शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

अनंत बुद्धीचे तरंग । क्षणाक्षणा पालटती रंग ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 18:23 IST

तुकाराम महाराज भवसिंधू तरुन जाण्यासाठी फक्त विचाराचेच साधन सांगतात

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केली त्यामध्ये जारज, स्वेदज, अंडज व उद्भिज अशा प्रकारच्या चार खाणी निर्माण केल्या. त्यांपैकी जारज खाणीतून मनुष्य निर्माण केला. मनुष्याला बुद्धी व ज्ञान असल्याने तो दुःख निवृत्ती करु शकतो व याच ज्ञानाने परमानंद सुखाची प्राप्तीही करुन घेऊ शकतो पण ज्ञानप्राप्ती करुन घेण्यासाठी काय करायला हवे..? तर, तुकोबांनी उपाय सांगितला आहे. महाराज म्हणतात -

क्षणोक्षणा हाचि करावा विचार ।तरावया पार भवसिंधू ॥

हा देह अत्यंत क्षणभंगूर असल्याने जो विचार करणार आहात तो क्षणोक्षणी करा, दिरंगाई नको. भवसिंधू तरुन जाण्याचा उपाय सोपा असला तरी हा उपाय क्षणोक्षणी करावा लागेल. कारण महाराज म्हणतात -

अनंत बुद्धीचे तरंग । क्षणाक्षणा पालटती रंग ॥

ज्या कर्माचे जसे संस्कार असतील तशीच बुद्धी होते.शास्त्रकार म्हणतात -

बुद्धि: कर्मानुसारिणी ।

आपण म्हणाल, वेदशास्त्राने एवढी साधने सांगितली असतांना नुसत्या विचाराने काय होणार..? वेद शास्त्राने भवसिंधू तरुन जाण्यास योग, याग, तप, जप, इ. अनेक साधनें सांगितली मात्र तुकाराम महाराज या ठिकाणी भवसिंधू तरुन जाण्यासाठी फक्त विचाराचेच साधन सांगतात हे कसे..?आज कलियुगाचा विचार करता, तुकाराम महाराज म्हणतात -

अवघ्या वाटा झाल्या क्षीण । कलि न घडे साधन ॥उचित विधी विधान । न कळे न घडे सर्वथा ॥

ही सर्व साधनें फारच अवघड आहेत. सध्याच्या काळात या शास्त्रातील कर्मे यथासांग घडणें खूप कठिण काम आहे. आणि जर कर्म यथासांग घडले नाही तर संत म्हणतात -

कर्म धर्म न होती सांग । उण्या अंगे पतन ॥

ही सर्व साधनें भवसिंधूत ढकलणारी आहेत. एकमेव विचार हीच साधना भवसिंधुतून निवृत्त करणारी आहे..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा दूरभाष क्रमांक ९४२१३४४९६० ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक