शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

दुराचारी माणसे मानवी जीवनाला घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 09:38 IST

सदाचारी माणूस कोणतेही पाऊल टाकताना जपून टाकतो

एकूण मानवी जीवनाचा विचार करता त्याचे आचारण फार महत्त्वाचे असते. काही माणसे सदाचारी, तर काही दुराचारी असतात. सदाचारी माणसे नीतिच्या मार्गाने जगतात अन् त्यातच त्यांना आनंद मिळतो. दुराचारी माणसे नास्तिकतेने वागतात. सदाचारी माणूस कोणतेही पाऊल टाकताना जपून टाकतो. त्याच्याकडे असलेल्या मन-बुद्धीचा वापर सद्गतीने करतो. भ्रामक कल्पनांना थारा देत नाही. जीवनाची पवित्रम अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. तर दुराचारी हा आपल्या मन-बुद्धीचा वापर निरर्थक गोष्टींसाठी करतो. पथभ्रष्ट मार्गावर चालतो. पातकांच्या राशी तयार करतो. भ्रामक कल्पनांनी बरबटलेला असतो. संशयीवृत्ती त्याची पाठ सोडत नाही. दुर्वर्तनाने तो उन्मत झालेला असतो. स्वैराचाराचे आकांड-तांडव करतो. स्वत:ही मरतो व दुसऱ्यालाही घेऊन मरतो.

दुराचारी माणसे मानवी जीवनात घातक असतात. सदाचारी माणसे मिळेल त्यात समाधानी असतात. मृतिका-पाषाण, वृक्षवल्ली कृतिकीटक, पशुपक्षी इत्यादींना विशिष्ट प्रकारची उपमा देऊन त्यांचा आदर करतात. सदाचारी माणूस ईश्वरनिष्ठ असतो. शरीराची कार्यक्षमता आहे तोपर्यंत तो सदाचारण करतो. स्वत:ला घालून दिलेली बंधने निष्ठेने पाळतो. निर्भयतेने जगतो. दैवी संपत्तीचा अंगीकार करतो. तो नेहमी कृतज्ञ वृत्तीने वागतो. त्याच्या मनात आदराची भावना असते. ईश्वराच्या ठिकाणी तो शुद्ध-सत्वात्मक रीतीने भाव ठेवतो. भक्तिमार्गाचा आधार घेतो. संत-महात्म्यांचा आदर करतो. परिस्थिती अनुकूल असो व प्रतिकूल त्यात तो समाधानाने जगतो.

सदाचारी माणूस अध्यात्माशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही मोहाला बळी पडत नाही. गरज आणि चैन यामधले अंतर जाणतो. श्रद्धा आणि विश्वास त्याचे मूळपाठीराखे असतात. मानवी जीवनाचे अंतिम ध्येय गाठण्याचा प्रयास करतो. सर्वांचे कल्याण कसे होईल याचे चिंतन करतो. सदाचारी माणूस बुद्धीला नीट-नेटके ठेवण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही ऐहिक, पारलौकिक स्वारस्याचा मोह त्याच्या ठिकाणी रूजवत नाही. अलौकिक सामर्थ्य त्यांच्या अंगी असते. सदाचारी माणूस जीवनाचे नीजधाम गाठतो. मनामध्ये मत्सर ठेवत नाही. बाह्यविषयांचे तो आकर्षण ठेवत नाही. सदाचारी माणसे रंजल्या-गांजल्यांच्या सेवेतच देवत्व जाणतात. आपण सदाचारी व दुराचारी दोन्ही व्यक्तींच्या स्वभावाचा आढावा घेतला. माणसांचे मन ज्या संस्कारात घडले ते संस्कार त्यावर होतात. संस्कारातून माणूस सदाचारी किंवा दुराचारी होतो. काहीअंशी त्याचे कर्म त्याला तसे बनवते. परंतु सदाचारी व्हा-आनंद द्विगुणीत करा.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक