शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

वेढा रे वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातीरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 04:59 IST

- इंद्रजीत देशमुख जगाच्या कल्याणाची वांच्छना करणाऱ्या जगातील सगळ्याच संतांनी समाजातील निकोपता अबाधित राहावी यासाठी खूप प्रयत्न केले. साधना ...

- इंद्रजीत देशमुखजगाच्या कल्याणाची वांच्छना करणाऱ्या जगातील सगळ्याच संतांनी समाजातील निकोपता अबाधित राहावी यासाठी खूप प्रयत्न केले. साधना आणि साधनामार्ग यांच्या जोपासनेसाठी व्यक्ती निकोप असली पाहिजे. द्वेष, मत्सर, आकस, रोष अशा सात्त्विक प्रभावाच्या परिणामासाठी अभाव ठरणाºया गोष्टी अंतरी धरून आम्हाला कधीच साधना करता येणार नाही. हे सगळे उरी धरून साधनेचा प्रयत्न केलाच, तर ते निव्वळ साधनेचं नाटक ठरू शकतं. माउलींच्याच भाषेत सांगायचं झालं तर,‘एरव्ही तरी पंडूसूता। आत शुद्ध नसता।बाहेरी करमु तो तत्त्वता। विटंबु गा।।’अशी अवस्था होऊ शकते. अशा प्रकारे अंतरी मालिन्य धरून दार्शनिक शालीन्य स्वीकारून व्यक्ती आपले आणि समाजाचे हित साधूच शकत नाही, म्हणून संतांनी आम्हाला वर्तन नियमन शिकवले आणि त्या नियमनाची अंमलबजावणी स्वत:कडून जगाकडे अशी अनुसरली. याच अनुसरणाचा बोध देताना तुकाराम महाराज म्हणतात,‘वेढा रे वेढा रे पंढरी। मोर्चे लावा भीमातीरी।।’इथं पंढरी वेढायला सांगतात. वास्तविक पंढरी म्हणजे पंढरपूर असंही म्हणता येईल; पण तात्त्विकदृष्ट्या आमच्या नाथरायांनी म्हटल्याप्रमाणे,‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल।नांदतो केवळ पांडुरंग।।असा अर्थ इथं अपेक्षित आहे. आपल्या शरीररूपी पंढरीभोवती मोर्चा उभा करा. जेणेकरून भोवताली पतनासाठी उभ्या असलेल्या उपलब्धीमागे हे शरीर जाऊ शकणार नाही. वैयक्तिक आचरण नियमनाचा आग्रह धरण्यापाठीमागे संतांचा उद्देश असा असतो की, जगातील इतरांच्या बाह्य अभिनिवेशावर आपण विचलित होऊ नये. बाहेर भोवताली कोणतीही परिस्थिती असो, पण आपण विचलित व्हायचं नाही, असं संतांचं सांगणं आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक