शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग ११

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 14:56 IST

जीवनविद्येच्या दॄष्टीकोनातून चूल व मूल सांभाळणा-या स्त्रीला तिच्या नव-याच्या मिळकतीतला अर्धा भाग कायद्याने मिळायला हवा.आता तो मिळत नाही.जिथे सोहार्दाने चाललेले आहे तिथपर्यंत ठीक

- सदगुरू श्री वामनराव पै

सूनेला मुलीसारखे वागविले पाहिजे

जीवनविद्येच्या दॄष्टीकोनातून चूल व मूल सांभाळणा-या स्त्रीला तिच्या नव-याच्या मिळकतीतला अर्धा भाग कायद्याने मिळायला हवा.आता तो मिळत नाही.जिथे सोहार्दाने चाललेले आहे तिथपर्यंत ठीक आहे पण ज्या ठिकाणी नवरा बायकोचे पटत नाही तिथे नवरा बायकोला घरातून चालती हो असे सांगतो. अलिकडे अशी अनेक प्रकरणे माझ्याकडे आली म्हणून मी हे सांगत आहे. लग्न होवून वर्ष देखील झाले नाही तर बायकोला त्याने वाईट वागणूक, अमानुष वागणूक दिली. तिची देखील यात काही तरी चूक असेल. पण चूक कोण करत नाही. माणसाकडून काही चुका घडतात. ती चुकीची वागली म्हणून तिला हाकलून दयायचे का? ती तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केले असते.जीवनविद्या हेच सांगते की तुमची मुलगी लग्न होवून दुस-याच्या घरी जाते व तुमची सून ही दुस-यांच्या घरातून तुमच्या घरी येते. मग या ठिकाणी महत्व कुणाला दिले गेले पाहिजे. सुनेला महत्व दिले गेले पाहिजे. सूनेला मुलीसारखे वागविले पाहिजे. किंबहूना मुलीपेक्षा जास्त प्रेम व आदर सुनेला मिळायला हवा. मग संसार सुखाचा व्हायला कितीसा वेळ लागतो पण लोकांच्या ही गोष्टच लक्षांत येत नाही. सुनेला वाईट वागणूक देतात. वाट्टेल तसे बोलतात. तुझ्या आईवडिलांनी तुला हेच शिकविले का असे बोलतात. आता लोकांना कसे बोलावे व वागावे याची अक्कल नसते याचे कारण अज्ञान. प्रत्येक ठिकाणी हे अज्ञान आड येते. संसार कसा करायचा हेच जर ज्ञान नसेल तर संसार सुखाचा कसा होणार. जीवन जगणे ही एक कला आहे, शास्त्र आहे हिच जीवनविद्या आहे हेच मी नेहमी सांगत असतो.स्वयंपाकाचे ज्ञान नसेल तर ती स्वयंपाक कसा काय करणार.स्वयंपाक शिकून तो तिने करायला हवा. नाहीतर मी पैसे कमवून आणीन व स्वयंपाकीन ठेवीन असे म्हटले तर याला कोण काय करणार.यासाठी ही कला शिकविणारा पाहिजे तसा शिकणारा देखील पाहिजे.संसार सुखाचा करायचा असेल तर ज्ञानाला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे.लोक सांगतात भक्ती करा.ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असे सांगणारे किर्तनकार,प्रवचनकार मी ऐकलेले आहेत.केवळ रेडिओवर टी.व्ही.वर नव्हे तर प्रत्यक्ष ऐकलेले आहे.पण वास्तवात ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ हे पूर्णपणे चूक आहे.