शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 14:55 IST

लोक गीतेचे पारायण करतात. पण गीतेचा अर्थ समजून घेत नाहीत.गीतेतला एक श्लोक  जरी समजला तरी सर्व गीता समजण्यासारखी आहे.सगळी गीता वाचण्याची गरज नाही.“सर्व धर्मान् परित्यज्यं मामेकं शरणं व्रज अहं

- सदगुरू श्री वामनराव पै

तुम्ही सुखाने जगा इतरांना सुखाने जगू दया हाच खरा धर्म

लोक गीतेचे पारायण करतात. पण गीतेचा अर्थ समजून घेत नाहीत.गीतेतला एक श्लोक  जरी समजला तरी सर्व गीता समजण्यासारखी आहे.सगळी गीता वाचण्याची गरज नाही.“सर्व धर्मान् परित्यज्यं मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच: ”हा एकच श्लोक पुरेसा आहे.हयात भगवंताने काय सांगितले आहे.सर्व धर्म परित्यज म्हणजे नुसते त्याज्य म्हटलेले नाही.तुम्ही म्हणाल परित्यज्य व त्याज्य यात फरक आहे?सांगतो त्यज्य म्हणजे सौम्य व परित्यज्य म्हणजे गंभीर.परित्यज्य म्हणजे सोडूनच दे.त्याचा विचार करूच नको.सर्व धर्मांचा त्याग कर व मला शरण ये असे श्रीकृष्णाने सांगितले असे लोक म्हणतात पण हा त्याचा खरा अर्थ नाही.एकाने मला विचारले वामनराव कृष्णाने हे म्हटले आहे ते चूक आहे का? मी म्हटले अरे वेडया कृष्णाने मला शरण असे असे म्हटलेले नाही तर मी ला शरण जा असे म्हटलेले आहे. गंमत अशी की लोकांना गीतेचा खरा अर्थच कळत नाही.सर्वधर्म परित्यज्य असे कृष्णाने सांगितले हे बरोबर आहे.अरे पण धर्म कुठला श्रीकृष्णाने हे सांगितले तेव्हा प्रचलित कुठलाच धर्म तेव्हा नव्हता.आपला खरा धर्म आहे वैदिक धर्म व त्यात सुधारणा झाली व तो झाला भागवत धर्म.खरे सांगायचे तर हिंदु धर्म हा धर्म नसून ती हिंदु संस्कृती आहे.मग सर्व धर्माचा त्याग कर म्हटले तर तो धर्म कुठला असा प्रश्न निर्माण होतो.धर्म म्हणजे मार्ग हे नेहमी लक्षांत ठेवावे.सर्व धर्म हे उपासनेचे निरनिराळे मार्ग आहेत.प्रत्येक धर्मात उपासनेचे मार्ग निरनिराळे असतात.खरे तर सर्व धर्म धर्म नसून निरनिराळे संप्रदाय आहेत.त्यामुळे खरा धर्म एकच आहे तो म्हणजे मानव धर्म किंवा विश्व धर्म.जीवनविद्येच्या भाषेत सांगायचे तर जीवनधर्म.तुम्ही सुखाने जगा, व इतरांना सुखाने जगू दया हया धारणेला खरा धर्म असे म्हणतात.जीवनविद्येने सोपे करून सांगितले.लोक आम्हाला विचारतात धर्म धर्म म्हणजे काय हो वामनराव?माझ्यामतो तुम्ही सुखाने जगा व इतरांना सुखाने जगू दया हाच खरा धर्म आहे.आज लोक स्वत:ही सुखाने जगत नाहीत व इतरांनाही सुखाने जगू देत नाहीत.आज दहशतवादी काय करतात ते इतरांना मारतात व स्वत:ही मरतात.स्वत:ही दु:खी होतात व इतरांनाही दु:खी करतात.हे लोक किती पाप करतात हयाची त्यांना कल्पना देखील नाही.