शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:शी भांडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 05:35 IST

सुख जवाइतकं अन् दु:ख डोंगराइतकं असं जे अभंगामध्ये म्हटलं गेलं आहे त्यात मोठ्ठं तथ्य आहे. सुखाच्या मागे धावणाऱ्या व्यक्तीमागून ...

सुख जवाइतकं अन् दु:ख डोंगराइतकं असं जे अभंगामध्ये म्हटलं गेलं आहे त्यात मोठ्ठं तथ्य आहे. सुखाच्या मागे धावणाऱ्या व्यक्तीमागून तितकंच दु:खही पाठलाग करत राहतं याची फार मोठी उदाहरणं आपल्या महाग्रंथांमध्ये आहेत. ज्यांना काळाने धर्मग्रंथ म्हटलं आहे ते म्हणजे महाभारत आणि रामायण. या दोन्ही ग्रंथांत सुखापेक्षा दु:खच अधिक प्रमाणात खच्चून भरलंय. म्हणून तर अर्जुनाला श्रीकृष्णाने भगवतगीता सांगितली आणि तीसुद्धा युद्धभूमीवर! उत्तम पुरुष म्हणून जगण्यासाठी जे जे म्हणून उत्तमोत्तम गीतेत सांगितलं आहे ते अत्यंत वास्तव आहे. महाभारतातलं पहिलं दु:ख म्हणजे कौरवांचे आईवडील आंधळे आहेत. जिथे डोळ्यावर पट्टी बांधलेली असते तिथे गुपचूप संकटे आणि दु:ख अंग चोरून प्रवेश करते. त्यामुळे कौरवांच्या मनात साºया षड्रिपूंनी प्रवेश केला. त्याचमुळे पांडवांचा द्वेष करून त्यांना द्यूतात हरवून त्यांच्यावर वनवास लादला. कुणाला भरल्या घरातून काढणे हे फार मोठे दु:खच असते. कुण्या परस्त्रीला अपमानित करून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न हा मोठा दुर्दैवाचा, महादु:खाचा भाग म्हणावयास हवा. असे अनेक प्रसंग जर महाभारतात बघितले तर दु:ख आणि दु:खच आहे.रामायणात जन्मदाता पिताच पत्नीच्या वचनात अडकल्यामुळे पुत्र रामचंद्राला वनवासात पाठवतो. त्यानंतर वनवासातसुद्धा रामाला सुखाचे चार क्षण गवसले असते, पण दुष्ट रावणाने त्याच्या पत्नीला पळवून नेलं आणि रामचंद्र रावणाशी युद्ध करीत बसले. युद्धानंतर सीतेला रावणाच्या बंधनातून मुक्त करून अयोध्येला परतले तर काही दिवसांतच धोब्याच्या संशयावरून सीतेला पुन्हा वनवासात पाठविण्यात आले. एका स्त्रीला आणि तेही गर्भधारणा झाल्यानंतर असं वाºयावर सोडणं किती मोठं दु:ख. अशा या धर्मग्रंथात सुख जवाइतकं आणि दु:ख डोंगराइतकं असलेलं दिसतं.-विजयराज बोधनकर