शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

' लक्ष्मी' या शब्दाचा खरा अर्थ 'लक्ष कमी' असा असावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 14:04 IST

ही देवता किती जरी प्राप्त झाली तरी त्याच्या मनाचे समाधान होत नाही.

हिंदू संस्कृती मध्ये लक्ष्मी या देवतेला अत्यंत पूज्य व महत्त्वाची देवता मानले जाते. दिपावली मध्ये तर लक्ष्मी पूजनाचे अत्यंत महत्त्व आहे. ही देवता प्रसन्न व्हावी म्हणून अनेक जण वाटेल ते कर्मकांड करायला तयार असतात. लक्ष्मी प्रसन्न असावी, तिची कृपा आपल्या घरावर, कुटुंबावर रहावी, म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक सुवासिनी दर गुरुवारी उपवास करून, विधीवत मनोभावे लक्ष्मीची आराधन करतात. लक्ष्मी प्रसन्न असणारा व्यक्ती अत्यंत सुखी, समाधानी तसेच नशिबवान समजला जातो. या देवतेला प्रसन्न करण्यासाठी तसेच ती प्राप्त करण्यासाठी व्यक्ती काहीही करायला तयार असतो.

धन, दौलत, जमीन-जुमला, दाग-दागिने या गोष्टींना आपण लक्ष्मीचे प्रतिक मानतो. तसेच घराचा सर्व कारभार बघणाऱ्या घरातील स्त्रियांना आपण लक्ष्मीच संबोधतो. आजच्या काळात तर या देवतेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ही देवता ज्याच्यावर प्रसन्न असेल, त्याच्या मागे सर्व जग धावते. तसे बघितल्यास खरंच लक्ष्मी प्रसन्न असल्यावर व्यक्ती सुखी समाधानी असतो का ? लक्ष्मी चा खरा अर्थ काय ? तो जाणून घेण्याचा कुणी प्रयत्न केला का ? 

खरे तर लक्ष्मी या शब्दाचा अर्थ “ लक्ष कमी ” असा असावा. कारण व्यक्ती धन, दौलत, जमीन-जुमला, दाग-दागिने यांना लक्ष्मी मानतो. ही देवता किती जरी प्राप्त झाली तरी त्याच्या मनाचे समाधान होत नाही. मनःशांती त्याला मिळत नाही. गरजे पेक्षा जास्त लक्ष्मी प्रसन्न झाल्यावर ती ठेवावी कुठे ? तिची चोरी तर होणार नाही ना ? या संपत्ती मुळे स्वतःच्या जीवाला, कुटुंबाच्या जीवाला धोका तर नाही ना ? असे असंख्य प्रश्न व्यक्तीच्या मनात निर्माण होतात. ज्या मनःशांतीसाठी तो वाटेल त्या नैतिक – अनैतिक मार्गाने लक्ष्मीला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. ती प्राप्त झाल्यानंतर मनःशांती त्याला कुठेच दिसत नाही. उलट दिसते ती भीती, काळजी आणि चिंता. 

व्यक्तीला जर हे समजले की; तो ज्या गोष्टींना म्हणजेच धन, दौलत, जमीन-जुमला, दाग-दागिने यांना लक्ष्मी मानतो, त्या गोष्टींन कडे लक्ष कमी द्यायला हवे. या गोष्टी प्राप्त झाल्या नंतर त्याला मनःशांती मिळणार नाही. मिळेल ती फक्त चिंता, काळजी आणि भीती. संपत्तीचा अती हव्यास केल्याने व्यक्ती स्वतःपासून दूर जातो. ही लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी, नंतर ती लपवण्यासाठी, तो वाटेल ते करतो. कारण मनात अनेक प्रश्न असतात. हे प्रश्नचं व्यक्तीला शांत झोपू देत नाहीत. मग ही झोप येण्यासाठी तो झोपेच्या गोळ्या घेतो, व्यसनाच्या आहारी जातो. यातूनच तो स्वतःची व कुटुंबाची मनःशांती हरवून बसतो.

म्हणूनच लक्ष्मी या शब्दाचा अर्थ समजून घेतांना हे लक्षात घेतले पाहिजे की, धन, दौलत, जमीन-जुमला, दाग-दागिने या गोष्टींकडे लक्ष कमी दिल्यास व गरजे पुरते धन मिळवल्यास व्यक्तीला समाधान मिळू शकते. परंतू आजच्या भोगवादी संस्कृतीमध्ये एवढा विचार करायला व्यक्तीजवळ वेळ नाही. लक्ष्मीच्या हव्यासापोटी तो नातीगोती विसरू लागला आहे. एकमेकांची हत्या करण्यास त्याला काहीच वाटतं नाही. निष्ठूर मनाचे जग तो तयार करू पाहतोय. ते ही कशासाठी तर मनःशांतीसाठी. निष्ठूर मनाचे जग तयार झाल्यावर ही मनःशांती राहणारच नाही. हेच त्याला समजेनासे झाले आहे. म्हणून मनःशांती हवी असेल तर धन, दौलत, जमीन-जुमला, दाग-दागिने यावरील लक्ष कमी केले पाहिजे. तरच व्यक्ती सुखी आणि समाधानी होऊन त्याला मनःशांती मिळेल व तो आत्म सुखाच्या मार्गावर पाऊल ठेवेल.

- सचिन व्ही. काळे, जालना ( ९८८१८४९६६ )  

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक