शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आई-वडीलांच्या सेवेमुळेच जीवनात सुख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 14:40 IST

जीवनात सुखी व्हायचे असेल, पारलौकीक जीवन सुध्दा सुखमय करायचे असेल तर आपल्याला दिवसातून एकवेळ अवश्य आई-वडीलांचा चरण स्पर्श करणे ...

जीवनात सुखी व्हायचे असेल, पारलौकीक जीवन सुध्दा सुखमय करायचे असेल तर आपल्याला दिवसातून एकवेळ अवश्य आई-वडीलांचा चरण स्पर्श करणे खुप आवश्यक आहे. जर आई-वडील हयात नसतील किंवा तुमच्यापासून दूर राहत असतील तर मनातल्या मनात त्यांना आठवून नमन करणे आवश्यक आहे. मी पाहिलं आहे की, लोक मंदीरात जावून ईश्वराचे दर्शन घेतात, राजकारणी लोकांच्या-नेत्यांच्या पायावर नतमस्तक होतात, आपल्या गुरूच्या पायांवरही लोळण घेतात. परंतु आई-वडीलांच्या पायावर कधीच डोकं ठेवत नाही.

जर आपण आईवडीलांची सेवा करू शकत नाही तर देशाची व लोकांची सेवा सुध्दा करू शकणार नाही. बरेच लोक श्रध्दा विहिन असल्यासारखे यंत्रवत आई-वडीलांचे चरण स्पर्श करतात. जसे काही औपचारिकता पुर्ण करीत आहे. आई-वडीलांना नमस्कार करणे तेव्हाच सार्थकी लागेल जेव्हा पुर्ण श्रध्देने चरण स्पर्श केला जाईल.

आई-वडीलांची आज्ञा ऐकणे, त्यांचे मन न दुखवणे हे आपले परम कर्तव्य आहे. जर आपण आई-वडीलांची सेवा अंत:करणापासून करीत असाल तर आपले जीवन सुखी संपन्न राहील. आपला आत्मविश्वास  वृध्दीगंत होईल. ज्याचे मन आणि आत्मा प्रबल आहे अशा व्यक्तिस कुणीच हरवू शकत नाही. 

आजची सुशिक्षित पिढी आई-वडीलांची सेवा करण्यात स्वत:ला कमी समजतात. परंतु हे लक्षण चांगले नाही. शास्त्र-पुराणे, धर्मग्रंथात असे सांगितले आहे की, प्रथम गुरू-माता नंतर पिता, तिसरा गुरू शिक्षक किंवा परमात्मा होय. आपण एकवेळ देवाची-ईश्वराची सेवा न केलेली चालेल. परंतु आई-वडीलांच्या सेवेत कुठलीच कुचराई होवू देवू नका.

आपले आई-वडील हे जागृत देव आहेत. आई-वडील व गुरूवर जर श्रध्दा नसेल तर त्या परमात्म्यावर श्रध्दा ठेवून काय कामाची? परमात्मा सुध्दा तेव्हाच प्रसन्न होईल जेव्हा तुम्ही आई-वडीलांची सेवा कराल. जे आई-वडीलांचा अपमान करतात. तिरस्कार करतात अशा लोकांची पूजा-प्रार्थना तो भगवंत-परमात्मा कधीच ऐकत नाही. म्हणून आई-वडीलांच्या सेवेत त्यांच्या चरणांशीच आपला स्वर्ग-मोक्ष हा साकारला आहे. 

- सविता तायडे

शिक्षिका, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावspiritualअध्यात्मिक