शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

उदे गं अंबे उदे : आज चौथी माळ, अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी

By दा. कृ. सोमण | Updated: September 24, 2017 02:50 IST

आज रविवार, २४ सप्टेंबर, आश्विन शुक्ल चतुर्थी आहे. आज अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी आहे. आज देवीची पूजा करून देवीसमोर चौथी माळ बांधावयाची आहे.मित्रांनो, हे कलियुग आहे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५,११८ वर्षे मागे पडली असून, अजून ४ लक्ष २६ हजार ८८२ वर्षे शिल्लक आहेत. कलियुगापूर्वी देवी उपासकांची प्रार्थना ऐकून ...

आज रविवार, २४ सप्टेंबर, आश्विन शुक्ल चतुर्थी आहे. आज अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी आहे. आज देवीची पूजा करून देवीसमोर चौथी माळ बांधावयाची आहे.मित्रांनो, हे कलियुग आहे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५,११८ वर्षे मागे पडली असून, अजून ४ लक्ष २६ हजार ८८२ वर्षे शिल्लक आहेत. कलियुगापूर्वी देवी उपासकांची प्रार्थना ऐकून उपासकांना उलट प्रश्न विचारत नव्हती, परंतु हे कलियुग आहे. त्यामुळे भक्तांच्या प्रार्थना ऐकून देवी प्रश्न विचारू शकते.उपासक देवीची पूजा करून देवीची प्रार्थना करतात. काही उपासक प्रार्थना केल्यावर देवीकडे काही ना काही मागणे मागीत असतात. देवी, तू मला संपत्ती दे. मला नोकरी व्यवसायात यश दे. माझे आरोग्य चांगले राहू दे. माझा आजार दूर होऊ दे. मला राहायला घर मिळवून दे. लग्न लवकर होऊ दे. घरात पाळणा हलू दे, अशा प्रकारच्या एक नाही, तर अनेक प्रकारच्या मागण्या देवीपुढे करीत असतात. काही भक्त तर देवीला नवस बोलत असतात. माझे हे काम झाले, तर अमुक पैसे मी तुझ्यापुढील पेटीत टाकीन, मी तुला तमुक नैवेद्य दाखवीन वगैरे वगैरे.परंतु लगेचच देवी भक्ताला काही प्रश्न विचारत असते. तू मेहनती आहेस का? तू नीतिमान आहेस का? तू निर्व्यसनी आहेस का? तू समाजातील गरीब, दीन-दुबळ्यांना मदत करतोस का? तू महिलांचा आदर करतोस का? तू राष्ट्रभक्त आहेस का? तू सकाळी लवकर उठतोस का? तू आर्थिक बचत करतोस का? असे अनेक प्रश्न देवीही विचारत असते.भक्त जसे बोलतो, तसे करतो का? हे देवीला नीट कळत असते. मगच देवी काय करायचे, ते ठरवीत असते. देवी स्वत: श्रीमहालक्ष्मी असल्यामुळे तिला तुमच्या पैशांची आवश्यकता नसते. ती स्वत: अन्नपूर्णा असल्याने, तिला तुमच्या मोठ्या नैवेद्याचीही गरज नसते. त्यामुळे भक्ताने फलप्राप्तीसाठी केवळ पूजा करणे पुरेसे ठरणार नाही, तर स्वत: देवीच्या इच्छेप्रमाणे कृती करण्याची खरी गरज आहे.आज समाजात आळस, अंधश्रद्धा, अविचार, भ्रष्टाचार, अनीती, अस्वच्छता, अज्ञान इत्यादी राक्षस थैमान घालत आहेत. या राक्षसांना ठार मारण्यासाठी देवी आता अवतार घेणार नाही. हे काम प्रामाणिक भक्तांनीच करावयाचे आहे.घरातील देवतानवरात्रात मंदिरातील आणि देव्हाºयातील देवीची पूजा व आरती जोरात केली जात असते, पण घरात चोवीस तास, तीनशे पासष्ट दिवस वावरणाºया देवीकडे काही लोक दुर्लक्ष करतात, हे योग्य नाही. कारण मंदिरातील किंवा देव्हाºयातील देवीपेक्षा घरात वावरणारी देवी जास्त महत्त्वाची आहे. आजी, आई, पत्नी, बहीण, मुलगी, नात या महान देवता आहेत.देवी नवसाला पावते, हा एक मोठा गैरसमज आहे. ती नवसाला पावत नसते. ती पावत असती, तर खूप बरे झाले असते. आतंकवाद्यांना नवस बोलून नष्ट करता आले असते. त्यासाठी आपण सर्वांनी देवीची प्रार्थना करू या, हे देवी मला नेहमी सद्बुद्धी लाभो!या देवी सर्व भूतेषु,बुद्धिरूपेण संस्थिता ।नमस्तस्यै नमस्तस्यैनमस्तस्यै नमो नम: ।।

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७