शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

शिक्षक आणि श्रीगणेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 05:50 IST

इतकी शैक्षणिक क्रांती होऊनही इतका अशिक्षित समाज कुठल्या वृत्तीमुळे आजही मागासलेल्या अवस्थेत आहे, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे.

उच्च भावनेने कधीही व्यक्त न होणारे, विचारांची शून्यता घेऊन जगणारे, साहित्य, कला, संगीत याचा कसलाही गंध नसणारे, जन्माला घातले म्हणून जगणारे, पोट भरण्यापुरते शिक्षण घेऊन पोटासाठी जगणारे, मुले जन्माला घालून त्यांनाही तसेच जगावे अशी आशा बाळगणारे, कला वगैरे एक निरर्थक गोष्ट आहे असे भासवणारे, अशा धाटणीचा मोठा समाज आजही कसा काय शिल्लक राहिला? हा प्रश्न आज अनुत्तरित आहे.

इतकी शैक्षणिक क्रांती होऊनही इतका अशिक्षित समाज कुठल्या वृत्तीमुळे आजही मागासलेल्या अवस्थेत आहे, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. निर्जीव पालकांच्या नकारात्मक विचारांमुळे पुढची पिढी सक्षम होण्याऐवजी त्याच विचारात खितपत पडून आहे. त्यामुळे देशाच्या विकासात त्यांचा कधीच हातभार लागत नाही. रस्त्यांवर घाण करणे, पाशवी शक्तीच्या आहारी गेल्यामुळे पाशवी वृत्तीला सहकार्य करीत राहणे, उत्तम कार्यात विघ्न आणणे, हे सर्व उपद्व्याप क्षुद्र विचाराने प्रेरित होऊन करीत राहणे. असा मोठा लोंढा राजकारणात शिरल्यामुळे देशाला अधिकच धोका निर्माण होत आहे. यासाठी केवळ एकच घटक काम करू शकतो तो म्हणजे शालेय शिक्षक. शिक्षक हा आजही पूज्य आहे, तो पिढी घडवितो, समाज बदलविण्याची क्षमता फक्त शिक्षकांमध्येच आहे. शिक्षकांच्या हातात नव्या पिढीला घडविण्याचे महान कार्य नियतीने सोपवले असते. विद्यार्थी नावाच्या ओल्या मातीला देशाच्या विकासासाठी जबाबदारीने घडविणे हे फक्त शिक्षकच करू शकतो. हे शिक्षकाला आव्हान असते.

ज्या शिक्षकांनी हे समाजकार्य पेलले ते खऱ्या अर्थाने बुद्धिनायक श्री गणेशाच्या कार्याला हातभार लावत आहे, असा संदेश निर्माण होऊ शकतो. बुद्धिनायक गणपती आणि शिक्षक यांची भूमिका एकच असते. नव्या पिढीला बुद्धीवादी बनवून जुन्या रटाळ विचारसरणीला विसर्जित करतात, म्हणून गुरूला दैवत म्हटलं आहे..-विजयराज बोधनकर