शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

समाधानाचे मूळ

By admin | Updated: August 17, 2016 17:33 IST

समाधान’ प्रत्येकालाच हवे असते. ते मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न करीत असते. कधीकधी प्रयत्न करून, प्रयत्न साफल्याचे प्रयत्नपूर्तीचे समाधान मिळते

- प्रा. डॉ. यशवंत पाटील
 
‘समाधान’ प्रत्येकालाच हवे असते. ते मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न करीत असते. कधीकधी प्रयत्न करून, प्रयत्न साफल्याचे प्रयत्नपूर्तीचे समाधान मिळतेही. पण, ते काही काळापुरते. त्या त्या घटना, प्रसंग, व्यक्ती इत्यादींशी निगडीत असते. ते चिरकालीन नसते. अर्थात या अशा समाधानाला कमी लेखून चालणार नाही. ते मिळवण्याचाही प्रयत्न करावयास हवा. अन्यथा व्यक्तीच्या सर्जनशीलतेला, क्रयशक्तीला बाधा येईल. समाधान-असमाधानाचा झोका अथवा लंबक हा मागे-पुढे होत असतो. हे वास्तव मनोमन ठसवून जीवन जगण्यात ‘मौज’ आहे. ही मौज त्या-त्या क्षणापुरती मनापासून लुटावयास हवी.
समाधानास आशेची, भविष्यातील आशावादाची झालर असावी. यातूनच वर्तमानात मिळणाऱ्या समाधानाची चव कळत असते. उदा. विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देत शेतकरी शेतात राब-राबतो, ते कोणत्या आशेवर? चांगले पिक येईल, त्यातून समाधान लाभेल या आशेवरच ना? हेच आचार-विचार सूत्र प्रत्येक निर्मितीच्या पाठीमागे असते, असावे. आशावाद त्यातून मिळणारे समाधान हा विचार लोप पावल्यास जीवनात, कोणतेही काम करण्यात रुक्षता येईल.
‘समाधाना’बाबत सॉक्रेटीस म्हणतो, आयुष्यात समाधान कशाला म्हणावे? तर जे मिळाल्यानंतर वा मिळविल्यानंतर दुसरे अन्य काहीही हवे-हवेसे न वाटणे या मानसिक स्थितीला समाधान म्हणावे. श्री संत गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘समाधान मिळविण्यासाठी घर-प्रपंच, बायको-मुले, मित्र-आप्तेष्टांकडे पाठ फिरविण्याची गरज नाही. या सर्वांना सोडून कितीही दूर वनात एकांतात डोंगर दऱ्या-खोऱ्यात गेलात आणि मन त्या सर्वांमध्येच गुंतलेले असेल तर समाधान कसे मिळणार? काम, क्रोध, राग, लोभ, मोह, मत्सर या षड्रिपूंचा आणि समाधानाचा छत्तीसचा आकडा आहे. या शत्रूसंगे समाधान नांदूच शकत नाही. ‘षडरिपू बाळगुणी मनी । कोण होईल समाधानी ।’
समाधान प्राप्तीवर ‘सुख-दु:ख समे कृत्वा । मनीचा भाव जयाचा । तो समाधानी अक्षय काळाचा ।। आपले ‘मन’ हेच समाधानाचे खरे मूळ आहे. शीख धर्मगुरू गुरूनानक म्हणतात, ज्याच्या मनरूपी भांड्यास तळच (बूड) नसतो ते भांडे कितीही कशानेही भरा, ते रिकामेच राहते’ प्रयत्न करीतच रहायचे पण, ठेविले अनंते (परमेश्वराने) तैसेची रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।। यावर श्री संत तुकाराम महाराजांनी एक उपाय सांगितला आहे, ‘मन करारे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।।’ बदलत्या जीवनशैलीतही, सर्व सुख-सुविधांच्या उपलब्धतेत अथवा कमतरतेत ‘मन’ हेच समाधानाचे मूळ आहे.