शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

जीवनाचे खरे सार यातच..!

By appasaheb.patil | Updated: December 7, 2019 12:14 IST

जीवनात घटना फार कमी घडतात आणि त्याच्या प्रतिक्रियाच फार होतात.

भगवान श्रीकृष्ण आपल्या परमभक्तावर अत्यंत प्रसन्न झाले होते म्हणून तर भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अजुर्नाची विश्वरूप दर्शनाची इच्छा पूर्ण केली होती. अजुर्नाला भगवंतांचे चतुर्भुज दर्शन झाले ते केवळ भगवंतांवरील अतूट भक्तीमुळेच. प्रापंचिक वृत्तीला पूर्णपणे छेद केल्यावर, हवे-नकोचा खेळ संपल्यावर, निष्काम बुद्धीने कर्म करण्याची प्रवृत्ती वाढल्यावर, भक्तीमयी आयुष्याची खरी सुरुवात होते. जीवनाचे खरे सार यातच आहे.

जीवनात घटना फार कमी घडतात आणि त्याच्या प्रतिक्रियाच फार होतात. आजचा दिवस हा जवळ-जवळ कालचाच दिवस असतो. आजचा दिवस माणसे आज जगतच नाहीत. ते जगतात शिळा झालेला, निघून गेलेला, भूतकाळात गेलेला कालचा दिवस. त्यामुळे त्यांना जीवनात आणि जगण्यात काही रसच राहात नाही. सर्वकाही निरस होऊन जातं. रोज रोज तेच ते. तोच दिनक्रम, तीच माणसे, तोच रस्ता, तेच काम, तेच जेवण, तेच घर, तेच आॅफिस, तीच नोकरी किंवा तोच धंदा, तीच गिºहाईके, त्यांच्याशी तेच ते बोलणे, जीवनाचा एक साचा होऊन गेलेला असतो. माणूस घाण्याच्या बैलाप्रमाणे त्याच त्या रिंगणातून फिरत असतो. त्याला जीवन जगताच येत नाही. जीवनात प्रत्येक क्षण आनंदोत्सव बनवता येत नाही. जीवन हे खळाळत्या ओसंडून वाहाणा?्या वाहात्या झºयाप्रमाणे आहे. ते नाविन्याने ओथंबलेले आहे. रसरसलेले आहे. मात्र माणसाला त्यातील मजा घेता येत नाही. त्यामुळे ते नको तिकडे मजा शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी वेगवेगळे सण-समारंभ साजरे करतात. अधे-मधे ट्रीप काढतात. मोठ्या दणक्यात कार्यक्रम साजरे करतात. काहीतरी निमित्त शोधतात आणि कार्यक्रम घेतात. असे कार्यक्रम घेण्यामागचे मानसशास्त्र असे आहे की, या मंडळींना जीवनातील जो मूळ आनंद आहे, तो सापडलेला नसतो. तो दुसरीकडे आनंद शोधीत फिरतात. कार्यक्रम असेल किंवा सण-समारंभ असेल. तो आनंदासाठीच निर्माण केलेला असतो. मात्र दुर्दैव असे की असे कार्यक्रम करून येणारे लोक दमून जातात. नंतर ते थकतात. कारण त्यातही त्यांना जो मूळ आनंद आहे, तो सापडलेला नसतो. आनंदानुभूती घेतल्यानंतर दमून जाणे किंवा थकून जाणे असे होता कामा नये, आनंदाने माणूस थकत नाही. तो अधिक उत्साही बनतो. अधिक कार्यक्षम बनतो. पण या मंडळींना त्यातही आनंद मिळत नाही. तो केवळ आनंदाभास असतो.- साईनाथ महाराज स्वामी,शेळगी, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक