शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

समस्येची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 05:39 IST

सद्गुण असलेल्या व्यक्ती मान्य करून त्यांना आदर द्यावाच. त्या गुणांना मान द्यावा हा श्रीचक्रधरांचा उपदेश आहे. ही गुणांची पूजा ...

सद्गुण असलेल्या व्यक्ती मान्य करून त्यांना आदर द्यावाच. त्या गुणांना मान द्यावा हा श्रीचक्रधरांचा उपदेश आहे. ही गुणांची पूजा आहे. हे पूजास्थल आहे. जातपात धर्म व देशांच्या सीमा पार करून ही पूजा केली जाते. कलागुणांचा हा प्रवास समुद्र ओलांडून येतो-जातो. शतकानुशतके टिकून राहतो. हा व्यवहार स्वामीसुद्धा सांभाळत होते. प्रकाशा देव, परमाणुभव या सत्पुरुषांचा त्यांनी सन्मान राखला.

उपाधीत सामर्थ्य असतं, एक अंतर, एक बाह्य, तिसरं उभय सामर्थ्य असतं. काही दृश्य, काही अदृश्य असतं. ते खरंच असेल तर स्वत:ची अहंता बाजूला सारून ते मानावं. विरोध नको. त्याचं वलय दुखावलं जाईल व त्याचा उपद्रव होऊ शकतो. सामर्थ्यासोबत जे जे लढले ते पराजित झाले. लुईपुईच्या कथेतला राजा हरल्याची कथा स्वामींनी सांगितली आहे. म्हणून ऋषींनी भारतीयांच्या मनात सर्वच जडचेतन वस्तूंविषयी आपल्या मनात आदराचं बीज पेरलं आहे. भारतमाता, धरणीमाता असं कुठल्याच देशात म्हटलं जात नाही. जे भव्य, दिव्य, उदात्त आहे तिथं भारतीय नतमस्तक होतो. गंगामय्या, जमुनामय्या केवढी ही ममता, इथे सापांचा सण, बैलांचा सण साजरा होतो. आमच्या पूर्वजांनी तर कोकिळेत सूर शोधला, मोरात नृत्य व सुगरणीत घर शोधलं. हिमालयाची उंची, पाताळाखाली खोली आम्हाला अतिशय आवडते. सूत्र किती छोटं, दोनच शब्दांचं व सहा अक्षरांचं, पण ते धारदारी तलवारीसारखं अहंकाराच्या पोटात घुसतं व दंभाला नम्र करतं.

आशीर्वाद व नमनाचं मिलन घडवतं. उपाधीचं दडपण व दंभाचं मीपण विलया जातं, खाली उरतो तो फक्त आनंद. अहंतेचं मूळ कंदासह उपटून फेकावं लागतं. कारण त्याशिवाय शांती मिळत नाही. समस्येच्या मुळाशी गेलं की तिची उकल होऊन होते. मच्छरांचं मूळ घाण जागेत असतं. भांडणाचं कारण भांडणात नाही. ते अहंतेत असतं. अहंकार हा उपाधवंत, संत, महंतात नसतो.-बा.भो. शास्त्री