शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान

By admin | Updated: August 17, 2016 17:31 IST

विज्ञानाच्या नवनवीन शोधांचा अवाका व वेग प्रचंड आहे. त्यामुळे आयुष्याला वेग व सहजता प्राप्त झाली आहे.

- प्रा. डॉ. यशवंत पाटील
 
विज्ञानाच्या नवनवीन शोधांचा अवाका व वेग प्रचंड आहे. त्यामुळे आयुष्याला वेग व सहजता प्राप्त झाली आहे. विज्ञानामुळे अनेक गुंतागुंतीच्या, अनाकलनीय बाबी आकलन होण्यास मदत झाली आहे. काही शतके, दशके, वर्षे ज्या गोष्टी अशक्यप्राय, स्वप्नवत वाटत होत्या, त्या आता सहज साध्य झाल्या आहेत. सर्व जग जणू मुठीत आले आहे. सर्वच क्षेत्रांत अचंबित करणारे बदल आणि अनुभवत आहोत. विज्ञानामुळे विविध प्रकारच्या सुख-सुविधा आपल्या उशा-पायाशी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळेच आपल्यातील बहुतेक सुखासीन झाले आहेत हे वास्तव आहे.
विज्ञानाचे दृश्य परिणाम आपण अनुभवत आहोत. स्मार्ट फोन, त्यावरील विविध अ‍ॅप्स, ऑनलाइन खरेदी-विक्री, ऑनलाइन बँकिंग इ. अनेक क्षेत्रांत विज्ञानाने चांगलाच शिरकाव केला आहे. इंटरनेट, संगणक स्मार्ट फोन यांच्याशी निगडीत कितीतरी गोष्टींनी अनेक क्षेत्रांत क्रांती केली आहे. अर्थात प्रगतीसाठी हे सर्व आवश्यकच आहे. पण विज्ञानाच्या वापरामागे सकारात्मक, सुसंस्कारित ‘मन’ आवश्यक आहे. याचा आग्रह धरणे, प्रत्यक्ष तसा वापर करणे हे ‘सुसंस्कृत’ मनाचे निदर्शक आहे.
पण, काही अपवाद वगळता काय चित्र आढळते? बड्या-बड्या कंपन्या, बॅँका संस्थांच्या संगणक प्रणालीत बेकायदा घुसून त्यांच्या संगणक प्रणाली निकामी करणे किंवा नष्ट करणे, महत्त्वाच्या माहितींची चोरी करणे, व्हायरसद्वारे माहितीच नष्ट करणे, संकेतस्थळ हॅक करणे, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडणे, त्याद्वारे मेल किंवा संदेश पाठवून विविध प्रकारे फसवणूक करणे, अश्लील छायाचित्रे किंवा संदेश पाठविणे, बदनामी करणे, त्यातून लूट, फसवणूक करणे, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे बदनामी करणे, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्डचा बॅँकेत रजिस्टर असलेल्या इमेलचा पासवर्ड मिळविणे, त्याचा वापर करून खात्यातून पैसे काढणे, धार्मिक सलोखा आणि शांतता बिघडविणारा मजकूर छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रसारित करणे इत्यादी विविध प्रकारचे सायबर गुन्हे घडताना आपण ऐकतो व वाचतोसुद्धा.
अशा विज्ञानाचे हेही ‘फलित’ टाळावयास हवे. म. गांधींनी सांगितलेल्या सात सामाजिक पापापैकी १) Pleasure without Conscience विवेकशून्य आनंद, २) Science without Humanity मानवताशून्य विज्ञान या दोन पापांचा विवेकाने विचार करून विज्ञानाचा वापर केला तर खरोखर विज्ञान हे मानवजातीला मोठे वरदान ठरेल. पण, हे सर्व आपल्या अंतर्मनातून व्हावयास हवे.