शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

उदे गं अंबे उदे : आज चौथी माळ, अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी

By दा. कृ. सोमण | Updated: September 24, 2017 02:50 IST

आज रविवार, २४ सप्टेंबर, आश्विन शुक्ल चतुर्थी आहे. आज अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी आहे. आज देवीची पूजा करून देवीसमोर चौथी माळ बांधावयाची आहे.मित्रांनो, हे कलियुग आहे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५,११८ वर्षे मागे पडली असून, अजून ४ लक्ष २६ हजार ८८२ वर्षे शिल्लक आहेत. कलियुगापूर्वी देवी उपासकांची प्रार्थना ऐकून ...

आज रविवार, २४ सप्टेंबर, आश्विन शुक्ल चतुर्थी आहे. आज अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी आहे. आज देवीची पूजा करून देवीसमोर चौथी माळ बांधावयाची आहे.मित्रांनो, हे कलियुग आहे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५,११८ वर्षे मागे पडली असून, अजून ४ लक्ष २६ हजार ८८२ वर्षे शिल्लक आहेत. कलियुगापूर्वी देवी उपासकांची प्रार्थना ऐकून उपासकांना उलट प्रश्न विचारत नव्हती, परंतु हे कलियुग आहे. त्यामुळे भक्तांच्या प्रार्थना ऐकून देवी प्रश्न विचारू शकते.उपासक देवीची पूजा करून देवीची प्रार्थना करतात. काही उपासक प्रार्थना केल्यावर देवीकडे काही ना काही मागणे मागीत असतात. देवी, तू मला संपत्ती दे. मला नोकरी व्यवसायात यश दे. माझे आरोग्य चांगले राहू दे. माझा आजार दूर होऊ दे. मला राहायला घर मिळवून दे. लग्न लवकर होऊ दे. घरात पाळणा हलू दे, अशा प्रकारच्या एक नाही, तर अनेक प्रकारच्या मागण्या देवीपुढे करीत असतात. काही भक्त तर देवीला नवस बोलत असतात. माझे हे काम झाले, तर अमुक पैसे मी तुझ्यापुढील पेटीत टाकीन, मी तुला तमुक नैवेद्य दाखवीन वगैरे वगैरे.परंतु लगेचच देवी भक्ताला काही प्रश्न विचारत असते. तू मेहनती आहेस का? तू नीतिमान आहेस का? तू निर्व्यसनी आहेस का? तू समाजातील गरीब, दीन-दुबळ्यांना मदत करतोस का? तू महिलांचा आदर करतोस का? तू राष्ट्रभक्त आहेस का? तू सकाळी लवकर उठतोस का? तू आर्थिक बचत करतोस का? असे अनेक प्रश्न देवीही विचारत असते.भक्त जसे बोलतो, तसे करतो का? हे देवीला नीट कळत असते. मगच देवी काय करायचे, ते ठरवीत असते. देवी स्वत: श्रीमहालक्ष्मी असल्यामुळे तिला तुमच्या पैशांची आवश्यकता नसते. ती स्वत: अन्नपूर्णा असल्याने, तिला तुमच्या मोठ्या नैवेद्याचीही गरज नसते. त्यामुळे भक्ताने फलप्राप्तीसाठी केवळ पूजा करणे पुरेसे ठरणार नाही, तर स्वत: देवीच्या इच्छेप्रमाणे कृती करण्याची खरी गरज आहे.आज समाजात आळस, अंधश्रद्धा, अविचार, भ्रष्टाचार, अनीती, अस्वच्छता, अज्ञान इत्यादी राक्षस थैमान घालत आहेत. या राक्षसांना ठार मारण्यासाठी देवी आता अवतार घेणार नाही. हे काम प्रामाणिक भक्तांनीच करावयाचे आहे.घरातील देवतानवरात्रात मंदिरातील आणि देव्हाºयातील देवीची पूजा व आरती जोरात केली जात असते, पण घरात चोवीस तास, तीनशे पासष्ट दिवस वावरणाºया देवीकडे काही लोक दुर्लक्ष करतात, हे योग्य नाही. कारण मंदिरातील किंवा देव्हाºयातील देवीपेक्षा घरात वावरणारी देवी जास्त महत्त्वाची आहे. आजी, आई, पत्नी, बहीण, मुलगी, नात या महान देवता आहेत.देवी नवसाला पावते, हा एक मोठा गैरसमज आहे. ती नवसाला पावत नसते. ती पावत असती, तर खूप बरे झाले असते. आतंकवाद्यांना नवस बोलून नष्ट करता आले असते. त्यासाठी आपण सर्वांनी देवीची प्रार्थना करू या, हे देवी मला नेहमी सद्बुद्धी लाभो!या देवी सर्व भूतेषु,बुद्धिरूपेण संस्थिता ।नमस्तस्यै नमस्तस्यैनमस्तस्यै नमो नम: ।।

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७