शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 15:02 IST

स्वर्ग व नरकाच्या चुकीच्या कल्पना घेऊन लोक जीवन जगत असतात.जीवनविद्या सांगते असा स्वर्ग व नर्क कुठेच नाही आहे.मग लोक मला विचारतात वामनराव हे तुम्ही कशावरून म्हणता.

- सदगुरू श्री वामनराव पै

स्वर्ग नर्क वाटा चोरांच्या

स्वर्ग व नरकाच्या चुकीच्या कल्पना घेऊन लोक जीवन जगत असतात.जीवनविद्या सांगते असा स्वर्ग व नर्क कुठेच नाही आहे.मग लोक मला विचारतात वामनराव हे तुम्ही कशावरून म्हणता. लक्षात ठेवा मी जे सांगतो त्यामागे नेहमी तर्कशास्त्र असते.तुम्ही बघा आतापर्यंत तुमचे पणजोबा गेले, आजोबा गेले, वडिल म्हणत नाही कारण वडिल अजून असतील पण जे गेले त्यांच्यापैकी कुणीतरी सांगितले का की मी इथे स्वर्गात सुखात आहे किंवा मी नरकात दु:खात आहे. असे कुणीतरी तुम्हांला येऊन सांगितले का आजीने,पणजीने सांगितले का किंवा तुमचा मित्र गेला त्या मित्राने सांगितले का कुणीही येऊन असे सांगत नाही| त्यांनी तुम्हांला फोन किंवा फॅक्स केला का, एसएमएस केला की मोबाईलवर फोन केला का काहीही केले नाही.स्वर्ग नर्क हया कल्पना सांगितल्या गेल्या तेव्हा त्या मागे त्यांचा हेतू चांगला होता.लोकांनी चांगले वागावे,चांगले जीवन जगावे,आनंदाने रहावे हा त्यामागे हेतू होता.ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी म्हटले आहे“स्वर्ग नर्क वाटा चोरांच्या” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले आहे.स्वर्ग नर्क वाटा चोरांच्या हयाचा अर्थ काय तर स्वर्ग व नर्क याबाबत जे सांगतात ना ते चोर आहेत.सांगायचा मुद्दा असा सर्व धर्म परित्यज्य याचा अर्थ सर्व उपासना मार्ग सोड व मी ला शरण जा.आता मी म्हणजे कोण “तैसा ह्रदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम” त्या रामाला शरण जा.जो तुझ्या ह्रदयांत आहे.ज्ञानश्वरी वाचताना कशी वाचली पाहिजे ते लक्षांत घ्या.तैसा ह्रदयामध्ये मी असे वाचले की थांब मग कोण राम कसा राम याचा विचार कर.सर्व सुखाचा आराम याचा नीट अर्थ लक्षांत घेवून वाच. ज्ञानेश्वरी भरभर वाचून तुला काय कळणार.यासाठी ज्ञानेश्वरीतील एकतरी ओवी अनुभवाव.भगवतगीता पाठ करण्यापेक्षा तुम्हाला त्यातील एक तरी श्लोक समजला. व तुम्ही तो जगाला समजावून सांगितला तर जग सुखी होईल. तुम्ही जे सर्व धर्म म्हणता ते  मुळात धर्मच नाहीत तर ते उपासनेचे निरनिराळे मार्ग आहेत.उपासनेचे मार्ग प्रत्येकाचे वेगवेगळे असतात.कुणी प्रार्थना करतं,कुणी नमाज पडतं तर कोणी पारायण करतात तर कोणी चर्चमध्ये जावून प्रार्थना करतात. हे उपासनेचे मार्ग वेगवेगळे असले तरी  त्या सर्वांचा देव एकच आहे.देव वेगवेगळे असते तर भांडणे नसती का झाली? परमेश्वर एक आहे.सबका मालिक एक असे साईबाबा सांगायचे ते अगदी खरे आहे.सर्वांचा देव हा एक आहे आता त्याची उपासना कशी करायची हे  मात्र तू ठरव.तू अमूकच कर किंवा तमूकच कर अशी जबरदस्ती कोणावरही कोणी करु नये.प्रत्येकाला जे आवडते ते त्याने करावे.मला अळुची भाजी फार आवडते म्हणून तुम्ही देखील तीच खाल्ली पाहिजे अशी जबरदस्ती करुन कसे होईल.