शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

वारी : व्यापक विचारांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:38 IST

संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील आशयाप्रमाणे वारकरी भाविकांचा संत वचनावर नितांत विश्वास आहे.

संताचिये पायी हा, माझा विश्वाससर्वभावे दास, झालो त्यांचासंत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील आशयाप्रमाणे वारकरी भाविकांचा संत वचनावर नितांत विश्वास आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानकाकांच्या पालखीचा अनोखा संगम सासवडमध्ये पाहायला मिळतो. सासवडमध्ये संत सोपानकाका यांच्या पालखीचे प्रस्थान होते. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी संतांचे स्थान आहे, त्या ठिकाणावरुन त्या त्या संतांची पालखी प्रस्थान करते. त्यामुळे आषाढी वारीत मानाच्या पालख्यांचा सन्मान केला जातो. श्रीक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते. श्रीक्षेत्र पैठण येथून संत एकनाथ महाराजांची पालखी निघते. श्रीक्षेत्र मेहून येथून संत मुक्ताबार्इंची पालखी निघते. शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी निघते. अशा अनेक ठिकाणांवरून पालख्या वारीनिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या सर्व पालख्यांचे स्वागत पंढरपूर येथे केले जाते. वारकरी संप्रदायामध्ये हे वेगळेपण आहे की, संत कोणत्याही जातीतील असो किंवा पंथातील असो त्यांचा समावेश वारकरी संप्रदायामध्ये आहे हे आपल्याला पाहायला मिळते. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी ही एकच जात पाहिली जाते. त्यामुळेच वारकरी परंपरेमध्ये स्त्री-पुरुष, जात-पात, वर्ण-आश्रम, धर्म-पंथ पाहिले जात नाही. विश्वामध्ये व्यापक विचार मांडणारा केवळ एकमेव वारकरी संप्रदाय आहे.हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिरकिंबहुना चराचर, आपण जाहलोया संत वचनाप्रमाणे वारकरी परंपरा व्यापक पाहायला मिळते. कारण या पालखी सोहळ्यामध्ये स्त्री-पुरुष सर्वजण एकत्रित पद्धतीने फुगडी खेळणे आणि पाऊले खेळणे असे विविध प्रकार वारीमध्ये चालत असताना पाहायला मिळतात. भेदभावरहित होऊन समन्वयाने भजन, कीर्तन करत ही सर्व मंडळी पंढरपूरकडे चालत येतात. वारी कालावधीमध्ये चालत असणाऱ्या भाविकांच्या मनात सात्विक भाव असतो. प्रत्येकजण एकाच विचारांमध्ये चालू राहतो की, मला माझ्या पांडुरंगाला भेटायचे आहे. या विचारांमध्ये चालत असताना आपण संत ज्ञानेश्वर माऊलींबरोबर म्हणजेच एका महान संतांबरोबर चालत आहोत याचे समाधान असते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये आत्मिक समाधान प्राप्त झाल्याचे त्यांच्या चेहºयावरून ओसंडत असते. वैचारिक आणि श्रद्धायुक्त प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये फक्त वारकरी संप्रदायामध्ये पाहावयास मिळतो. कारण श्रद्धाची विशिष्ट उंची व बौद्धिक उंची पालखी सोहळ्यांमध्ये चालत असताना पाहावयास मिळते. त्यामुळे वारकरी भाविकांना पालखी सोहळ्यासाठी कोणत्याही प्रकारचे आमंत्रण द्यावे लागत नाही. लौकिक उपचाराची अपेक्षा न ठेवता वारकरी भाविक सोहळ्यामध्ये सहभागी होतात. हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे.

- सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :spiritualअध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारीAdhyatmikआध्यात्मिक