शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अपशकुनाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 05:39 IST

मनबुद्धीतून वैचारिक अध्यात्म विरघाळायला लागलं की मनुष्य पशुवत वागायला सुरुवात करतो. शेकडो संत महात्म्यांनी उत्तम विचारांचे संस्कार जनमानसावर करण्याचे प्रयत्न करूनही आजचा प्रगत माणूस स्वैराचाराला का जवळ करतो हे एक मोठं कोडंच आहे.

- विजयराज बोधनकरमनबुद्धीतून वैचारिक अध्यात्म विरघाळायला लागलं की मनुष्य पशुवत वागायला सुरुवात करतो. शेकडो संत महात्म्यांनी उत्तम विचारांचे संस्कार जनमानसावर करण्याचे प्रयत्न करूनही आजचा प्रगत माणूस स्वैराचाराला का जवळ करतो हे एक मोठं कोडंच आहे. आंधळ्या श्रद्धेने तर हजारो मनांचा ताबा घेतलाय. त्यामुळे सामाजिक परिवर्तनाचा उलट स्वैराचार जास्तच फोफावत चाललाय. बुरसटलेल्या विचारधारा आणि आजचं विज्ञानयुग याची सांगड घालणं हे एक आव्हान वाटायला लागलं. या आंधळ्या विचारधारेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. अशीच एक सत्य घटना घडून गेली. त्याला वीस-पंचवीस वर्षे नक्कीच झाली असतील. एका गावात एका शिक्षकाच्या मुलीचे लग्न होते. मुलीचा भाऊ दूर शहरात नोकरीला होता. तोच घराचा आर्थिक आधार होता. लग्नाच्या दोन दिवस अगोदर मुलीचा भाऊ स्वत:च्या गाडीने लग्नाचा बस्ता घेऊन गावाकडे निघाला आणि दुर्दैवाने पहाटे पहाटे गाडी चालवताना त्याची गाडी एका अवजड यंत्रावर आदळून भावाचा जागीच मृत्यू झाला. गावात बातमी आली. हिरव्या मांडवात हाहाकार माजला. सर्व घर धाय मोकलून रडलं, खचलं. एकुलता एक मुलगा शुभ प्रसंगी जग सोडून गेला. अर्थातच लग्न स्थगित झालं. दुखवट्याच्या सहा महिन्यांनंतर मात्र दु:खाच्या छायेतच लग्नविधी पार पडला. मुलगी आपल्या सासरी निघून गेली. मुलाच्या मृत्यूच्या पोकळीने वडील खचले असताना काही वर्षांतच मुलगी बाळंत झाली. पहिलं अपत्य जन्माला आलं. दु:खाचा वाळवंट जरा ओलावला. घर किंचित हसायला लागलं. त्यानंतर काही वर्षांनी तिला दुसरं मूल झालं आणि पुन्हा एका संकटाचा परीघ मुलीच्या पुढ्यात उभा राहिला. मुलीच्या सासूने, नवऱ्याने तू अपशकुनी आहे, अशी सून घरात नकोय म्हणून दोन्ही मुलं आपल्या ताब्यात ठेवून तिला माहेरी पाठवून दिलं. आईचं हृदय, मुलीसाठी ती रोज रोज आकांत करू लागली. स्वत:च्या मुलीला पाहण्याची तिला परवानगी नव्हती. याच काळात तिचे वडील स्वर्गवासी झाले. एका बहिणीचे लग्न झाले. आई एकटी पडली. एकट्या आईसोबत ही दिवस काढता काढता पोटच्या मुलींच्या विरहात हळूहळू भ्रमिष्ट होऊ लागली आणि एक दिवस या मुलीने आत्महत्या करून या अपशकुनाच्या लावलेल्या शिक्क्यातून आपली सुटका करून घेतली. पहिले झाला तो भावाचा अपघात. ते दु:ख होतेच. अपघात हा भावाच्या अतिआत्मविश्वासामुळे झाला. सोबत एखादा वाहनचालक ठेवला असता तर ही वेळच आली नसती. इतकं साधं समजायला त्या अभागी मुलीच्या नवºयाला सुबुद्धी झाली नाही आणि अपशकुनी म्हणताना त्याची त्याला आणि त्याच्या आईला थोडी ही खंत वाटली नाही. खरं तर हा अंधश्रद्धेचा बळी होता. या आईच्या आत्महत्येचा तिच्या मुलीच्या मनावर कायम वाईट परिणाम झाला असावा किंवा त्याही अंधश्रद्धेच्या मार्गाला तरी लागल्या असाव्यात. म्हणूनच समाजाला आज विचार अध्यात्माची गरज आहे. जुन्या रूढीग्रस्त विचारांना मूठमाती नव्या दमाच्या तरुणांनी द्यायला हवी. म्हणूनच राष्टÑसंत तुकडोजी महाराज म्हणतात.ऐशा ज्या ज्या वाईट रीती।झुगारोनी द्याव्या हातोहातीकरावी पुन्हा नवीन निर्मिती।समाज नियमांची।। ग्रामगीता 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक