शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मस्तक ठेंगणा।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 16:23 IST

मस्तक ठेंगणा। करी संतांच्या चरणा।। सामान्य मानवी जीवन जगताना आम्हाला आमच्या दैनंदिन व्यवहारात कितीतरी वेळा झुकावं लागतं. वेगवेगळ्या व्यक्ती, ...

ठळक मुद्देजीवनाची बिघडलेली सूत्रे व्यवस्थित करतात.

मस्तक ठेंगणा। करी संतांच्या चरणा।।सामान्य मानवी जीवन जगताना आम्हाला आमच्या दैनंदिन व्यवहारात कितीतरी वेळा झुकावं लागतं. वेगवेगळ्या व्यक्ती, परिस्थिती आणि घटना यांना शरण जावं लागतं किंवा त्यांच्यासमोर आपला माथा झुकवावा लागतो. तुकोबारायांच्या मते जर मस्तक झुकवणं अपरिहार्यच असेल तर संतांच्या किंवा सज्जनांच्या चरणी ते झुकवावं. याचं कारण असं की, इतर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या झुकण्याचा अर्थ वेगवेगळा काढला जाईल. कधी कधी त्याचं भांडवलही केलं जातं; पण संतांच्या चरणी लीन झालं, की संत आपल्या झुकण्याला सार्थता आणि सार्थकता प्राप्त करून देतात. जीवनाचे हरवलेले सूर शोधून देतात. जीवनाची बिघडलेली सूत्रे व्यवस्थित करतात. याचसाठी आमचे तुकोबाराय म्हणतात की,‘भाग्याचा उदय। ते हे जोडी संतपाय।।’आमच्या जीवनातील आम्ही भाग्य म्हणून समजत असलेल्या सर्वच गोष्टींना भाग्य समजता येईल असं नाही, पण‘भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा।निकट वास बरा संतापायी।।या न्यायाने सज्जनांच्या पायांची उपासना आपल्याला करता येणं हेच आपलं खरं भाग्य. आम्ही या भाग्याच्या अधीन झालो, की होणारा आणखीन एक फायदा म्हणजे आम्ही सुखी होतो आणि खूप सुखी होतो. सज्जनांच्या पायी प्राप्त होणारं सुख खूप खूप अनमोल असून, ते अद्वितीय आहे; मात्र आपण जर दुर्जनांच्या पायांची उपासना करू लागलो किंवा त्याची संगत करू लागलो, तर त्याची फळंही आपल्याला तशीच मिळत राहतील, म्हणूनच सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, हे आपण आचरणात आणलं, तर सज्जनांच्या पायांची उपासना आपोआपच घडेल आणि सुख मिळेल. आपण ते अनुभवावं एवढीच अपेक्षा.