शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

समाधानाचे मूळ

By admin | Updated: August 17, 2016 17:33 IST

समाधान’ प्रत्येकालाच हवे असते. ते मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न करीत असते. कधीकधी प्रयत्न करून, प्रयत्न साफल्याचे प्रयत्नपूर्तीचे समाधान मिळते

- प्रा. डॉ. यशवंत पाटील
 
‘समाधान’ प्रत्येकालाच हवे असते. ते मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न करीत असते. कधीकधी प्रयत्न करून, प्रयत्न साफल्याचे प्रयत्नपूर्तीचे समाधान मिळतेही. पण, ते काही काळापुरते. त्या त्या घटना, प्रसंग, व्यक्ती इत्यादींशी निगडीत असते. ते चिरकालीन नसते. अर्थात या अशा समाधानाला कमी लेखून चालणार नाही. ते मिळवण्याचाही प्रयत्न करावयास हवा. अन्यथा व्यक्तीच्या सर्जनशीलतेला, क्रयशक्तीला बाधा येईल. समाधान-असमाधानाचा झोका अथवा लंबक हा मागे-पुढे होत असतो. हे वास्तव मनोमन ठसवून जीवन जगण्यात ‘मौज’ आहे. ही मौज त्या-त्या क्षणापुरती मनापासून लुटावयास हवी.
समाधानास आशेची, भविष्यातील आशावादाची झालर असावी. यातूनच वर्तमानात मिळणाऱ्या समाधानाची चव कळत असते. उदा. विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देत शेतकरी शेतात राब-राबतो, ते कोणत्या आशेवर? चांगले पिक येईल, त्यातून समाधान लाभेल या आशेवरच ना? हेच आचार-विचार सूत्र प्रत्येक निर्मितीच्या पाठीमागे असते, असावे. आशावाद त्यातून मिळणारे समाधान हा विचार लोप पावल्यास जीवनात, कोणतेही काम करण्यात रुक्षता येईल.
‘समाधाना’बाबत सॉक्रेटीस म्हणतो, आयुष्यात समाधान कशाला म्हणावे? तर जे मिळाल्यानंतर वा मिळविल्यानंतर दुसरे अन्य काहीही हवे-हवेसे न वाटणे या मानसिक स्थितीला समाधान म्हणावे. श्री संत गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘समाधान मिळविण्यासाठी घर-प्रपंच, बायको-मुले, मित्र-आप्तेष्टांकडे पाठ फिरविण्याची गरज नाही. या सर्वांना सोडून कितीही दूर वनात एकांतात डोंगर दऱ्या-खोऱ्यात गेलात आणि मन त्या सर्वांमध्येच गुंतलेले असेल तर समाधान कसे मिळणार? काम, क्रोध, राग, लोभ, मोह, मत्सर या षड्रिपूंचा आणि समाधानाचा छत्तीसचा आकडा आहे. या शत्रूसंगे समाधान नांदूच शकत नाही. ‘षडरिपू बाळगुणी मनी । कोण होईल समाधानी ।’
समाधान प्राप्तीवर ‘सुख-दु:ख समे कृत्वा । मनीचा भाव जयाचा । तो समाधानी अक्षय काळाचा ।। आपले ‘मन’ हेच समाधानाचे खरे मूळ आहे. शीख धर्मगुरू गुरूनानक म्हणतात, ज्याच्या मनरूपी भांड्यास तळच (बूड) नसतो ते भांडे कितीही कशानेही भरा, ते रिकामेच राहते’ प्रयत्न करीतच रहायचे पण, ठेविले अनंते (परमेश्वराने) तैसेची रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।। यावर श्री संत तुकाराम महाराजांनी एक उपाय सांगितला आहे, ‘मन करारे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।।’ बदलत्या जीवनशैलीतही, सर्व सुख-सुविधांच्या उपलब्धतेत अथवा कमतरतेत ‘मन’ हेच समाधानाचे मूळ आहे.