शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

आनंदाकडचा प्रवास आनंदायन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 18:30 IST

सुखापेक्षा आनंद बरा.! तो आपल्याला विचारतोय मला सांगा.. सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य केलं की ते घरबसल्या मिळतं?

- रमेश सप्रे

सुखापेक्षा आनंद बरा.!तो आपल्याला विचारतोयमला सांगा.. सुख म्हणजे नक्की काय असतं?काय पुण्य केलं की ते घरबसल्या मिळतं?असं गात म्हणताना तो नि त्याची ती आनंदात नाचत-बागडत असतात. मागची साधी भिंत सुंदर पर्वतासारखी भासते तर समोरचा जलाशय नितळ सरोवरच बनून जातो. दोघंही उमलत असतात, फुलत असतात. झुल्यावाचून झुलत असतात. 

हे साधं गद्य प्रश्न विचारणारं गाणं एक महत्त्वाचं जीवनसूत्र सांगून जातं. सुख म्हणजे काय हे जरी समजलं नाही तरी ते घरबसल्या मिळू शकतं. हे खरंच आहे की सुखाच्या अनुभवासाठी दाहीदिशा वणवण करण्याची गरज नाही. इथलं घर म्हणजे दगडविटांची वास्तू नाही तर ते अगदी आपलं अंतरंग-अंत:करणही असू शकतं. 

एका शिबिरात पहिल्या दिवशी एक गृहपाठ दिला गेला. आपापल्या सुखी होण्याच्या कल्पनेनुसार सुख देणा-या वस्तूंची यादी करायची. अनेकांनी घर, गाडी, सुखसोयीची साधनं यांची समग्र यादी तयार करून आणली. दुसरे दिवशी या प्रत्येक गोष्टीपुढे अंदाजे किंमत लिहून एकूण किती रक्कम मिळाली की हव्या त्या वस्तू घेऊन आपण सुखी होऊ हे लिहून आणायला सांगितलं. त्याप्रमाणो केल्यानंतर पुढचा गृहपाठ दिला की सा-या ठिकाणाहून मिळणा-या उत्पन्नाचा पैशाचा विचार करून सुखी होण्यासाठी आवश्यक तितके पैसे मिळवायला किती दिवस लागतील त्याचा विचार करायला सांगितला. एका अर्थी प्रत्येकाचा सुखी होण्याचा मुहूर्त ठरला. आता एक विचार पुढे आला की आवश्यक तेवढे पैसे साठण्यासाठी काही वर्षे लागतील. त्या कालात आपल्या यादीतील वस्तूंच्या किमती वाढणार नाहीत का? म्हणजे सुखी होण्याचा दिवस आणखी पुढे गेला नि तो असा जातच राहणार. कारण परिस्थिती बदलत राहणार नि ती आपल्या हातात नसणार. 

म्हणजे कुणी सुखी होणारच नाही की काय?असं असेल तर साधूसंत, महात्मे सत्पुरुष सुखी नव्हते? समर्थ रामदास मनाच्या श्लोकात म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे।हा प्रश्न नाहिये. कारण पुढच्याच ओळीत ते सांगतात 

विचारे मना तूचि शोधूनि पाहे।।म्हणजे विचार करून, चिंतन करून समजून घेतलं पाहिजे की सदैव सुखात असणारे कोण आहेत नि ते तसे कसे बनले?यासाठी आपल्याला प्रथम सुख म्हणजे काय ते निश्चित समजलं पाहिजे. ‘सुख’ या छोटय़ा शब्दाचे दोन भाग आहेत. ‘सु’ म्हणजे चांगले. शुभ, कल्याणकारी आणि ‘ख’ म्हणजे आकाश, परिसर, भवताल (आजूबाजूची परिस्थिती) सुखाचा सरळ अर्थ आहे आपल्या भोवती असलेलं, नव्हे आपण निर्माण केलेलं व्यक्ती- वस्तूचं जग जे आपल्याला सुख देणारं असतं. सुखाचा संबंध देहाच्या उपभोगांशी, आरामाशी येतो. त्यामुळे सुख हे सदैव वस्तू, व्यक्ती, परिस्थिती यांच्यावर अवलंबून असतं. अन् या सा-या गोष्टी सदैव बदलणा-या असतात म्हणून संत सांगतात-

‘सुख सुख म्हणता हे दु:ख ठाकून आले’ ‘सुख जवापाडे, दु:ख पर्वताएवढे’ म्हणून सुखाऐवजी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. आनंद कशावरही अवलंबून नसतो. सुखभोगाच्या वस्तू असल्या तरी तसेच नसल्या तरी आनंदात राहता येतं. आनंदाचा उगम आपल्या आतच असतो. तो अखंड उसळत असतो. ख-या आनंदी व्यक्तीमधून आनंदाचा प्रवाह आतून बाहेर वाहत असतो. तो सर्वाना आनंदी बनवत असतो. 

प्रपंचात कितीही संकटं आली तरी तुकारामाचा अनुभव हाच होता. आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचे।।आनंदमार्गी मी, आनंदयात्री मी.. म्हणणारे कवी अनेक असतात; पण ख-या आनंदाचा अनुभव घेणारे संत नि महामानव वेगळेच असतात. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेत आपण सुरु ठेवू या आपला आनंदाकडचा प्रवास आनंदायन!

टॅग्स :spiritualअध्यात्मिक