शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

स्वभावाचं अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 05:22 IST

माणसांचे अगणित स्वभाव असतात. जसा एक चेहरा दुसऱ्याशी न जुळणारा असतो तसेच स्वभावाचे असते.

- विजयराज बोधनकरमाणसांचे अगणित स्वभाव असतात. जसा एक चेहरा दुसऱ्याशी न जुळणारा असतो तसेच स्वभावाचे असते. हे स्वभाव येतात कुठून, असा प्रश्न निर्माण झाला तर त्याला एकच उत्तर ते म्हणजे पिढ्यान्पिढ्यांच्या पेशीतत्त्वातून येत असतात. स्वभाव आपलं अस्तित्व घेऊन येत असतो. एकाच घरात एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली मुले वेगवेगळ्या स्वभावाची असतात. सख्खी भावंडे अशी वेगवेगळ्या स्वभावाची का, असाही प्रश्न पडतो. यामागचे कारणसुद्धा पिढ्यान्पिढ्यांच्या अगोदरच्या पूर्वजांच्या स्वभाव, गुण, दोष पेशीतत्त्वातून आलेले असतात. ग्रहताऱ्यांचेसुद्धा एक विज्ञान आहे. असे म्हणतात की, स्वभाव जरी बदलता येत नसला तरी विचार मात्र बदलता येतो. विचारक्षमतेमुळे अनेक स्वभाव बदलले आहेत. माझा स्वभाव हा असाच आहे आणि मी असाच वागणार अशा हट्टी स्वभावांची माणसे आपल्या पायावर धोंडा पाडून घेत असतात. हे अनेकदा आजूबाजूच्या घटनांवरून लक्षात येत राहते. आपल्या बाह्य वातावरणाचा, तिथल्या माणसांचा आपल्या मनावर परिणाम होत राहतो म्हणून चांगल्याच्या संगतीत नेहमी राहणारी माणसे बदलत जातात. अनेक ठिकाणी माणसे आपल्या स्वभावामुळे प्रगती करतात किंवा अधोगतीलाही पोहोचतात. यश आणि अपयश हे बरेचसे मानवी स्वभावावर अवलंबून असते. अनेक राजे, राजकारणी, उच्च अधिकारी, कलावंत स्वभावामुळेच स्वत:चं अस्तित्व निर्माण करून गेलेत किंवा आयुष्य मातीमोल करून गेले. जे वेगानेसकारात्मक बदलत गेलेत त्यांची वेगाने प्रगती झाली. ज्यांनी हट्टाने स्वत:ला आहे त्याच स्वभावाला टिकवून ठेवले ते प्रगतीच्या बाबतीत सीमितच राहिले. जगासोबत मी चालेन, असे म्हणणारे जगाच्या गळ्यातले ताईत बनलेत. स्व-भाव हे एक अध्यात्म आहे. चंचल मनस्थिर झाले की झपाट्याने विकासाचा मार्ग नक्कीच मोकळा होतो.