शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

समाधानाचे मूळ

By admin | Updated: August 17, 2016 17:33 IST

समाधान’ प्रत्येकालाच हवे असते. ते मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न करीत असते. कधीकधी प्रयत्न करून, प्रयत्न साफल्याचे प्रयत्नपूर्तीचे समाधान मिळते

- प्रा. डॉ. यशवंत पाटील
 
‘समाधान’ प्रत्येकालाच हवे असते. ते मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या क्षमतेनुसार प्रयत्न करीत असते. कधीकधी प्रयत्न करून, प्रयत्न साफल्याचे प्रयत्नपूर्तीचे समाधान मिळतेही. पण, ते काही काळापुरते. त्या त्या घटना, प्रसंग, व्यक्ती इत्यादींशी निगडीत असते. ते चिरकालीन नसते. अर्थात या अशा समाधानाला कमी लेखून चालणार नाही. ते मिळवण्याचाही प्रयत्न करावयास हवा. अन्यथा व्यक्तीच्या सर्जनशीलतेला, क्रयशक्तीला बाधा येईल. समाधान-असमाधानाचा झोका अथवा लंबक हा मागे-पुढे होत असतो. हे वास्तव मनोमन ठसवून जीवन जगण्यात ‘मौज’ आहे. ही मौज त्या-त्या क्षणापुरती मनापासून लुटावयास हवी.
समाधानास आशेची, भविष्यातील आशावादाची झालर असावी. यातूनच वर्तमानात मिळणाऱ्या समाधानाची चव कळत असते. उदा. विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देत शेतकरी शेतात राब-राबतो, ते कोणत्या आशेवर? चांगले पिक येईल, त्यातून समाधान लाभेल या आशेवरच ना? हेच आचार-विचार सूत्र प्रत्येक निर्मितीच्या पाठीमागे असते, असावे. आशावाद त्यातून मिळणारे समाधान हा विचार लोप पावल्यास जीवनात, कोणतेही काम करण्यात रुक्षता येईल.
‘समाधाना’बाबत सॉक्रेटीस म्हणतो, आयुष्यात समाधान कशाला म्हणावे? तर जे मिळाल्यानंतर वा मिळविल्यानंतर दुसरे अन्य काहीही हवे-हवेसे न वाटणे या मानसिक स्थितीला समाधान म्हणावे. श्री संत गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘समाधान मिळविण्यासाठी घर-प्रपंच, बायको-मुले, मित्र-आप्तेष्टांकडे पाठ फिरविण्याची गरज नाही. या सर्वांना सोडून कितीही दूर वनात एकांतात डोंगर दऱ्या-खोऱ्यात गेलात आणि मन त्या सर्वांमध्येच गुंतलेले असेल तर समाधान कसे मिळणार? काम, क्रोध, राग, लोभ, मोह, मत्सर या षड्रिपूंचा आणि समाधानाचा छत्तीसचा आकडा आहे. या शत्रूसंगे समाधान नांदूच शकत नाही. ‘षडरिपू बाळगुणी मनी । कोण होईल समाधानी ।’
समाधान प्राप्तीवर ‘सुख-दु:ख समे कृत्वा । मनीचा भाव जयाचा । तो समाधानी अक्षय काळाचा ।। आपले ‘मन’ हेच समाधानाचे खरे मूळ आहे. शीख धर्मगुरू गुरूनानक म्हणतात, ज्याच्या मनरूपी भांड्यास तळच (बूड) नसतो ते भांडे कितीही कशानेही भरा, ते रिकामेच राहते’ प्रयत्न करीतच रहायचे पण, ठेविले अनंते (परमेश्वराने) तैसेची रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।। यावर श्री संत तुकाराम महाराजांनी एक उपाय सांगितला आहे, ‘मन करारे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।।’ बदलत्या जीवनशैलीतही, सर्व सुख-सुविधांच्या उपलब्धतेत अथवा कमतरतेत ‘मन’ हेच समाधानाचे मूळ आहे.