शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक आणि श्रीगणेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 05:50 IST

इतकी शैक्षणिक क्रांती होऊनही इतका अशिक्षित समाज कुठल्या वृत्तीमुळे आजही मागासलेल्या अवस्थेत आहे, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे.

उच्च भावनेने कधीही व्यक्त न होणारे, विचारांची शून्यता घेऊन जगणारे, साहित्य, कला, संगीत याचा कसलाही गंध नसणारे, जन्माला घातले म्हणून जगणारे, पोट भरण्यापुरते शिक्षण घेऊन पोटासाठी जगणारे, मुले जन्माला घालून त्यांनाही तसेच जगावे अशी आशा बाळगणारे, कला वगैरे एक निरर्थक गोष्ट आहे असे भासवणारे, अशा धाटणीचा मोठा समाज आजही कसा काय शिल्लक राहिला? हा प्रश्न आज अनुत्तरित आहे.

इतकी शैक्षणिक क्रांती होऊनही इतका अशिक्षित समाज कुठल्या वृत्तीमुळे आजही मागासलेल्या अवस्थेत आहे, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. निर्जीव पालकांच्या नकारात्मक विचारांमुळे पुढची पिढी सक्षम होण्याऐवजी त्याच विचारात खितपत पडून आहे. त्यामुळे देशाच्या विकासात त्यांचा कधीच हातभार लागत नाही. रस्त्यांवर घाण करणे, पाशवी शक्तीच्या आहारी गेल्यामुळे पाशवी वृत्तीला सहकार्य करीत राहणे, उत्तम कार्यात विघ्न आणणे, हे सर्व उपद्व्याप क्षुद्र विचाराने प्रेरित होऊन करीत राहणे. असा मोठा लोंढा राजकारणात शिरल्यामुळे देशाला अधिकच धोका निर्माण होत आहे. यासाठी केवळ एकच घटक काम करू शकतो तो म्हणजे शालेय शिक्षक. शिक्षक हा आजही पूज्य आहे, तो पिढी घडवितो, समाज बदलविण्याची क्षमता फक्त शिक्षकांमध्येच आहे. शिक्षकांच्या हातात नव्या पिढीला घडविण्याचे महान कार्य नियतीने सोपवले असते. विद्यार्थी नावाच्या ओल्या मातीला देशाच्या विकासासाठी जबाबदारीने घडविणे हे फक्त शिक्षकच करू शकतो. हे शिक्षकाला आव्हान असते.

ज्या शिक्षकांनी हे समाजकार्य पेलले ते खऱ्या अर्थाने बुद्धिनायक श्री गणेशाच्या कार्याला हातभार लावत आहे, असा संदेश निर्माण होऊ शकतो. बुद्धिनायक गणपती आणि शिक्षक यांची भूमिका एकच असते. नव्या पिढीला बुद्धीवादी बनवून जुन्या रटाळ विचारसरणीला विसर्जित करतात, म्हणून गुरूला दैवत म्हटलं आहे..-विजयराज बोधनकर