शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 14:55 IST

लोक गीतेचे पारायण करतात. पण गीतेचा अर्थ समजून घेत नाहीत.गीतेतला एक श्लोक  जरी समजला तरी सर्व गीता समजण्यासारखी आहे.सगळी गीता वाचण्याची गरज नाही.“सर्व धर्मान् परित्यज्यं मामेकं शरणं व्रज अहं

- सदगुरू श्री वामनराव पै

तुम्ही सुखाने जगा इतरांना सुखाने जगू दया हाच खरा धर्म

लोक गीतेचे पारायण करतात. पण गीतेचा अर्थ समजून घेत नाहीत.गीतेतला एक श्लोक  जरी समजला तरी सर्व गीता समजण्यासारखी आहे.सगळी गीता वाचण्याची गरज नाही.“सर्व धर्मान् परित्यज्यं मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच: ”हा एकच श्लोक पुरेसा आहे.हयात भगवंताने काय सांगितले आहे.सर्व धर्म परित्यज म्हणजे नुसते त्याज्य म्हटलेले नाही.तुम्ही म्हणाल परित्यज्य व त्याज्य यात फरक आहे?सांगतो त्यज्य म्हणजे सौम्य व परित्यज्य म्हणजे गंभीर.परित्यज्य म्हणजे सोडूनच दे.त्याचा विचार करूच नको.सर्व धर्मांचा त्याग कर व मला शरण ये असे श्रीकृष्णाने सांगितले असे लोक म्हणतात पण हा त्याचा खरा अर्थ नाही.एकाने मला विचारले वामनराव कृष्णाने हे म्हटले आहे ते चूक आहे का? मी म्हटले अरे वेडया कृष्णाने मला शरण असे असे म्हटलेले नाही तर मी ला शरण जा असे म्हटलेले आहे. गंमत अशी की लोकांना गीतेचा खरा अर्थच कळत नाही.सर्वधर्म परित्यज्य असे कृष्णाने सांगितले हे बरोबर आहे.अरे पण धर्म कुठला श्रीकृष्णाने हे सांगितले तेव्हा प्रचलित कुठलाच धर्म तेव्हा नव्हता.आपला खरा धर्म आहे वैदिक धर्म व त्यात सुधारणा झाली व तो झाला भागवत धर्म.खरे सांगायचे तर हिंदु धर्म हा धर्म नसून ती हिंदु संस्कृती आहे.मग सर्व धर्माचा त्याग कर म्हटले तर तो धर्म कुठला असा प्रश्न निर्माण होतो.धर्म म्हणजे मार्ग हे नेहमी लक्षांत ठेवावे.सर्व धर्म हे उपासनेचे निरनिराळे मार्ग आहेत.प्रत्येक धर्मात उपासनेचे मार्ग निरनिराळे असतात.खरे तर सर्व धर्म धर्म नसून निरनिराळे संप्रदाय आहेत.त्यामुळे खरा धर्म एकच आहे तो म्हणजे मानव धर्म किंवा विश्व धर्म.जीवनविद्येच्या भाषेत सांगायचे तर जीवनधर्म.तुम्ही सुखाने जगा, व इतरांना सुखाने जगू दया हया धारणेला खरा धर्म असे म्हणतात.जीवनविद्येने सोपे करून सांगितले.लोक आम्हाला विचारतात धर्म धर्म म्हणजे काय हो वामनराव?माझ्यामतो तुम्ही सुखाने जगा व इतरांना सुखाने जगू दया हाच खरा धर्म आहे.आज लोक स्वत:ही सुखाने जगत नाहीत व इतरांनाही सुखाने जगू देत नाहीत.आज दहशतवादी काय करतात ते इतरांना मारतात व स्वत:ही मरतात.स्वत:ही दु:खी होतात व इतरांनाही दु:खी करतात.हे लोक किती पाप करतात हयाची त्यांना कल्पना देखील नाही.