शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

संताची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 03:09 IST

ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्याद्वारे परमचैतन्याला प्राप्त करणाऱ्या लोकांसाठी भारतीय संस्कृतीत अनेक शब्दांचा उपयोग केला गेला आहे. या शब्दांमध्ये संत हा शब्द फारच महत्त्वपूर्ण आहे. या संत शब्दाची उत्पत्ती संस्कृतच्या सन् शब्दापासून झाली आहे.

- डॉ.भूषण कुमार उपाध्यायज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्याद्वारे परमचैतन्याला प्राप्त करणाऱ्या लोकांसाठी भारतीय संस्कृतीत अनेक शब्दांचा उपयोग केला गेला आहे. या शब्दांमध्ये संत हा शब्द फारच महत्त्वपूर्ण आहे. या संत शब्दाची उत्पत्ती संस्कृतच्या सन् शब्दापासून झाली आहे. सन् या शब्दाचा अर्थ आहे ‘होत असलेला’. होत असल्या बाबतची जी क्रि या आहे ती केवळ वर्तमानकाळातच होऊ शकते. शेवटी संत तो आहे जो वर्तमान काळातच राहतो. तो भूत किंवा भविष्यकाळ या दोन्हींपासून लांब राहात असतो. साºया चिंता आणि तणाव यांचे कारण हे एकतर भूतकाळापासून किंवा भविष्यकाळापासून निर्माण होते. शेवटी आपली चेतना आपल्या परम अवस्थेमध्ये अशावेळी पोहोचू शकते, जेव्हा ती वर्तमानकाळामध्ये असते.हेच कारण आहे की अध्यात्माची सगळी साधने आपल्याला वर्तमानकाळातच प्रस्थापित करतात. योग, ज्ञान आणि भक्ती यांच्या क्षेत्रात ज्या ज्या विधी विकसित झाल्या आहेत, त्या सर्व आपल्याला वर्तमान क्षणामध्ये जगायला शिकवतात. आपण जसेही वर्तमानकाळात स्थापित होतो, तत्क्षणी आपले मन आनंदाने भरले जाते.शेवटी संताचे पहिले लक्षण आहे की जे नेहमी वर्तमानात राहतात. हेच कारण आहे की संताचे विचार पूर्णपणे कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय असतात. संताची वाणी आणि कृती पूर्णपणे पारमार्थिक आणि सर्वकालीन असते. ती कोणत्याही वर्ग अथवा काळाकरिता असत नाहीत.वर्तमानकाळामध्ये प्रस्थापित होण्यासाठी सर्वात सुगम आणि प्रभावी साधना ही श्वासाची असते. हा श्वास जन्मापासून मृत्यूपर्यंत चालत असतो. श्वासाचे चालू असणे हे सदैव वर्तमान काळातच होऊ शकते. शेवटी या श्वासास आपल्या चेतनेला जोडून आपण आपल्याला वर्तमानामध्ये स्थापित करू शकतो. शांत बसून निरपेक्ष भावाने श्वासाचे निरीक्षण केल्यावर मन हळूहळू भूत आणि भविष्यापासून दूर जाऊ लागते. मनामध्ये जे विचारकल्लोळ सतत उठत असतात, ते हळूहळू शांत होत जातात आणि आपली चेतना वर्तमानात स्थित होत जाते. जसजशी आपली चेतना वर्तमानात स्थित होत जाते, तसतसा संतपणाचा भाव आपल्या जीवनात येऊ लागतो आणि काही विशिष्ट लक्षणे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसू लागतात. सत्याकडे त्याची ओढ निर्माण होऊ लागते. तो अहिंसक आणि दुसºयांच्या धनलोभापासून मुक्त होत जातो. संग्रह करण्याची प्रवृत्ती समाप्त होते आणि तो आपल्या वासनांवर नियंत्रण ठेवू शकतो. मनाच्या शुद्धीबरोबरच त्याच्यात आनंद निर्माण होत जातो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक