शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

वारी : व्यापक विचारांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:38 IST

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील आशयाप्रमाणे वारकरी भाविकांचा संत वचनावर नितांत विश्वास आहे.

संताचिये पायी हा, माझा विश्वाससर्वभावे दास, झालो त्यांचासंत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील आशयाप्रमाणे वारकरी भाविकांचा संत वचनावर नितांत विश्वास आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानकाकांच्या पालखीचा अनोखा संगम सासवडमध्ये पाहायला मिळतो. सासवडमध्ये संत सोपानकाका यांच्या पालखीचे प्रस्थान होते. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी संतांचे स्थान आहे, त्या ठिकाणावरुन त्या त्या संतांची पालखी प्रस्थान करते. त्यामुळे आषाढी वारीत मानाच्या पालख्यांचा सन्मान केला जातो. श्रीक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते. श्रीक्षेत्र पैठण येथून संत एकनाथ महाराजांची पालखी निघते. श्रीक्षेत्र मेहून येथून संत मुक्ताबार्इंची पालखी निघते. शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी निघते. अशा अनेक ठिकाणांवरून पालख्या वारीनिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या सर्व पालख्यांचे स्वागत पंढरपूर येथे केले जाते. वारकरी संप्रदायामध्ये हे वेगळेपण आहे की, संत कोणत्याही जातीतील असो किंवा पंथातील असो त्यांचा समावेश वारकरी संप्रदायामध्ये आहे हे आपल्याला पाहायला मिळते. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी ही एकच जात पाहिली जाते. त्यामुळेच वारकरी परंपरेमध्ये स्त्री-पुरुष, जात-पात, वर्ण-आश्रम, धर्म-पंथ पाहिले जात नाही. विश्वामध्ये व्यापक विचार मांडणारा केवळ एकमेव वारकरी संप्रदाय आहे.हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिरकिंबहुना चराचर, आपण जाहलोया संत वचनाप्रमाणे वारकरी परंपरा व्यापक पाहायला मिळते. कारण या पालखी सोहळ्यामध्ये स्त्री-पुरुष सर्वजण एकत्रित पद्धतीने फुगडी खेळणे आणि पाऊले खेळणे असे विविध प्रकार वारीमध्ये चालत असताना पाहायला मिळतात. भेदभावरहित होऊन समन्वयाने भजन, कीर्तन करत ही सर्व मंडळी पंढरपूरकडे चालत येतात. वारी कालावधीमध्ये चालत असणाऱ्या भाविकांच्या मनात सात्विक भाव असतो. प्रत्येकजण एकाच विचारांमध्ये चालू राहतो की, मला माझ्या पांडुरंगाला भेटायचे आहे. या विचारांमध्ये चालत असताना आपण संत ज्ञानेश्वर माऊलींबरोबर म्हणजेच एका महान संतांबरोबर चालत आहोत याचे समाधान असते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये आत्मिक समाधान प्राप्त झाल्याचे त्यांच्या चेहºयावरून ओसंडत असते. वैचारिक आणि श्रद्धायुक्त प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये फक्त वारकरी संप्रदायामध्ये पाहावयास मिळतो. कारण श्रद्धाची विशिष्ट उंची व बौद्धिक उंची पालखी सोहळ्यांमध्ये चालत असताना पाहावयास मिळते. त्यामुळे वारकरी भाविकांना पालखी सोहळ्यासाठी कोणत्याही प्रकारचे आमंत्रण द्यावे लागत नाही. लौकिक उपचाराची अपेक्षा न ठेवता वारकरी भाविक सोहळ्यामध्ये सहभागी होतात. हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे.

- सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :spiritualअध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारीAdhyatmikआध्यात्मिक