शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 14:55 IST

लोक गीतेचे पारायण करतात. पण गीतेचा अर्थ समजून घेत नाहीत.गीतेतला एक श्लोक  जरी समजला तरी सर्व गीता समजण्यासारखी आहे.सगळी गीता वाचण्याची गरज नाही.“सर्व धर्मान् परित्यज्यं मामेकं शरणं व्रज अहं

- सदगुरू श्री वामनराव पै

तुम्ही सुखाने जगा इतरांना सुखाने जगू दया हाच खरा धर्म

लोक गीतेचे पारायण करतात. पण गीतेचा अर्थ समजून घेत नाहीत.गीतेतला एक श्लोक  जरी समजला तरी सर्व गीता समजण्यासारखी आहे.सगळी गीता वाचण्याची गरज नाही.“सर्व धर्मान् परित्यज्यं मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच: ”हा एकच श्लोक पुरेसा आहे.हयात भगवंताने काय सांगितले आहे.सर्व धर्म परित्यज म्हणजे नुसते त्याज्य म्हटलेले नाही.तुम्ही म्हणाल परित्यज्य व त्याज्य यात फरक आहे?सांगतो त्यज्य म्हणजे सौम्य व परित्यज्य म्हणजे गंभीर.परित्यज्य म्हणजे सोडूनच दे.त्याचा विचार करूच नको.सर्व धर्मांचा त्याग कर व मला शरण ये असे श्रीकृष्णाने सांगितले असे लोक म्हणतात पण हा त्याचा खरा अर्थ नाही.एकाने मला विचारले वामनराव कृष्णाने हे म्हटले आहे ते चूक आहे का? मी म्हटले अरे वेडया कृष्णाने मला शरण असे असे म्हटलेले नाही तर मी ला शरण जा असे म्हटलेले आहे. गंमत अशी की लोकांना गीतेचा खरा अर्थच कळत नाही.सर्वधर्म परित्यज्य असे कृष्णाने सांगितले हे बरोबर आहे.अरे पण धर्म कुठला श्रीकृष्णाने हे सांगितले तेव्हा प्रचलित कुठलाच धर्म तेव्हा नव्हता.आपला खरा धर्म आहे वैदिक धर्म व त्यात सुधारणा झाली व तो झाला भागवत धर्म.खरे सांगायचे तर हिंदु धर्म हा धर्म नसून ती हिंदु संस्कृती आहे.मग सर्व धर्माचा त्याग कर म्हटले तर तो धर्म कुठला असा प्रश्न निर्माण होतो.धर्म म्हणजे मार्ग हे नेहमी लक्षांत ठेवावे.सर्व धर्म हे उपासनेचे निरनिराळे मार्ग आहेत.प्रत्येक धर्मात उपासनेचे मार्ग निरनिराळे असतात.खरे तर सर्व धर्म धर्म नसून निरनिराळे संप्रदाय आहेत.त्यामुळे खरा धर्म एकच आहे तो म्हणजे मानव धर्म किंवा विश्व धर्म.जीवनविद्येच्या भाषेत सांगायचे तर जीवनधर्म.तुम्ही सुखाने जगा, व इतरांना सुखाने जगू दया हया धारणेला खरा धर्म असे म्हणतात.जीवनविद्येने सोपे करून सांगितले.लोक आम्हाला विचारतात धर्म धर्म म्हणजे काय हो वामनराव?माझ्यामतो तुम्ही सुखाने जगा व इतरांना सुखाने जगू दया हाच खरा धर्म आहे.आज लोक स्वत:ही सुखाने जगत नाहीत व इतरांनाही सुखाने जगू देत नाहीत.आज दहशतवादी काय करतात ते इतरांना मारतात व स्वत:ही मरतात.स्वत:ही दु:खी होतात व इतरांनाही दु:खी करतात.हे लोक किती पाप करतात हयाची त्यांना कल्पना देखील नाही.