शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शिवस्वरोदय शास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 04:25 IST

पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक माणूस हा सुखाच्या शोधात असतो. वेगवेगळ्या मार्गाने व वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तो सुख शोधण्याचा प्रयत्न करीत असतो, पण त्याला सुख मिळते का? नाही! कारण सुख ही वस्तू नसून विचारांची एक स्थिती आहे.

-  डॉ. विजय जंगम (स्वामी)

पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक माणूस हा सुखाच्या शोधात असतो. वेगवेगळ्या मार्गाने व वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तो सुख शोधण्याचा प्रयत्न करीत असतो, पण त्याला सुख मिळते का? नाही! कारण सुख ही वस्तू नसून विचारांची एक स्थिती आहे. ती बाहेरील धडपडीत नसून आपल्या आत आहे. म्हणजेच बहिर्मुखतेत नसून अंतर्मुखतेत आहे. मनच अशांत असेल, तर मनशांती कसली? ।।विचारी मना तू शोधूनी पाहे।। या समर्थांच्या उक्तीप्रमाणे जर का सुखाचा शोध मनाच्या माध्यमाने घ्यायचा ठरविला, तर कळेल की ब्रह्मांडी जे जे वसे ते पिंडी असे। अखिल ब्रह्मांडाचा नायक जो शिवशंकर तो महायोगी असून, त्याच्यामार्फत वरील संदेश सर्व भूलोकस्थ मानवांना ऋषिमुनींद्वारे ज्ञात झाले आहे. हे ज्ञान म्हणजेच अतिप्राचीन असो वा शिवस्वरोदय शास्त्र होय. हा संस्कृत ग्रंथ असून, यामध्ये शिवाने पार्वतीला सांगितलेले पिंड ब्रह्मांडासंबंधीचे व्यवहारिक व आध्यात्मिक ज्ञान आहे. शिवस्वरोदय या ग्रंथात ३९५ श्लोक आहेत. त्या श्लोकाच्या आधारे विज्ञान, तत्त्वज्ञान, आरोग्यप्राप्ती, भविष्यज्ञान, गर्भवतीचे प्रश्न, होराशास्त्र इत्यादी गोष्टींचे अनुमान काढता येते.यक्ष, गण, किन्नर, गंधर्व इ. ईश्वरनिर्मित योनीतील देहांपेक्षा मनुष्य देह हा अनेक दृष्टीने श्रेष्ठ व कार्यक्षम आहे, म्हणून परमात्माशक्ती मानवी देहरूपातच अविर्भूत होते व त्याद्वारे जरूर ती कार्य करून दाखविते. परमात्माशक्ती म्हणजेच चिच्छक्ती ही अखंड अतूट व अमर असून, ती अवकाशातील अनेक प्रकारच्या लहरींना व संवेदनांना संक्रमित करणारी शक्ती आहे. शिवस्वरोदय शास्त्रात स्वरांचे ज्ञान जितके महत्त्वाचे आहे, त्यापेक्षा जास्त पंचतत्त्वाचे ज्ञान असणे जरूरीचे आहे. फक्त स्वरांचे ज्ञान असून स्वरोदयशास्त्र पूर्ण अवगत होत नाही, त्या ज्ञानाच्या जोडीला पंचतत्त्वांचे ज्ञान आवश्यक आहे. आपले शरीर पंचतत्त्वांपासून बनलेले असून, अखेरीस ते त्यातच लय पावणार असते. सृष्टीही पंचतत्त्वात लय पावते. ही पंचतत्त्वे म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्त्वांचा उदय व अस्त निरोगी माणसांच्या प्रत्येक स्वरात एकेक तासाच्या क्रमाने होतो. आकाशतत्त्व फक्त सुषुम्नेत असते. बाकीची तत्त्वे एकामागून एक उदित होतात. थोडक्यात, शिवस्वरोदय शास्त्र हे एक असे दिव्य शास्त्र आहे. ही साधना योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली करावी.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक