तो पदार्थ पूर्वीपासूनच ज्याच्याजवळ आहे तो सुखी आहे काय? याचाही विचार केला पाहिजे आणि असा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला असे दिसून येते की, प्रत्येकजण आपल्याजवळ नसलेल्या वस्तू, सुखाचा शोध घेत असतो व तिच्यामागे धावत असतो. परंतु, ज्या पदार्थांच्या मागे जाऊन सुख मिळवण्याचा प्रयत्न केला जातो ते पदार्थ मानसिक दु:खजनक आहेत असे संतांचे म्हणणे आहे. 

येर ती मासिके दु:खाची जनिती ।नाही आदि अंती अवसानी ।।  

असे श्री तुकोबाराय स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे विषयांच्या उपभोगापासून, वस्तूंच्या लाभापासून सुख मिळेल ही समजूत संतांनी चुकीची ठरविली. विषयाचे सुख ही ‘बेगडाची बाहुलीच’ मानली. इंद्रियांची असमाधानी वृत्ती बाह्य विषयाकडे धाव घेत असते. परंतु, सुख हे आपल्याजवळ नसलेल्या वस्तूत नाही तर ते आपल्याजवळ असलेल्या आत्मवस्तूत आहे. ती आत्मवस्तू आपली आहे, हे अनुभवणे हाच परमार्थ होय. तोच परमार्थ श्री तुकोबाराय शिकवतात.

आपुला तो एक देव करुनि घ्यावा।तेणेविण जीवा सुख नोई ।। 

सुख हे बाहेरच्या वस्तूंचा लाभ झाल्यामुळे होणारे नसून देवाला आपले करण्यात आई, परमेश्वराच्या आश्रयातच आहे, असे संत-महात्मे वारंवार सांगतात. आपल्याला विषयात सुख वाटत असल्यामुळे आपण ते विषय पुरविणाऱ्या पदार्थांना आपलेसे करतो. परंतु, संतांच्या दृष्टीने जोपर्यंत ईश्वरावर प्रेम-भक्ती जडत नाही तोपर्यंत माणसाला सुखाचा ठेवा हस्तगत होणारच नाही. आपल्याला जे दु:ख होत असते ते मी म्हणजे देह असा देहाभिमान धारण केल्यामुळे होत असते.

 देहाभिमानाचे पोटी । अनंत दु:खाचिया कोटी ।।  

असे संत एकनाथ महाराजांनी म्हटलेलेच आहे. हा देहाभिमान टाकून देऊन आपण देवाला आपले करणे म्हणजे भक्तीच्या दृष्टीने आपण देवाचे भक्त आहोत असे जाणणे व ज्ञानदृष्टीने आपण देवाचे अंश आहोत, असे जाणणे व क्रमाने आपणच देव आहोत या अनुभूतीवर आरुढ होणे होय. यालाच देव आपला करुन घेणे म्हणता येईल. अशा पद्धतीने भक्तीच्या मार्गाने जाऊन देवाला आपला करुन घेणे हेच सुखाचे साधन संतांनी आपणास सांगितले. त्यावाचून सुख मिळणे अशक्य असल्यामुळेच श्री तुकोबाराय म्हणतात, तेणेविण जीवा सुख नोई ।

- प्रा.डॉ. शरदचंद्र देगलूरकर, धुंडा महाराज मठ संस्थान, देगलूर जि.नांदेड

टॅग्स :spiritualअध्यात्मिक