शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

शिक्षक आणि श्रीगणेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 05:50 IST

इतकी शैक्षणिक क्रांती होऊनही इतका अशिक्षित समाज कुठल्या वृत्तीमुळे आजही मागासलेल्या अवस्थेत आहे, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे.

उच्च भावनेने कधीही व्यक्त न होणारे, विचारांची शून्यता घेऊन जगणारे, साहित्य, कला, संगीत याचा कसलाही गंध नसणारे, जन्माला घातले म्हणून जगणारे, पोट भरण्यापुरते शिक्षण घेऊन पोटासाठी जगणारे, मुले जन्माला घालून त्यांनाही तसेच जगावे अशी आशा बाळगणारे, कला वगैरे एक निरर्थक गोष्ट आहे असे भासवणारे, अशा धाटणीचा मोठा समाज आजही कसा काय शिल्लक राहिला? हा प्रश्न आज अनुत्तरित आहे.

इतकी शैक्षणिक क्रांती होऊनही इतका अशिक्षित समाज कुठल्या वृत्तीमुळे आजही मागासलेल्या अवस्थेत आहे, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. निर्जीव पालकांच्या नकारात्मक विचारांमुळे पुढची पिढी सक्षम होण्याऐवजी त्याच विचारात खितपत पडून आहे. त्यामुळे देशाच्या विकासात त्यांचा कधीच हातभार लागत नाही. रस्त्यांवर घाण करणे, पाशवी शक्तीच्या आहारी गेल्यामुळे पाशवी वृत्तीला सहकार्य करीत राहणे, उत्तम कार्यात विघ्न आणणे, हे सर्व उपद्व्याप क्षुद्र विचाराने प्रेरित होऊन करीत राहणे. असा मोठा लोंढा राजकारणात शिरल्यामुळे देशाला अधिकच धोका निर्माण होत आहे. यासाठी केवळ एकच घटक काम करू शकतो तो म्हणजे शालेय शिक्षक. शिक्षक हा आजही पूज्य आहे, तो पिढी घडवितो, समाज बदलविण्याची क्षमता फक्त शिक्षकांमध्येच आहे. शिक्षकांच्या हातात नव्या पिढीला घडविण्याचे महान कार्य नियतीने सोपवले असते. विद्यार्थी नावाच्या ओल्या मातीला देशाच्या विकासासाठी जबाबदारीने घडविणे हे फक्त शिक्षकच करू शकतो. हे शिक्षकाला आव्हान असते.

ज्या शिक्षकांनी हे समाजकार्य पेलले ते खऱ्या अर्थाने बुद्धिनायक श्री गणेशाच्या कार्याला हातभार लावत आहे, असा संदेश निर्माण होऊ शकतो. बुद्धिनायक गणपती आणि शिक्षक यांची भूमिका एकच असते. नव्या पिढीला बुद्धीवादी बनवून जुन्या रटाळ विचारसरणीला विसर्जित करतात, म्हणून गुरूला दैवत म्हटलं आहे..-विजयराज बोधनकर