शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

जगण्याची कला शिकविणारे आध्यात्मिक गुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:51 IST

आध्यात्मिक गुरू म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो, त्या श्री श्री रवीशंकर यांचा १३ मे हा जन्मदिन.

आध्यात्मिक गुरू म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो, त्या श्री श्री रवीशंकर यांचा १३ मे हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांचे आध्यात्मिक कार्य, शांततेसाठी केलेले प्रयत्न, योगाच्या प्रसारासाठी त्यांनी दिलेले योगदान, वेगवेगळ््या क्षेत्रांतील थक्क करणारेकाम यावर टाकलेला दृष्टिक्षेप...आनंदाने जगण्याची कला म्हणजेच ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ असा नुसता उल्लेख जरी केला, तरी श्री श्री रवीशंकर यांचे अहोरात्र सुरू असलेले कार्य डोळ््यासमोर उभे राहते. आध्यात्मिक शांती, योगा, जगण्याची नवी दृष्टी देणारी प्रेरणा, जेथे जेथे संघर्ष आहे, तेथे हळूवार फुंकर घालण्याचे काम, शेतकऱ्यांना केलेली मदत अशा विविध कारणांनी श्री श्री रवीशंकर यांचे काम आपल्या सदैव स्मरणात राहते.यमुनातटी जागतिक शांततेसाठी केलेले प्रयत्न असोत, की राम मंदिरासाठी केलेली मध्यस्थी असो, त्यातील त्यांचा पुढाकार नेहमीच चर्चेत राहिला आहे.योगाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदानही अमूल्य आहे. जगण्याची कला शिकवताना त्यातील मन:शांतीचे, आनंद मिळवण्याचे प्रयत्न किती महत्वाचे आहेत हे त्यांनी त्यांच्या जगभरातील अनुयायांना शिकवले. त्यातून कोट्यवधी लोकांचे जगणे समृद्ध केले. अजूनही करत आहेत.जगात जेथे संघर्ष आहे, तेथे त्यांनी शांततेसाठी धाव घेतल्याचे दिसून येते. इसीसचा संघर्ष, कोलंबियातील गृहयुद्ध, इराकमधील तापलेले वातावरण अशा अनेक ठिकाणी त्यांनी शांततेसाठी पुढाकार घेतला. विद्रोहींना हिंसाचाराचा मार्ग सोडून शांततेचा मार्ग स्वीकारण्यासाठी त्यांचे मन वळवण्यात रवीशंकर यांच्या प्रयत्नांनी यश मिळाले. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी किंवा फुटीरतावाद्यांनी हाती घेतलेल्या बंदुका खाली ठेवाव्यात म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, त्यात त्यांचाही समावेश आहे. तेथे सामाजिक चळवळ सुरू करण्यात, १२ हजार काश्मिरींना एकत्रित आणण्यात त्यांनी मोलाचा पुढाकार घेतला. उत्तर पूर्व भारतातील सात राज्यातील प्रमुख विद्रोही गटांना एकाच मंचावर आणून त्यांच्यात समेट घडवून आण्याचे प्रयत्न त्यांनी केले. तेथे विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचे कामही त्यांनी केले.मन:शांती आणि आंतरिक स्थैर्य कसे प्राप्त करावे, याची शिकवण देण्याचे कामही रवीशंकर यांच्यातर्फे अखंड सुरू आहे. ज्यांनी शिकवलेली जगण्याची कला- आर्ट आॅफ लिव्हिंग- जगभरातील ४५ कोटी जणांनी आत्मसात केली आहे, यातच त्यांच्या कामाचे यश सामावले आहे. त्यात शेतकऱ्यांपासून कॉर्पोरेट कल्चरपर्यंतच्या सर्व वर्गांचा समावेश आहे, हे विशेष. देशातील ४१ कोरड्या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी धडपड, जगातील ६५ देशांतील आठ लाख कैद्यांचे पुनर्वसन, आपत्कालीन क्षेत्रात मदतकार्य, शिक्षणाचा प्रसार करण्यापर्यंत अश्या सर्व क्षेत्रांत त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.१९ राज्यांतील २२ लाख शेतकºयांसाठी झिरो कॉस्ट शेतीचे प्रशिक्षण, स्वच्छता मोहीम, ग्रामीण भागात सामुदायिक नेतृत्वासाठी ४० हजार खेड्यांतील सुमारे अडीच लाख युवकांना प्रशिक्षण, ३६ देशात आणि भारतातील २६ राज्यात आठ कोटी १० लाख वृक्षांचे रोपण, ३८१९ घरे, ६२ हजारांपेक्षाही अधिक शौचालये, १२०० बोअरवेल्स, १५९२ बायोगॅस प्लँट अशी त्यांच्या कामांची यादी चढती आहे. नुकतेच त्यांच्यातर्फे राष्ट्रीय नशामुक्त भारत अभियान सुरू झाले.जर तुमचे मन तणावमुक्त असेल, तरच तुम्ही सकारात्मक विचार करू शकता, असा संदेश रवीशंकर देतात. जगण्याची कला शिकवण्याचे त्यांचे कार्य असेच सुरू ठेवण्याची ऊर्जा त्यांच्याकडून यापुढेही सर्वांना मिळत राहील.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक