शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक आणि श्रीगणेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 05:50 IST

इतकी शैक्षणिक क्रांती होऊनही इतका अशिक्षित समाज कुठल्या वृत्तीमुळे आजही मागासलेल्या अवस्थेत आहे, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे.

उच्च भावनेने कधीही व्यक्त न होणारे, विचारांची शून्यता घेऊन जगणारे, साहित्य, कला, संगीत याचा कसलाही गंध नसणारे, जन्माला घातले म्हणून जगणारे, पोट भरण्यापुरते शिक्षण घेऊन पोटासाठी जगणारे, मुले जन्माला घालून त्यांनाही तसेच जगावे अशी आशा बाळगणारे, कला वगैरे एक निरर्थक गोष्ट आहे असे भासवणारे, अशा धाटणीचा मोठा समाज आजही कसा काय शिल्लक राहिला? हा प्रश्न आज अनुत्तरित आहे.

इतकी शैक्षणिक क्रांती होऊनही इतका अशिक्षित समाज कुठल्या वृत्तीमुळे आजही मागासलेल्या अवस्थेत आहे, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. निर्जीव पालकांच्या नकारात्मक विचारांमुळे पुढची पिढी सक्षम होण्याऐवजी त्याच विचारात खितपत पडून आहे. त्यामुळे देशाच्या विकासात त्यांचा कधीच हातभार लागत नाही. रस्त्यांवर घाण करणे, पाशवी शक्तीच्या आहारी गेल्यामुळे पाशवी वृत्तीला सहकार्य करीत राहणे, उत्तम कार्यात विघ्न आणणे, हे सर्व उपद्व्याप क्षुद्र विचाराने प्रेरित होऊन करीत राहणे. असा मोठा लोंढा राजकारणात शिरल्यामुळे देशाला अधिकच धोका निर्माण होत आहे. यासाठी केवळ एकच घटक काम करू शकतो तो म्हणजे शालेय शिक्षक. शिक्षक हा आजही पूज्य आहे, तो पिढी घडवितो, समाज बदलविण्याची क्षमता फक्त शिक्षकांमध्येच आहे. शिक्षकांच्या हातात नव्या पिढीला घडविण्याचे महान कार्य नियतीने सोपवले असते. विद्यार्थी नावाच्या ओल्या मातीला देशाच्या विकासासाठी जबाबदारीने घडविणे हे फक्त शिक्षकच करू शकतो. हे शिक्षकाला आव्हान असते.

ज्या शिक्षकांनी हे समाजकार्य पेलले ते खऱ्या अर्थाने बुद्धिनायक श्री गणेशाच्या कार्याला हातभार लावत आहे, असा संदेश निर्माण होऊ शकतो. बुद्धिनायक गणपती आणि शिक्षक यांची भूमिका एकच असते. नव्या पिढीला बुद्धीवादी बनवून जुन्या रटाळ विचारसरणीला विसर्जित करतात, म्हणून गुरूला दैवत म्हटलं आहे..-विजयराज बोधनकर