शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

तस्मै श्रीगुरवे नमः 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 19:33 IST

अज्ञानाचा अंधकार निवारण्यासाठी ज्ञानाची ज्योत पेटवणारा गुरु व जीवन विकासाची कामना राखणारा शिष्य यांचा संबंध अलौकिक असतो म्हणूनच गुरु हा आपल्यासारख्या अस्थिर आणि अव्यवस्थित मनाच्या मानवासाठी मार्गदर्शक बनतो..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र ) 

गुरुचे अनेक प्रकार आहेत. जसे की - मार्गदर्शक गुरु, पृच्छक गुरु, दोष विसर्जक गुरु, चंदन गुरु, विचार गुरु, अनुग्रह गुरु, स्पर्श गुरु, वात्सल्य गुरु, कूर्म गुरु, चंद्र गुरु, दर्पण गुरु, क्रौंच गुरु वगैरे. या प्रत्येक गुरूची वेगवेगळी विशेषता आहे.

१) मार्गदर्शक गुरु शिष्याच्या जीवनाला योग्य मार्गदर्शन करतो. गुरु शिष्याचा जीव एकमेकांत संपूर्णपणे एकरूप झालेला असेल तरच खरे मार्गदर्शन शक्य बनते. शिष्य स्वतःला अनुकूल असते तेवढीच गोष्ट स्वीकारतो व प्रतिकूल गोष्ट स्वीकारू शकत नसेल तर गुरु मार्गदर्शक बनू शकत नाही.

गुरोराज्ञा ह्यविचारणीया ॥

याप्रमाणे स्वतः चे नावडते देखील मानण्याची तयारी असेल त्यालाच हा मार्गदर्शक गुरु मिळण्याचा संभव असतो.

२) पृच्छक गुरूची देखील आगळी भूमिका आहे. सामान्यरित्या शिष्य विचारतो आणि नंतरच गुरु उत्तर देतो. विचारल्याशिवाय कोणाला काही सांगू नये, अशी स्मृतींची आज्ञा आहे.

नापृष्ट कस्यचित ब्रूयात् ॥

परंतु येथे तर शिष्याबरोबरच्या घनिष्ट व आत्मीय संबंधामुळे पृच्छक गुरु स्वतःच शिष्याला प्रश्न विचारून योग्य उत्तरांचे संकेत किंवा सूचना यांच्याद्वारे त्याच्या जीवनाला खऱ्या रस्त्याकडे वळवतो.

३) दोष विसर्जक गुरुजवळ शिष्य आत्मीय भावाने विनासंकोच स्वतःचे दोष सांगतो. त्याची खात्री असते की, गुरूला दोष सांगूनदेखील मी त्याच्या नजरेतून उतरणार नाही. तसाच गुरु माझ्या दोषांचा गैरफायदाही उठवणार नाही. जशी चिखलात पडलेल्या बालकाला आई हात धरून वर उठवते तसा दोषांच्या चिखलात पडलेल्या मला माझा गुरु हात पकडून बाहेर काढील एवढेच नाही तर चिखलात बरबटलेल्या मला स्वच्छ देखील करील ह्याची खात्री असते. चिखलातून कमळ निर्माण करण्याची शक्ती ह्या गुरुमध्ये असते.

४) ज्याच्या केवळ समागमानेच जीवनात सुगंध निर्माण होतो तो चंदन गुरु. चंदन स्वतः ला घासून घेऊन दुसऱ्यांना सुगंध देते. त्याप्रमाणे असा गुरु प्रभुकार्यासाठी स्वतःला झिजवून जगात सौरभ पसरवितो. असा गुरु वाणीने नाही तर स्वतःच्या वर्तनाने उपदेश देत असतो. सत्कार्यासाठी संकटे सहन करून संस्कृतीचा सुवास पसरविण्याचे शिक्षण शिष्याला गुरुच्या जीवनातून मिळते.

५) विचार गुरु मिळणे फारच दुष्कर आहे.  शिष्याच्या अंधकारमय जीवनात तो प्रकाशप्रदीप प्रगटवितो. अशा गुरूचा स्वतःच्या बुद्धीवर तसाच शिष्याच्या बुद्धीवर पूर्ण विश्वास असतो आणि म्हणूनच तो दुराग्रही न बनता शिष्याला समजावून, त्याच्या बुद्धीत स्वतःचे विचार उतरवून त्याला सन्मार्गावर घेऊन जातो. याच्यासाठी लागणारे अपेक्षित धैर्य त्यांच्याजवळ विपुल प्रमाणात असते. तो समजावताना थकत नाही किंवा कंटाळत नाही. अर्जुनाचा मोह नष्ट करण्यासाठी तसेच त्याच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी गीतेचे १८ अध्याय सांगायला भगवान श्रीकृष्ण कंटाळला नाही आणि एवढे सांगितल्यानंतर ही अर्जुनाच्या विवेक बुद्धीवरील विश्वास तो अनाग्रही राखू शकला आहे. अशा गुरुच्या सानिध्यात शिष्याची बुद्धिनिष्ठा फुलते.

६) अनुग्रह गुरु अतिशय कृपाळू असतो. अपंग बालकाला आई जशी कडेवर घेऊन पर्वतावर चढते तसा अशा अपंग बालकासारख्या, मंद बुद्धीच्या शिष्यावर अनुग्रह करून हा गुरु त्याला पुढे घेऊन जातो. गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही याचं अर्थ असा की, गुरु आपल्याला आपला विकास व अधिकार पाहून ज्ञान देतो. योग्यतेशिवाय मिळालेली विद्या पचत नाही; ती फुटून निघते. न पचलेले अन्न जसे दुर्गंधी निर्माण करते तसे न पचलेले ज्ञान देखील जीवनाला दुर्गंधी बनवते. अनुग्रह गुरु आपली योग्यता व अधिकार अनुरूप ज्ञान आपल्याला देतो. एवढेच नाही तर त्याचा कृपाप्रसाद आपली योग्यता व अधिकार वाढविण्यालाही सहाय्यभूत होतो. अधिकार पाहून उपदेश करतो, पात्र पाहून वाढतो हे सामान्य गुरुबद्दल म्हटले असेल पण ज्याने जगावर मातृप्रेम केले असेल असा हा गुरु तर योग्यता व पात्रता निर्माण करण्यात गौरव मानतो.

या लेखात आपण गुरुच्या सहा प्रकारांची माहिती पाहीली पुढील लेखांत आपण बाकी सहा प्रकारांची माहिती पाहूया..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक