शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

स्वभावाचं अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 05:22 IST

माणसांचे अगणित स्वभाव असतात. जसा एक चेहरा दुसऱ्याशी न जुळणारा असतो तसेच स्वभावाचे असते.

- विजयराज बोधनकरमाणसांचे अगणित स्वभाव असतात. जसा एक चेहरा दुसऱ्याशी न जुळणारा असतो तसेच स्वभावाचे असते. हे स्वभाव येतात कुठून, असा प्रश्न निर्माण झाला तर त्याला एकच उत्तर ते म्हणजे पिढ्यान्पिढ्यांच्या पेशीतत्त्वातून येत असतात. स्वभाव आपलं अस्तित्व घेऊन येत असतो. एकाच घरात एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली मुले वेगवेगळ्या स्वभावाची असतात. सख्खी भावंडे अशी वेगवेगळ्या स्वभावाची का, असाही प्रश्न पडतो. यामागचे कारणसुद्धा पिढ्यान्पिढ्यांच्या अगोदरच्या पूर्वजांच्या स्वभाव, गुण, दोष पेशीतत्त्वातून आलेले असतात. ग्रहताऱ्यांचेसुद्धा एक विज्ञान आहे. असे म्हणतात की, स्वभाव जरी बदलता येत नसला तरी विचार मात्र बदलता येतो. विचारक्षमतेमुळे अनेक स्वभाव बदलले आहेत. माझा स्वभाव हा असाच आहे आणि मी असाच वागणार अशा हट्टी स्वभावांची माणसे आपल्या पायावर धोंडा पाडून घेत असतात. हे अनेकदा आजूबाजूच्या घटनांवरून लक्षात येत राहते. आपल्या बाह्य वातावरणाचा, तिथल्या माणसांचा आपल्या मनावर परिणाम होत राहतो म्हणून चांगल्याच्या संगतीत नेहमी राहणारी माणसे बदलत जातात. अनेक ठिकाणी माणसे आपल्या स्वभावामुळे प्रगती करतात किंवा अधोगतीलाही पोहोचतात. यश आणि अपयश हे बरेचसे मानवी स्वभावावर अवलंबून असते. अनेक राजे, राजकारणी, उच्च अधिकारी, कलावंत स्वभावामुळेच स्वत:चं अस्तित्व निर्माण करून गेलेत किंवा आयुष्य मातीमोल करून गेले. जे वेगानेसकारात्मक बदलत गेलेत त्यांची वेगाने प्रगती झाली. ज्यांनी हट्टाने स्वत:ला आहे त्याच स्वभावाला टिकवून ठेवले ते प्रगतीच्या बाबतीत सीमितच राहिले. जगासोबत मी चालेन, असे म्हणणारे जगाच्या गळ्यातले ताईत बनलेत. स्व-भाव हे एक अध्यात्म आहे. चंचल मनस्थिर झाले की झपाट्याने विकासाचा मार्ग नक्कीच मोकळा होतो.