शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

वृक्ष मोठा की देव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 05:16 IST

देव या जगात अस्तित्वात नाही. तो मानवी कल्पनेतून रंगवला गेला आहे. मानवी दोष आणि गुण याची रीतसर जाणीव होण्यासाठी देवांच्या नावावर कथा रचल्या.

- विजयराज बोधनकरदेव या जगात अस्तित्वात नाही. तो मानवी कल्पनेतून रंगवला गेला आहे. मानवी दोष आणि गुण याची रीतसर जाणीव होण्यासाठी देवांच्या नावावर कथा रचल्या. ज्ञानी सिद्ध पुरुषांनी त्या ग्रंथातून लिहून ठेवल्या. त्या आधारेच देवांनी चित्र, शिल्प रूपाने जन्म घेतलेत. बुद्धीचा विकास व्हावा म्हणून देवाला ज्ञानाचे, शक्तीचे प्रतीक म्हणून चित्र, शिल्प रूपाने जगापुढे उभे केले. देव नावाच्या शक्तीसमोर माणूस घाबरून असतो.पण आंतरिक ऊर्जा मात्र दबून राहते आणि तिथूनच अपयश मागे लागते. मानवी आंतरिक ऊर्जा, मनाची-बुद्धीची शक्ती, सकारात्मक विचारांची ताकद, अचूक निर्णयक्षमता अशा अनेक गोष्टींची ओळख मानवाला व्हावी याच हेतूने देवालये, धार्मिक ग्रंथसंपदा निर्माण करण्यात आली. परंतु त्यातून मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा निर्माण होत गेली. फक्त पूजाअर्चा आणि कोरडे धार्मिक उत्सव यांची चलती झाली. त्यातून असे गैरसमज निर्माण झाले की देवाची भक्ती केली की तो चमत्कार करून आपल्या पदरात सर्व काही टाकतो. यातूनच वैचारिक आणि आर्थिक गरिबी वाढत गेली. ज्यांनी ग्रंथ वाचून आणि शैक्षणिक ज्ञान मिळवून कर्माच्या दिशेने पावले उचलली ते-ते सर्व प्रगतीच्या मार्गावर पोहोचले आणि जे-जे चमत्काराचे वाट बघत बसले त्यांच्या पायाखाली फक्त दु:खाची वाट आली.देव सर्वत्र भरला आहे याचा अर्थ ऊन, वारा, थंडी, जल, अग्नी, वायू, पृथ्वी हेच रूप ईश्वराचे आहे आणि याचेच प्रतीक म्हणून देवळात देवाला बसविण्यात आले. खरा देव हा निसर्ग आहे. म्हणूनच चित्रातला देव अस्तित्वात नाही. तो निसर्गाच्या ऊर्जेत जिवंत सापडेल. ज्याप्रमाणे झाडे, लता, वेली स्वयंप्रेरणेने लहानाचे मोठे होतात आणि जगाला भरभरून देतात, हीच शिकवण ग्रंथ देतात. ती अशी की, देवाला मागू नका; उलट जगाला ज्ञान द्या. सहकार्य करा. दुसऱ्याला सर्वकाही देणाºया झाडासारखे स्वत:ला निर्मळ बनवा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक