शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समाधानाचे मूळ

By admin | Updated: August 17, 2016 17:33 IST

समाधान’ प्रत्येकालाच हवे असते. ते मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न करीत असते. कधीकधी प्रयत्न करून, प्रयत्न साफल्याचे प्रयत्नपूर्तीचे समाधान मिळते

- प्रा. डॉ. यशवंत पाटील
 
‘समाधान’ प्रत्येकालाच हवे असते. ते मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न करीत असते. कधीकधी प्रयत्न करून, प्रयत्न साफल्याचे प्रयत्नपूर्तीचे समाधान मिळतेही. पण, ते काही काळापुरते. त्या त्या घटना, प्रसंग, व्यक्ती इत्यादींशी निगडीत असते. ते चिरकालीन नसते. अर्थात या अशा समाधानाला कमी लेखून चालणार नाही. ते मिळवण्याचाही प्रयत्न करावयास हवा. अन्यथा व्यक्तीच्या सर्जनशीलतेला, क्रयशक्तीला बाधा येईल. समाधान-असमाधानाचा झोका अथवा लंबक हा मागे-पुढे होत असतो. हे वास्तव मनोमन ठसवून जीवन जगण्यात ‘मौज’ आहे. ही मौज त्या-त्या क्षणापुरती मनापासून लुटावयास हवी.
समाधानास आशेची, भविष्यातील आशावादाची झालर असावी. यातूनच वर्तमानात मिळणाऱ्या समाधानाची चव कळत असते. उदा. विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देत शेतकरी शेतात राब-राबतो, ते कोणत्या आशेवर? चांगले पिक येईल, त्यातून समाधान लाभेल या आशेवरच ना? हेच आचार-विचार सूत्र प्रत्येक निर्मितीच्या पाठीमागे असते, असावे. आशावाद त्यातून मिळणारे समाधान हा विचार लोप पावल्यास जीवनात, कोणतेही काम करण्यात रुक्षता येईल.
‘समाधाना’बाबत सॉक्रेटीस म्हणतो, आयुष्यात समाधान कशाला म्हणावे? तर जे मिळाल्यानंतर वा मिळविल्यानंतर दुसरे अन्य काहीही हवे-हवेसे न वाटणे या मानसिक स्थितीला समाधान म्हणावे. श्री संत गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘समाधान मिळविण्यासाठी घर-प्रपंच, बायको-मुले, मित्र-आप्तेष्टांकडे पाठ फिरविण्याची गरज नाही. या सर्वांना सोडून कितीही दूर वनात एकांतात डोंगर दऱ्या-खोऱ्यात गेलात आणि मन त्या सर्वांमध्येच गुंतलेले असेल तर समाधान कसे मिळणार? काम, क्रोध, राग, लोभ, मोह, मत्सर या षड्रिपूंचा आणि समाधानाचा छत्तीसचा आकडा आहे. या शत्रूसंगे समाधान नांदूच शकत नाही. ‘षडरिपू बाळगुणी मनी । कोण होईल समाधानी ।’
समाधान प्राप्तीवर ‘सुख-दु:ख समे कृत्वा । मनीचा भाव जयाचा । तो समाधानी अक्षय काळाचा ।। आपले ‘मन’ हेच समाधानाचे खरे मूळ आहे. शीख धर्मगुरू गुरूनानक म्हणतात, ज्याच्या मनरूपी भांड्यास तळच (बूड) नसतो ते भांडे कितीही कशानेही भरा, ते रिकामेच राहते’ प्रयत्न करीतच रहायचे पण, ठेविले अनंते (परमेश्वराने) तैसेची रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।। यावर श्री संत तुकाराम महाराजांनी एक उपाय सांगितला आहे, ‘मन करारे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।।’ बदलत्या जीवनशैलीतही, सर्व सुख-सुविधांच्या उपलब्धतेत अथवा कमतरतेत ‘मन’ हेच समाधानाचे मूळ आहे.