शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

' लक्ष्मी' या शब्दाचा खरा अर्थ 'लक्ष कमी' असा असावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 14:04 IST

ही देवता किती जरी प्राप्त झाली तरी त्याच्या मनाचे समाधान होत नाही.

हिंदू संस्कृती मध्ये लक्ष्मी या देवतेला अत्यंत पूज्य व महत्त्वाची देवता मानले जाते. दिपावली मध्ये तर लक्ष्मी पूजनाचे अत्यंत महत्त्व आहे. ही देवता प्रसन्न व्हावी म्हणून अनेक जण वाटेल ते कर्मकांड करायला तयार असतात. लक्ष्मी प्रसन्न असावी, तिची कृपा आपल्या घरावर, कुटुंबावर रहावी, म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक सुवासिनी दर गुरुवारी उपवास करून, विधीवत मनोभावे लक्ष्मीची आराधन करतात. लक्ष्मी प्रसन्न असणारा व्यक्ती अत्यंत सुखी, समाधानी तसेच नशिबवान समजला जातो. या देवतेला प्रसन्न करण्यासाठी तसेच ती प्राप्त करण्यासाठी व्यक्ती काहीही करायला तयार असतो.

धन, दौलत, जमीन-जुमला, दाग-दागिने या गोष्टींना आपण लक्ष्मीचे प्रतिक मानतो. तसेच घराचा सर्व कारभार बघणाऱ्या घरातील स्त्रियांना आपण लक्ष्मीच संबोधतो. आजच्या काळात तर या देवतेला अनन्य साधारण महत्त्व आहे. ही देवता ज्याच्यावर प्रसन्न असेल, त्याच्या मागे सर्व जग धावते. तसे बघितल्यास खरंच लक्ष्मी प्रसन्न असल्यावर व्यक्ती सुखी समाधानी असतो का ? लक्ष्मी चा खरा अर्थ काय ? तो जाणून घेण्याचा कुणी प्रयत्न केला का ? 

खरे तर लक्ष्मी या शब्दाचा अर्थ “ लक्ष कमी ” असा असावा. कारण व्यक्ती धन, दौलत, जमीन-जुमला, दाग-दागिने यांना लक्ष्मी मानतो. ही देवता किती जरी प्राप्त झाली तरी त्याच्या मनाचे समाधान होत नाही. मनःशांती त्याला मिळत नाही. गरजे पेक्षा जास्त लक्ष्मी प्रसन्न झाल्यावर ती ठेवावी कुठे ? तिची चोरी तर होणार नाही ना ? या संपत्ती मुळे स्वतःच्या जीवाला, कुटुंबाच्या जीवाला धोका तर नाही ना ? असे असंख्य प्रश्न व्यक्तीच्या मनात निर्माण होतात. ज्या मनःशांतीसाठी तो वाटेल त्या नैतिक – अनैतिक मार्गाने लक्ष्मीला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. ती प्राप्त झाल्यानंतर मनःशांती त्याला कुठेच दिसत नाही. उलट दिसते ती भीती, काळजी आणि चिंता. 

व्यक्तीला जर हे समजले की; तो ज्या गोष्टींना म्हणजेच धन, दौलत, जमीन-जुमला, दाग-दागिने यांना लक्ष्मी मानतो, त्या गोष्टींन कडे लक्ष कमी द्यायला हवे. या गोष्टी प्राप्त झाल्या नंतर त्याला मनःशांती मिळणार नाही. मिळेल ती फक्त चिंता, काळजी आणि भीती. संपत्तीचा अती हव्यास केल्याने व्यक्ती स्वतःपासून दूर जातो. ही लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी, नंतर ती लपवण्यासाठी, तो वाटेल ते करतो. कारण मनात अनेक प्रश्न असतात. हे प्रश्नचं व्यक्तीला शांत झोपू देत नाहीत. मग ही झोप येण्यासाठी तो झोपेच्या गोळ्या घेतो, व्यसनाच्या आहारी जातो. यातूनच तो स्वतःची व कुटुंबाची मनःशांती हरवून बसतो.

म्हणूनच लक्ष्मी या शब्दाचा अर्थ समजून घेतांना हे लक्षात घेतले पाहिजे की, धन, दौलत, जमीन-जुमला, दाग-दागिने या गोष्टींकडे लक्ष कमी दिल्यास व गरजे पुरते धन मिळवल्यास व्यक्तीला समाधान मिळू शकते. परंतू आजच्या भोगवादी संस्कृतीमध्ये एवढा विचार करायला व्यक्तीजवळ वेळ नाही. लक्ष्मीच्या हव्यासापोटी तो नातीगोती विसरू लागला आहे. एकमेकांची हत्या करण्यास त्याला काहीच वाटतं नाही. निष्ठूर मनाचे जग तो तयार करू पाहतोय. ते ही कशासाठी तर मनःशांतीसाठी. निष्ठूर मनाचे जग तयार झाल्यावर ही मनःशांती राहणारच नाही. हेच त्याला समजेनासे झाले आहे. म्हणून मनःशांती हवी असेल तर धन, दौलत, जमीन-जुमला, दाग-दागिने यावरील लक्ष कमी केले पाहिजे. तरच व्यक्ती सुखी आणि समाधानी होऊन त्याला मनःशांती मिळेल व तो आत्म सुखाच्या मार्गावर पाऊल ठेवेल.

- सचिन व्ही. काळे, जालना ( ९८८१८४९६६ )  

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक