शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

समस्येची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 05:39 IST

सद्गुण असलेल्या व्यक्ती मान्य करून त्यांना आदर द्यावाच. त्या गुणांना मान द्यावा हा श्रीचक्रधरांचा उपदेश आहे. ही गुणांची पूजा ...

सद्गुण असलेल्या व्यक्ती मान्य करून त्यांना आदर द्यावाच. त्या गुणांना मान द्यावा हा श्रीचक्रधरांचा उपदेश आहे. ही गुणांची पूजा आहे. हे पूजास्थल आहे. जातपात धर्म व देशांच्या सीमा पार करून ही पूजा केली जाते. कलागुणांचा हा प्रवास समुद्र ओलांडून येतो-जातो. शतकानुशतके टिकून राहतो. हा व्यवहार स्वामीसुद्धा सांभाळत होते. प्रकाशा देव, परमाणुभव या सत्पुरुषांचा त्यांनी सन्मान राखला.

उपाधीत सामर्थ्य असतं, एक अंतर, एक बाह्य, तिसरं उभय सामर्थ्य असतं. काही दृश्य, काही अदृश्य असतं. ते खरंच असेल तर स्वत:ची अहंता बाजूला सारून ते मानावं. विरोध नको. त्याचं वलय दुखावलं जाईल व त्याचा उपद्रव होऊ शकतो. सामर्थ्यासोबत जे जे लढले ते पराजित झाले. लुईपुईच्या कथेतला राजा हरल्याची कथा स्वामींनी सांगितली आहे. म्हणून ऋषींनी भारतीयांच्या मनात सर्वच जडचेतन वस्तूंविषयी आपल्या मनात आदराचं बीज पेरलं आहे. भारतमाता, धरणीमाता असं कुठल्याच देशात म्हटलं जात नाही. जे भव्य, दिव्य, उदात्त आहे तिथं भारतीय नतमस्तक होतो. गंगामय्या, जमुनामय्या केवढी ही ममता, इथे सापांचा सण, बैलांचा सण साजरा होतो. आमच्या पूर्वजांनी तर कोकिळेत सूर शोधला, मोरात नृत्य व सुगरणीत घर शोधलं. हिमालयाची उंची, पाताळाखाली खोली आम्हाला अतिशय आवडते. सूत्र किती छोटं, दोनच शब्दांचं व सहा अक्षरांचं, पण ते धारदारी तलवारीसारखं अहंकाराच्या पोटात घुसतं व दंभाला नम्र करतं.

आशीर्वाद व नमनाचं मिलन घडवतं. उपाधीचं दडपण व दंभाचं मीपण विलया जातं, खाली उरतो तो फक्त आनंद. अहंतेचं मूळ कंदासह उपटून फेकावं लागतं. कारण त्याशिवाय शांती मिळत नाही. समस्येच्या मुळाशी गेलं की तिची उकल होऊन होते. मच्छरांचं मूळ घाण जागेत असतं. भांडणाचं कारण भांडणात नाही. ते अहंतेत असतं. अहंकार हा उपाधवंत, संत, महंतात नसतो.-बा.भो. शास्त्री