शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

स्वत:शी भांडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 05:35 IST

सुख जवाइतकं अन् दु:ख डोंगराइतकं असं जे अभंगामध्ये म्हटलं गेलं आहे त्यात मोठ्ठं तथ्य आहे. सुखाच्या मागे धावणाऱ्या व्यक्तीमागून ...

सुख जवाइतकं अन् दु:ख डोंगराइतकं असं जे अभंगामध्ये म्हटलं गेलं आहे त्यात मोठ्ठं तथ्य आहे. सुखाच्या मागे धावणाऱ्या व्यक्तीमागून तितकंच दु:खही पाठलाग करत राहतं याची फार मोठी उदाहरणं आपल्या महाग्रंथांमध्ये आहेत. ज्यांना काळाने धर्मग्रंथ म्हटलं आहे ते म्हणजे महाभारत आणि रामायण. या दोन्ही ग्रंथांत सुखापेक्षा दु:खच अधिक प्रमाणात खच्चून भरलंय. म्हणून तर अर्जुनाला श्रीकृष्णाने भगवतगीता सांगितली आणि तीसुद्धा युद्धभूमीवर! उत्तम पुरुष म्हणून जगण्यासाठी जे जे म्हणून उत्तमोत्तम गीतेत सांगितलं आहे ते अत्यंत वास्तव आहे. महाभारतातलं पहिलं दु:ख म्हणजे कौरवांचे आईवडील आंधळे आहेत. जिथे डोळ्यावर पट्टी बांधलेली असते तिथे गुपचूप संकटे आणि दु:ख अंग चोरून प्रवेश करते. त्यामुळे कौरवांच्या मनात साºया षड्रिपूंनी प्रवेश केला. त्याचमुळे पांडवांचा द्वेष करून त्यांना द्यूतात हरवून त्यांच्यावर वनवास लादला. कुणाला भरल्या घरातून काढणे हे फार मोठे दु:खच असते. कुण्या परस्त्रीला अपमानित करून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न हा मोठा दुर्दैवाचा, महादु:खाचा भाग म्हणावयास हवा. असे अनेक प्रसंग जर महाभारतात बघितले तर दु:ख आणि दु:खच आहे.रामायणात जन्मदाता पिताच पत्नीच्या वचनात अडकल्यामुळे पुत्र रामचंद्राला वनवासात पाठवतो. त्यानंतर वनवासातसुद्धा रामाला सुखाचे चार क्षण गवसले असते, पण दुष्ट रावणाने त्याच्या पत्नीला पळवून नेलं आणि रामचंद्र रावणाशी युद्ध करीत बसले. युद्धानंतर सीतेला रावणाच्या बंधनातून मुक्त करून अयोध्येला परतले तर काही दिवसांतच धोब्याच्या संशयावरून सीतेला पुन्हा वनवासात पाठविण्यात आले. एका स्त्रीला आणि तेही गर्भधारणा झाल्यानंतर असं वाºयावर सोडणं किती मोठं दु:ख. अशा या धर्मग्रंथात सुख जवाइतकं आणि दु:ख डोंगराइतकं असलेलं दिसतं.-विजयराज बोधनकर