शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

संताची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 03:09 IST

ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्याद्वारे परमचैतन्याला प्राप्त करणाऱ्या लोकांसाठी भारतीय संस्कृतीत अनेक शब्दांचा उपयोग केला गेला आहे. या शब्दांमध्ये संत हा शब्द फारच महत्त्वपूर्ण आहे. या संत शब्दाची उत्पत्ती संस्कृतच्या सन् शब्दापासून झाली आहे.

- डॉ.भूषण कुमार उपाध्यायज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्याद्वारे परमचैतन्याला प्राप्त करणाऱ्या लोकांसाठी भारतीय संस्कृतीत अनेक शब्दांचा उपयोग केला गेला आहे. या शब्दांमध्ये संत हा शब्द फारच महत्त्वपूर्ण आहे. या संत शब्दाची उत्पत्ती संस्कृतच्या सन् शब्दापासून झाली आहे. सन् या शब्दाचा अर्थ आहे ‘होत असलेला’. होत असल्या बाबतची जी क्रि या आहे ती केवळ वर्तमानकाळातच होऊ शकते. शेवटी संत तो आहे जो वर्तमान काळातच राहतो. तो भूत किंवा भविष्यकाळ या दोन्हींपासून लांब राहात असतो. साºया चिंता आणि तणाव यांचे कारण हे एकतर भूतकाळापासून किंवा भविष्यकाळापासून निर्माण होते. शेवटी आपली चेतना आपल्या परम अवस्थेमध्ये अशावेळी पोहोचू शकते, जेव्हा ती वर्तमानकाळामध्ये असते.हेच कारण आहे की अध्यात्माची सगळी साधने आपल्याला वर्तमानकाळातच प्रस्थापित करतात. योग, ज्ञान आणि भक्ती यांच्या क्षेत्रात ज्या ज्या विधी विकसित झाल्या आहेत, त्या सर्व आपल्याला वर्तमान क्षणामध्ये जगायला शिकवतात. आपण जसेही वर्तमानकाळात स्थापित होतो, तत्क्षणी आपले मन आनंदाने भरले जाते.शेवटी संताचे पहिले लक्षण आहे की जे नेहमी वर्तमानात राहतात. हेच कारण आहे की संताचे विचार पूर्णपणे कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय असतात. संताची वाणी आणि कृती पूर्णपणे पारमार्थिक आणि सर्वकालीन असते. ती कोणत्याही वर्ग अथवा काळाकरिता असत नाहीत.वर्तमानकाळामध्ये प्रस्थापित होण्यासाठी सर्वात सुगम आणि प्रभावी साधना ही श्वासाची असते. हा श्वास जन्मापासून मृत्यूपर्यंत चालत असतो. श्वासाचे चालू असणे हे सदैव वर्तमान काळातच होऊ शकते. शेवटी या श्वासास आपल्या चेतनेला जोडून आपण आपल्याला वर्तमानामध्ये स्थापित करू शकतो. शांत बसून निरपेक्ष भावाने श्वासाचे निरीक्षण केल्यावर मन हळूहळू भूत आणि भविष्यापासून दूर जाऊ लागते. मनामध्ये जे विचारकल्लोळ सतत उठत असतात, ते हळूहळू शांत होत जातात आणि आपली चेतना वर्तमानात स्थित होत जाते. जसजशी आपली चेतना वर्तमानात स्थित होत जाते, तसतसा संतपणाचा भाव आपल्या जीवनात येऊ लागतो आणि काही विशिष्ट लक्षणे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसू लागतात. सत्याकडे त्याची ओढ निर्माण होऊ लागते. तो अहिंसक आणि दुसºयांच्या धनलोभापासून मुक्त होत जातो. संग्रह करण्याची प्रवृत्ती समाप्त होते आणि तो आपल्या वासनांवर नियंत्रण ठेवू शकतो. मनाच्या शुद्धीबरोबरच त्याच्यात आनंद निर्माण होत जातो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक