शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

आई-वडीलांच्या सेवेमुळेच जीवनात सुख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 14:40 IST

जीवनात सुखी व्हायचे असेल, पारलौकीक जीवन सुध्दा सुखमय करायचे असेल तर आपल्याला दिवसातून एकवेळ अवश्य आई-वडीलांचा चरण स्पर्श करणे ...

जीवनात सुखी व्हायचे असेल, पारलौकीक जीवन सुध्दा सुखमय करायचे असेल तर आपल्याला दिवसातून एकवेळ अवश्य आई-वडीलांचा चरण स्पर्श करणे खुप आवश्यक आहे. जर आई-वडील हयात नसतील किंवा तुमच्यापासून दूर राहत असतील तर मनातल्या मनात त्यांना आठवून नमन करणे आवश्यक आहे. मी पाहिलं आहे की, लोक मंदीरात जावून ईश्वराचे दर्शन घेतात, राजकारणी लोकांच्या-नेत्यांच्या पायावर नतमस्तक होतात, आपल्या गुरूच्या पायांवरही लोळण घेतात. परंतु आई-वडीलांच्या पायावर कधीच डोकं ठेवत नाही.

जर आपण आईवडीलांची सेवा करू शकत नाही तर देशाची व लोकांची सेवा सुध्दा करू शकणार नाही. बरेच लोक श्रध्दा विहिन असल्यासारखे यंत्रवत आई-वडीलांचे चरण स्पर्श करतात. जसे काही औपचारिकता पुर्ण करीत आहे. आई-वडीलांना नमस्कार करणे तेव्हाच सार्थकी लागेल जेव्हा पुर्ण श्रध्देने चरण स्पर्श केला जाईल.

आई-वडीलांची आज्ञा ऐकणे, त्यांचे मन न दुखवणे हे आपले परम कर्तव्य आहे. जर आपण आई-वडीलांची सेवा अंत:करणापासून करीत असाल तर आपले जीवन सुखी संपन्न राहील. आपला आत्मविश्वास  वृध्दीगंत होईल. ज्याचे मन आणि आत्मा प्रबल आहे अशा व्यक्तिस कुणीच हरवू शकत नाही. 

आजची सुशिक्षित पिढी आई-वडीलांची सेवा करण्यात स्वत:ला कमी समजतात. परंतु हे लक्षण चांगले नाही. शास्त्र-पुराणे, धर्मग्रंथात असे सांगितले आहे की, प्रथम गुरू-माता नंतर पिता, तिसरा गुरू शिक्षक किंवा परमात्मा होय. आपण एकवेळ देवाची-ईश्वराची सेवा न केलेली चालेल. परंतु आई-वडीलांच्या सेवेत कुठलीच कुचराई होवू देवू नका.

आपले आई-वडील हे जागृत देव आहेत. आई-वडील व गुरूवर जर श्रध्दा नसेल तर त्या परमात्म्यावर श्रध्दा ठेवून काय कामाची? परमात्मा सुध्दा तेव्हाच प्रसन्न होईल जेव्हा तुम्ही आई-वडीलांची सेवा कराल. जे आई-वडीलांचा अपमान करतात. तिरस्कार करतात अशा लोकांची पूजा-प्रार्थना तो भगवंत-परमात्मा कधीच ऐकत नाही. म्हणून आई-वडीलांच्या सेवेत त्यांच्या चरणांशीच आपला स्वर्ग-मोक्ष हा साकारला आहे. 

- सविता तायडे

शिक्षिका, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावspiritualअध्यात्मिक