शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

गर्भसंस्काराचे बीजारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 06:03 IST

खूप वर्षांचा प्रवास करून आत्मा गर्भामध्ये प्रवेश करतो. त्यानंतर आईलासुद्धा स्वत:च्या विचारांवर, मनोदशेवर, जेवणावर लक्ष द्यावे लागते. विचारांची ऊर्जा ...

खूप वर्षांचा प्रवास करून आत्मा गर्भामध्ये प्रवेश करतो. त्यानंतर आईलासुद्धा स्वत:च्या विचारांवर, मनोदशेवर, जेवणावर लक्ष द्यावे लागते. विचारांची ऊर्जा सतत त्या बाळापर्यंत पोहोचत असते. ती कोणाविषयी नकारात्मक असेल, तर त्या बाळामध्येसुद्धा त्या व्यक्तीबद्दल तसेच विचार निर्माण होतात. बाळ जन्माला येण्याच्या आधीच गर्भामध्ये बसून बाहेरचे वातावरण, होणारी चर्चा अनुभवत असते. म्हणूनच प्रत्येक संबंधांप्रति त्याच्यामध्ये जिव्हाळा, आपुलकी, प्रेम निर्माण करण्याची हीच वेळ आहे. त्याचबरोबर काही चांगले विचार त्या बाळापर्यंत पोहोचविले तर त्याला समजण्याची क्षमता ही त्यावेळी त्या आत्म्यामध्ये असते. मला जर माझं बाळ गुणी हवं असेल तर त्याला रोज ‘तू शांत आहेस, गुणी आहेस. माझी प्रत्येक गोष्ट तू ऐकत आहेस’, असे विचार त्याला रोज देण्याची आवश्यकता आहे. आपल्या घरामध्ये येणारा हा नवीन पाहुणा आपल्या वातावरणामध्ये रुळण्यासाठी विचारांची सकारात्मक ऊर्जा वेळोवेळी त्याच्यापर्यंत पोहोचवावी. जो दृष्टिकोन घेऊन आपण जगतो, त्या दृष्टिकोनानेच ते बाळही जीवनाला बघू लागते. भले कितीही दु:ख पुनर्जन्मामध्ये त्याने सोसले असेल; पण आपण त्याची खूप देखभाल करणार आहोत, खूप प्रेम त्याला आपण देणार आहोत अशी निश्चिंतता त्याला करून द्यावी. जेणेकरून त्याची उत्तम मानसिक आणि शारीरिक वाढ होण्यास मदत मिळेल. शारीरिक पोषणाबरोबर मानसिक पोषणावरही ध्यान असावे. आपण खूश तर आपले बाळही खूश राहील. गर्भसंस्कार म्हणजेच बीजारोपण. शक्तिशाली, प्रेमळ, सकारात्मक विचारांचे खतपाणी त्या आत्म्याला देण्याची ही वेळ असते.- नीता ब्रह्मकुमारी