शहरं
Join us  
Trending Stories
1
NASHIK FIRE BREAKING VIDEO: नाशिकमध्ये अग्निकल्लोळ! प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग; १८ बंब पोहोचले, तरीही...
2
निलंबित PSI रणजीत कासले पुण्यात दाखल; निवडणुकीत गप्प राहण्यासाठी कराडने पैसे दिल्याचा आरोप
3
IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला!
4
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले
5
तात्पुरता दिलासा की क्लीन चिट? ससूनच्या चार पानी अहवालात दीनानाथ रुग्णालय, डॉ. घैसास यांच्यावर ठपका नाही
6
MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...
7
दूतावासामधून तक्रार, सरकारने जेएनयूच्या ज्येष्ठ प्राध्यापकांना तातडीने केलं बरखास्त, केलं होतं धक्कादायक कृत्य
8
“हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला”: विजय वडेट्टीवार
9
पांड्याचं सेलिब्रेशन झालं! हेडनं मान खाली घालून पॅव्हेलियनचा रस्ता धरलेला अन् 'सायरन' वाजला
10
वेलांटी, मात्रा चुकल्याने बोगसपणा उघड; शिक्षण घोटाळ्यात बोगस कागदपत्रे बनविणारा अखेर सापडला
11
भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष वयाच्या ६१ व्या वर्षी बांधणार लग्नगाठ, पक्षाच्या महिला कार्यकर्तीसोबत अडकणार विवाह बंधनात
12
अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
13
…तर ते कागद दाखवावे लागतील?, नव्या ‘वक्फ’ कायद्यावरील सुनावणीत ती मेख, केंद्र होणार खूश   
14
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
15
आयटेलचा 'एआय'वाला ए९५ स्मार्टफोन लाँच; १०,००० च्या आत किंमत...
16
IPL 2025 MI vs SRH : काय करायचं त्या बॉलरनं? दीपक चाहरनं जोर लावला! पण...
17
VIDEO: परप्रांतीय विक्रेत्याने गटारात धुतले ताडगोळे; खेडमधील किळसवाणा प्रकार
18
बॉम्ब हल्ला प्रकरणात लष्कराच्या जवानाला अटक; गँगस्टरला इंस्टाग्रामवरुन दिले ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण
19
आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा
20
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली

‘तुका आकाशाएवढा’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 13:54 IST

‘अणु-रेणु या थोकडा । तुका आकाशाएवढा।’ प्रस्तुत अभंगाचे चरण जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे असून, ते म्हणतात मी अणु-रेणूपेक्षाही सूक्ष्म असून, आकाशाएवढा मोठा आहे.

‘अणु-रेणु या थोकडा । तुका आकाशाएवढा।’ प्रस्तुत अभंगाचे चरण जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे असून, ते म्हणतात मी अणु-रेणूपेक्षाही सूक्ष्म असून, आकाशाएवढा मोठा आहे. या सृष्टीमधील अणु-रेणुमध्ये ईश्वरी चैतन्य शक्ती अति सूक्ष्म असून, संपूर्ण ब्रम्हांडामधील घटकात तिचे अस्तित्व आकाशापेक्षाही मोठे आहे. ही चैतन्यशक्ती प्रत्येक माणसात असल्याचे तुकोबा स्पष्ट करतात. ‘ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस।।’ या संत बहिणाबार्इंच्या अभंगात म्हटल्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी सांप्रदायास अद्वैत तत्त्वज्ञान प्राप्त करून दिले असल्याने  त्यांना रचियता म्हटले जाते व संत तुकाराम महाराज या सांप्रदायाचे कळस ठरले आहेत. आपल्या अभिजात अभंग रचनेमधून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले असून, मराठी भाषेला व साहित्याला सर्वश्रेष्ठ उंची प्राप्त करून देणारे ठरले आहेत. म्हणून ‘तुकाराम गाथेला’ पाचवा वेद म्हटल्या जाते. संत तुकोबांचा जन्म सोळाव्या शतकात इ. स. १६0८ मध्ये देहू गावी झाला. वडील बोल्होबा, आई कनकाई, थोरले बंधू सावजी, मधले तुकाराम व धाकटे कान्होबा होत. श्री विश्वंभर बाबा हे आद्य पुरुष असून, त्यांच्यापासून आठव्या पिढीत संत तुकारामांचा जन्म झाला. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार करता सर्वसामान्य जनता हवालदिल झाली होती. चतुर्वर्णाश्रम पद्धतीमुळे सामाजिक विषमता व जातीभेदाचे साम्राज्य सर्व दूर पसरले होते. देवाच्या व धर्माच्या नावावर अतिरेक करून समाजाची दिशाभूल केली जात होती. ज्ञान, कर्म, धर्म व भक्ती यांचे यथार्थ स्वरूप न सांगता सामाजिक वातावरण प्रदूषित केल्या जात होते. ‘बुडति हे जन न देखवे डोळा । येतो  कळवळा म्हणोनिया ।।’ तुकोबाचे संत मन जागृत होऊन कठोर, परखड उपदेशात्मक विचार ते आपल्या अभंगातून मांडतात. -मुखे सांगे ब्रम्हज्ञान । जन लोकाची कापतो मान ।। कथा करिता देवाची । अंतरी आशा बहु लोभाची ।। तुका म्हणे तोचि वेडा । त्याचे हानुनी थोबाड फोडा ।।ज्ञान सांगणाºयास जर अनुभूति नसेल, देवाच्या नावावर समाजाला फसवून पोट भरत असेल. धनाची आशा ठेवत असेल तर त्याच्या थोबाडीत मारले पाहिजे.  त्याच तुकोबाला  २३ जानेवारी १९६0 मध्ये स्वप्नात दृष्टांताद्वारे सद्गुरुची प्राप्ती व ‘रामकृष्ण हरी’ मंत्र मिळाला आहे. जो वारकरी सांप्रदायाचा मूलमंत्र आहे. बाबाची आपुले सांगितले नाम । मंत्र दिला रामकृष्ण हरी ।। माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ।। तुकोबांना स्वप्नातील दृष्टांत माघ शुद्ध दशमी गुरुवारी झाला असून, या शुभ दिवशी सद्गुरुद्वारे ते अनुग्रहित झाले व सद्गुरुची परंपरा सांगताना सद्गुरु राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य अशी परंपरा सांगितली आहे. तुकोबाच्या ध्यानी, मनी, स्वप्नी व जागृती पांडुरंगाचाच ध्यास असे, प्रपंचामधून परमार्थाकडे त्यांची वाटचाल स्वत:च्या अनुभूतिद्वारे झाली आहे. ईश्वरी भक्तीचा वास असणाºया माणसांमध्ये भेदाभेद कधीही करू नये. धर्म, वंश, जात, पंथ या पलीकडाचा मानवतावाद व समतावाद त्यांनी समाजापुढे मांडला आहे :-विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगल कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।। दीनदलित व रंजल्या गांजल्यांची सेवा करणारा, त्यांचे दु:ख जाणून ते दूर करण्यास मदत करणारा, वात्सल्य व ममतवादी माणूसच खरा  साधुसंत असतो. लोण्याप्रमाणे ज्याचे चित्त निर्मळ, शुद्ध व सात्विक असते त्याचे कोणीही वाली नाही, त्यास आपल्या अंत:करणातून प्रेम करणारा खरा साधू असतो. तीच भगवंताची मूर्ती असल्याचे संत तुकाराम महाराज सांगतात. माणसाने प्रयत्नवादी व परिश्रमाने आपले ध्येय , उद्दिष्ट साध्य करावे, त्याकरिता व्यवहारामधील विविध दृष्टांत ते देतात तर आपला व्यवहार हा प्रामाणिकपणे व इमाने इतबारे करण्यात यावा, प्रपंचात राहून परमार्थ कसा, असे ते मोठ्या मार्मिकतेने सांगतात.जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।।भूत दया गाईपशुचे पालन ।  तान्हेल्या जीवन वनामाजी ।।परोपकारी नेणे परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणीमाना।।आपले जीवन जगत असताना इतरांची निंदा कधीही करू नये.  कठीण प्रसंगात सहकार्याची, उपकाराची आपली वृत्ती अंगीकारणे हिताचे ठरते. याशिवाय आपल्या दृष्टीसमोर येणारी महिला ही माझी माता- भगिनी आहे, ही आपली दृष्टी व दृृष्टिकोन असावा. आपल्या घरात असणाºया गाई इ. पशुंचे प्रामाणिकपणे व दयाभाव वृत्तीने पालन- पोषण करावे व रानावनात असणारे पशुपक्षी यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करावा. यालाच तुकोबांनी परमार्थ म्हटला आहे. संत तुकोबा आपल्या अभंगवाणी रचनेचे श्रेय स्वत:कडे न ठेवता इश्वराला देतात. ते म्हणतात.. आपुल्या बळे नाही मी बोलत। सखा भगवंत वाचा त्याची।।साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी । शिकविता धनी वेगळाची।।संत तुकाराम महाराजांची अभंगवाणी आजही समाजाला प्रेरणा देणारी व मार्गदर्शन करणारी आहे. अशा संतांच्या चरणी शतश: नतमस्तक.

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक