शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

जीवनाचे खरे सार यातच..!

By appasaheb.patil | Updated: December 7, 2019 12:14 IST

जीवनात घटना फार कमी घडतात आणि त्याच्या प्रतिक्रियाच फार होतात.

भगवान श्रीकृष्ण आपल्या परमभक्तावर अत्यंत प्रसन्न झाले होते म्हणून तर भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अजुर्नाची विश्वरूप दर्शनाची इच्छा पूर्ण केली होती. अजुर्नाला भगवंतांचे चतुर्भुज दर्शन झाले ते केवळ भगवंतांवरील अतूट भक्तीमुळेच. प्रापंचिक वृत्तीला पूर्णपणे छेद केल्यावर, हवे-नकोचा खेळ संपल्यावर, निष्काम बुद्धीने कर्म करण्याची प्रवृत्ती वाढल्यावर, भक्तीमयी आयुष्याची खरी सुरुवात होते. जीवनाचे खरे सार यातच आहे.

जीवनात घटना फार कमी घडतात आणि त्याच्या प्रतिक्रियाच फार होतात. आजचा दिवस हा जवळ-जवळ कालचाच दिवस असतो. आजचा दिवस माणसे आज जगतच नाहीत. ते जगतात शिळा झालेला, निघून गेलेला, भूतकाळात गेलेला कालचा दिवस. त्यामुळे त्यांना जीवनात आणि जगण्यात काही रसच राहात नाही. सर्वकाही निरस होऊन जातं. रोज रोज तेच ते. तोच दिनक्रम, तीच माणसे, तोच रस्ता, तेच काम, तेच जेवण, तेच घर, तेच आॅफिस, तीच नोकरी किंवा तोच धंदा, तीच गिºहाईके, त्यांच्याशी तेच ते बोलणे, जीवनाचा एक साचा होऊन गेलेला असतो. माणूस घाण्याच्या बैलाप्रमाणे त्याच त्या रिंगणातून फिरत असतो. त्याला जीवन जगताच येत नाही. जीवनात प्रत्येक क्षण आनंदोत्सव बनवता येत नाही. जीवन हे खळाळत्या ओसंडून वाहाणा?्या वाहात्या झºयाप्रमाणे आहे. ते नाविन्याने ओथंबलेले आहे. रसरसलेले आहे. मात्र माणसाला त्यातील मजा घेता येत नाही. त्यामुळे ते नको तिकडे मजा शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी वेगवेगळे सण-समारंभ साजरे करतात. अधे-मधे ट्रीप काढतात. मोठ्या दणक्यात कार्यक्रम साजरे करतात. काहीतरी निमित्त शोधतात आणि कार्यक्रम घेतात. असे कार्यक्रम घेण्यामागचे मानसशास्त्र असे आहे की, या मंडळींना जीवनातील जो मूळ आनंद आहे, तो सापडलेला नसतो. तो दुसरीकडे आनंद शोधीत फिरतात. कार्यक्रम असेल किंवा सण-समारंभ असेल. तो आनंदासाठीच निर्माण केलेला असतो. मात्र दुर्दैव असे की असे कार्यक्रम करून येणारे लोक दमून जातात. नंतर ते थकतात. कारण त्यातही त्यांना जो मूळ आनंद आहे, तो सापडलेला नसतो. आनंदानुभूती घेतल्यानंतर दमून जाणे किंवा थकून जाणे असे होता कामा नये, आनंदाने माणूस थकत नाही. तो अधिक उत्साही बनतो. अधिक कार्यक्षम बनतो. पण या मंडळींना त्यातही आनंद मिळत नाही. तो केवळ आनंदाभास असतो.- साईनाथ महाराज स्वामी,शेळगी, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक