शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:शी भांडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 05:35 IST

सुख जवाइतकं अन् दु:ख डोंगराइतकं असं जे अभंगामध्ये म्हटलं गेलं आहे त्यात मोठ्ठं तथ्य आहे. सुखाच्या मागे धावणाऱ्या व्यक्तीमागून ...

सुख जवाइतकं अन् दु:ख डोंगराइतकं असं जे अभंगामध्ये म्हटलं गेलं आहे त्यात मोठ्ठं तथ्य आहे. सुखाच्या मागे धावणाऱ्या व्यक्तीमागून तितकंच दु:खही पाठलाग करत राहतं याची फार मोठी उदाहरणं आपल्या महाग्रंथांमध्ये आहेत. ज्यांना काळाने धर्मग्रंथ म्हटलं आहे ते म्हणजे महाभारत आणि रामायण. या दोन्ही ग्रंथांत सुखापेक्षा दु:खच अधिक प्रमाणात खच्चून भरलंय. म्हणून तर अर्जुनाला श्रीकृष्णाने भगवतगीता सांगितली आणि तीसुद्धा युद्धभूमीवर! उत्तम पुरुष म्हणून जगण्यासाठी जे जे म्हणून उत्तमोत्तम गीतेत सांगितलं आहे ते अत्यंत वास्तव आहे. महाभारतातलं पहिलं दु:ख म्हणजे कौरवांचे आईवडील आंधळे आहेत. जिथे डोळ्यावर पट्टी बांधलेली असते तिथे गुपचूप संकटे आणि दु:ख अंग चोरून प्रवेश करते. त्यामुळे कौरवांच्या मनात साºया षड्रिपूंनी प्रवेश केला. त्याचमुळे पांडवांचा द्वेष करून त्यांना द्यूतात हरवून त्यांच्यावर वनवास लादला. कुणाला भरल्या घरातून काढणे हे फार मोठे दु:खच असते. कुण्या परस्त्रीला अपमानित करून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न हा मोठा दुर्दैवाचा, महादु:खाचा भाग म्हणावयास हवा. असे अनेक प्रसंग जर महाभारतात बघितले तर दु:ख आणि दु:खच आहे.रामायणात जन्मदाता पिताच पत्नीच्या वचनात अडकल्यामुळे पुत्र रामचंद्राला वनवासात पाठवतो. त्यानंतर वनवासातसुद्धा रामाला सुखाचे चार क्षण गवसले असते, पण दुष्ट रावणाने त्याच्या पत्नीला पळवून नेलं आणि रामचंद्र रावणाशी युद्ध करीत बसले. युद्धानंतर सीतेला रावणाच्या बंधनातून मुक्त करून अयोध्येला परतले तर काही दिवसांतच धोब्याच्या संशयावरून सीतेला पुन्हा वनवासात पाठविण्यात आले. एका स्त्रीला आणि तेही गर्भधारणा झाल्यानंतर असं वाºयावर सोडणं किती मोठं दु:ख. अशा या धर्मग्रंथात सुख जवाइतकं आणि दु:ख डोंगराइतकं असलेलं दिसतं.-विजयराज बोधनकर