शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

स्वभावाचं अध्यात्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 05:22 IST

माणसांचे अगणित स्वभाव असतात. जसा एक चेहरा दुसऱ्याशी न जुळणारा असतो तसेच स्वभावाचे असते.

- विजयराज बोधनकरमाणसांचे अगणित स्वभाव असतात. जसा एक चेहरा दुसऱ्याशी न जुळणारा असतो तसेच स्वभावाचे असते. हे स्वभाव येतात कुठून, असा प्रश्न निर्माण झाला तर त्याला एकच उत्तर ते म्हणजे पिढ्यान्पिढ्यांच्या पेशीतत्त्वातून येत असतात. स्वभाव आपलं अस्तित्व घेऊन येत असतो. एकाच घरात एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली मुले वेगवेगळ्या स्वभावाची असतात. सख्खी भावंडे अशी वेगवेगळ्या स्वभावाची का, असाही प्रश्न पडतो. यामागचे कारणसुद्धा पिढ्यान्पिढ्यांच्या अगोदरच्या पूर्वजांच्या स्वभाव, गुण, दोष पेशीतत्त्वातून आलेले असतात. ग्रहताऱ्यांचेसुद्धा एक विज्ञान आहे. असे म्हणतात की, स्वभाव जरी बदलता येत नसला तरी विचार मात्र बदलता येतो. विचारक्षमतेमुळे अनेक स्वभाव बदलले आहेत. माझा स्वभाव हा असाच आहे आणि मी असाच वागणार अशा हट्टी स्वभावांची माणसे आपल्या पायावर धोंडा पाडून घेत असतात. हे अनेकदा आजूबाजूच्या घटनांवरून लक्षात येत राहते. आपल्या बाह्य वातावरणाचा, तिथल्या माणसांचा आपल्या मनावर परिणाम होत राहतो म्हणून चांगल्याच्या संगतीत नेहमी राहणारी माणसे बदलत जातात. अनेक ठिकाणी माणसे आपल्या स्वभावामुळे प्रगती करतात किंवा अधोगतीलाही पोहोचतात. यश आणि अपयश हे बरेचसे मानवी स्वभावावर अवलंबून असते. अनेक राजे, राजकारणी, उच्च अधिकारी, कलावंत स्वभावामुळेच स्वत:चं अस्तित्व निर्माण करून गेलेत किंवा आयुष्य मातीमोल करून गेले. जे वेगानेसकारात्मक बदलत गेलेत त्यांची वेगाने प्रगती झाली. ज्यांनी हट्टाने स्वत:ला आहे त्याच स्वभावाला टिकवून ठेवले ते प्रगतीच्या बाबतीत सीमितच राहिले. जगासोबत मी चालेन, असे म्हणणारे जगाच्या गळ्यातले ताईत बनलेत. स्व-भाव हे एक अध्यात्म आहे. चंचल मनस्थिर झाले की झपाट्याने विकासाचा मार्ग नक्कीच मोकळा होतो.