शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

वृक्ष मोठा की देव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 05:16 IST

देव या जगात अस्तित्वात नाही. तो मानवी कल्पनेतून रंगवला गेला आहे. मानवी दोष आणि गुण याची रीतसर जाणीव होण्यासाठी देवांच्या नावावर कथा रचल्या.

- विजयराज बोधनकरदेव या जगात अस्तित्वात नाही. तो मानवी कल्पनेतून रंगवला गेला आहे. मानवी दोष आणि गुण याची रीतसर जाणीव होण्यासाठी देवांच्या नावावर कथा रचल्या. ज्ञानी सिद्ध पुरुषांनी त्या ग्रंथातून लिहून ठेवल्या. त्या आधारेच देवांनी चित्र, शिल्प रूपाने जन्म घेतलेत. बुद्धीचा विकास व्हावा म्हणून देवाला ज्ञानाचे, शक्तीचे प्रतीक म्हणून चित्र, शिल्प रूपाने जगापुढे उभे केले. देव नावाच्या शक्तीसमोर माणूस घाबरून असतो.पण आंतरिक ऊर्जा मात्र दबून राहते आणि तिथूनच अपयश मागे लागते. मानवी आंतरिक ऊर्जा, मनाची-बुद्धीची शक्ती, सकारात्मक विचारांची ताकद, अचूक निर्णयक्षमता अशा अनेक गोष्टींची ओळख मानवाला व्हावी याच हेतूने देवालये, धार्मिक ग्रंथसंपदा निर्माण करण्यात आली. परंतु त्यातून मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा निर्माण होत गेली. फक्त पूजाअर्चा आणि कोरडे धार्मिक उत्सव यांची चलती झाली. त्यातून असे गैरसमज निर्माण झाले की देवाची भक्ती केली की तो चमत्कार करून आपल्या पदरात सर्व काही टाकतो. यातूनच वैचारिक आणि आर्थिक गरिबी वाढत गेली. ज्यांनी ग्रंथ वाचून आणि शैक्षणिक ज्ञान मिळवून कर्माच्या दिशेने पावले उचलली ते-ते सर्व प्रगतीच्या मार्गावर पोहोचले आणि जे-जे चमत्काराचे वाट बघत बसले त्यांच्या पायाखाली फक्त दु:खाची वाट आली.देव सर्वत्र भरला आहे याचा अर्थ ऊन, वारा, थंडी, जल, अग्नी, वायू, पृथ्वी हेच रूप ईश्वराचे आहे आणि याचेच प्रतीक म्हणून देवळात देवाला बसविण्यात आले. खरा देव हा निसर्ग आहे. म्हणूनच चित्रातला देव अस्तित्वात नाही. तो निसर्गाच्या ऊर्जेत जिवंत सापडेल. ज्याप्रमाणे झाडे, लता, वेली स्वयंप्रेरणेने लहानाचे मोठे होतात आणि जगाला भरभरून देतात, हीच शिकवण ग्रंथ देतात. ती अशी की, देवाला मागू नका; उलट जगाला ज्ञान द्या. सहकार्य करा. दुसऱ्याला सर्वकाही देणाºया झाडासारखे स्वत:ला निर्मळ बनवा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक