शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

सुख म्हणजे काय असते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 14:15 IST

आपल्याला आवडणारी गोष्ट जर सुख देण्यासाठी समर्थ असेल तर ती गोष्ट सर्वांनाच सुख देऊ शकेल काय?

मनुष्याला नेहमी आनंदाची अपेक्षा असते. आपल्या जीवनात असलेले दु:ख नष्ट व्हावे आणि आपल्याला सुख प्राप्त व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. हा आनंद मिळवण्यासाठी माणूस धन-स्त्री-मित्र-नानाविध भोग्य पदार्थ यांच्यामागे लागतो. आपल्याला जे काही सापडते त्याच्यातच आनंद आहे, असे माणसाला वाटते. परंतु, आपल्याला आवडणारी गोष्ट जर सुख देण्यासाठी समर्थ असेल तर ती गोष्ट सर्वांनाच सुख देऊ शकेल काय? याचा विचार आपण केला पाहिजे.

पदार्थजन्य सुखाच्या मागे लागताना आपण ज्या पदार्थांच्या मागे सुखाच्या अपेक्षेने लागतो तो पदार्थ पूर्वीपासूनच ज्याच्याजवळ आहे तो सुखी आहे काय? याचाही विचार केला पाहिजे आणि असा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला असे दिसून येते की, प्रत्येकजण आपल्याजवळ नसलेल्या वस्तू, सुखाचा शोध घेत असतो व तिच्यामागे धावत असतो. परंतु, ज्या पदार्थांच्या मागे जाऊन सुख मिळवण्याचा प्रयत्न केला जातो ते पदार्थ मानसिक दु:खजनक आहेत असे संतांचे म्हणणे आहे. 

येर ती मासिके दु:खाची जनिती ।नाही आदि अंती अवसानी ।।  

असे श्री तुकोबाराय स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे विषयांच्या उपभोगापासून, वस्तूंच्या लाभापासून सुख मिळेल ही समजूत संतांनी चुकीची ठरविली. विषयाचे सुख ही ‘बेगडाची बाहुलीच’ मानली. इंद्रियांची असमाधानी वृत्ती बाह्य विषयाकडे धाव घेत असते. परंतु, सुख हे आपल्याजवळ नसलेल्या वस्तूत नाही तर ते आपल्याजवळ असलेल्या आत्मवस्तूत आहे. ती आत्मवस्तू आपली आहे, हे अनुभवणे हाच परमार्थ होय. तोच परमार्थ श्री तुकोबाराय शिकवतात.

आपुला तो एक देव करुनि घ्यावा।तेणेविण जीवा सुख नोई ।। 

सुख हे बाहेरच्या वस्तूंचा लाभ झाल्यामुळे होणारे नसून देवाला आपले करण्यात आई, परमेश्वराच्या आश्रयातच आहे, असे संत-महात्मे वारंवार सांगतात. आपल्याला विषयात सुख वाटत असल्यामुळे आपण ते विषय पुरविणाऱ्या पदार्थांना आपलेसे करतो. परंतु, संतांच्या दृष्टीने जोपर्यंत ईश्वरावर प्रेम-भक्ती जडत नाही तोपर्यंत माणसाला सुखाचा ठेवा हस्तगत होणारच नाही. आपल्याला जे दु:ख होत असते ते मी म्हणजे देह असा देहाभिमान धारण केल्यामुळे होत असते.

 देहाभिमानाचे पोटी । अनंत दु:खाचिया कोटी ।।  

असे संत एकनाथ महाराजांनी म्हटलेलेच आहे. हा देहाभिमान टाकून देऊन आपण देवाला आपले करणे म्हणजे भक्तीच्या दृष्टीने आपण देवाचे भक्त आहोत असे जाणणे व ज्ञानदृष्टीने आपण देवाचे अंश आहोत, असे जाणणे व क्रमाने आपणच देव आहोत या अनुभूतीवर आरुढ होणे होय. यालाच देव आपला करुन घेणे म्हणता येईल. अशा पद्धतीने भक्तीच्या मार्गाने जाऊन देवाला आपला करुन घेणे हेच सुखाचे साधन संतांनी आपणास सांगितले. त्यावाचून सुख मिळणे अशक्य असल्यामुळेच श्री तुकोबाराय म्हणतात, तेणेविण जीवा सुख नोई ।

- प्रा.डॉ. शरदचंद्र देगलूरकर, धुंडा महाराज मठ संस्थान, देगलूर जि.नांदेड

टॅग्स :spiritualअध्यात्मिक