शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

वेढा रे वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातीरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 04:59 IST

- इंद्रजीत देशमुख जगाच्या कल्याणाची वांच्छना करणाऱ्या जगातील सगळ्याच संतांनी समाजातील निकोपता अबाधित राहावी यासाठी खूप प्रयत्न केले. साधना ...

- इंद्रजीत देशमुखजगाच्या कल्याणाची वांच्छना करणाऱ्या जगातील सगळ्याच संतांनी समाजातील निकोपता अबाधित राहावी यासाठी खूप प्रयत्न केले. साधना आणि साधनामार्ग यांच्या जोपासनेसाठी व्यक्ती निकोप असली पाहिजे. द्वेष, मत्सर, आकस, रोष अशा सात्त्विक प्रभावाच्या परिणामासाठी अभाव ठरणाºया गोष्टी अंतरी धरून आम्हाला कधीच साधना करता येणार नाही. हे सगळे उरी धरून साधनेचा प्रयत्न केलाच, तर ते निव्वळ साधनेचं नाटक ठरू शकतं. माउलींच्याच भाषेत सांगायचं झालं तर,‘एरव्ही तरी पंडूसूता। आत शुद्ध नसता।बाहेरी करमु तो तत्त्वता। विटंबु गा।।’अशी अवस्था होऊ शकते. अशा प्रकारे अंतरी मालिन्य धरून दार्शनिक शालीन्य स्वीकारून व्यक्ती आपले आणि समाजाचे हित साधूच शकत नाही, म्हणून संतांनी आम्हाला वर्तन नियमन शिकवले आणि त्या नियमनाची अंमलबजावणी स्वत:कडून जगाकडे अशी अनुसरली. याच अनुसरणाचा बोध देताना तुकाराम महाराज म्हणतात,‘वेढा रे वेढा रे पंढरी। मोर्चे लावा भीमातीरी।।’इथं पंढरी वेढायला सांगतात. वास्तविक पंढरी म्हणजे पंढरपूर असंही म्हणता येईल; पण तात्त्विकदृष्ट्या आमच्या नाथरायांनी म्हटल्याप्रमाणे,‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल।नांदतो केवळ पांडुरंग।।असा अर्थ इथं अपेक्षित आहे. आपल्या शरीररूपी पंढरीभोवती मोर्चा उभा करा. जेणेकरून भोवताली पतनासाठी उभ्या असलेल्या उपलब्धीमागे हे शरीर जाऊ शकणार नाही. वैयक्तिक आचरण नियमनाचा आग्रह धरण्यापाठीमागे संतांचा उद्देश असा असतो की, जगातील इतरांच्या बाह्य अभिनिवेशावर आपण विचलित होऊ नये. बाहेर भोवताली कोणतीही परिस्थिती असो, पण आपण विचलित व्हायचं नाही, असं संतांचं सांगणं आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक