शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

मना घडवी संस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 17:56 IST

संस्कार केवळ सांगण्याव्दारे, बोलण्याव्दारे येत नाही, पण ते वर्तनातून-आचरणातून येतात.

 संस्कार कोणत्याही झाडावर उगवत नाही, आकाशातून पडत नाही, संस्कार घर, परिवार, समाज आणि सभोवतालच्या वातावरणापासून सुजीत होत असतात. संस्काराची सगळ्यात जास्त जबाबदारी आई-वडील, पालक आणि शिक्षकांची असते. हे देखील तेवढेच खरे आहे की ही संस्कार केवळ सांगण्याव्दारे, बोलण्याव्दारे येत नाही, पण ते वर्तनातून-आचरणातून येतात, सत्कर्मातून येतात आणि चारित्रीक उज्वलतेतून येतात. जसे आई-वडील, पालक वागतात तसेच त्यांची मुलं पण आचरण करतात. नेहमी लक्षात ठेवा, आपले मुल आपल्या कृती, कारवाई आणि वर्तनांचे चांगले निरीक्षण करीत असतात लक्षात ठेवा ते कधी हे ना म्हणोत की आपले संस्कार हेच आहेत काय? शिक्षण ही जीवनाची एक मौल्यवान भेट आहे आणि संस्कार जीवनाचे सार आहे. या दोन संपत्तीशिवाय मालमत्ता, जमीनजुमला, पद-प्रतिष्ठा आणि मान-मर्यादा सर्व तुच्छ आहेत. शिक्षण केवळ व्यक्तीच्या आयुष्यासाठी दिशानिर्देशच करीत नाही तर स्थिती देखील बदलते. अनादी काळापासून म्हणजे जेव्हा शिक्षणातून मिळणाºया ज्ञानाला संग्रहीत करण्याचे काहीच साधन नव्हते तेव्हा हे शिक्षणरूपी ज्ञान ऋषी, मुनी, आचार्य, गुरू आणि संत महात्म्यांनी मानवी जीवनाचे सार वृक्षांच्या साली, दगडी शिला आणि पानावर लिहिले होते. आणि हेच ज्ञान त्यानंतर विस्तारीत झाले त्याचा प्रसार-प्रसार होत गेला आणि हळुहळू शिक्षण आणि शोध, शिक्षण उद्देश, पध्दती स्वरूपात आणि शैक्षणिक दर्जामध्ये वारंवार बदल होत गेला. आज वेळ आली आहे की, जर जग, देश, समाज आणि कुटुंबातील प्रत्येक कुटुंब शिक्षित नसेल तर मग आम्ही प्रगत जग किंवा प्रगत देशाची कल्पनाच करू शकत काळ नाही. त्यामुळे आज फार वेगाने बदलत आहे आणि नवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहे. शिक्षणाची नवनवीन साधने विकसीत आणि आविष्कृत होत आहे. जग जवळ येत चाललेल आहे. एखाद्या छोट्या घटनेचा सुध्दा प्रभाव संपुर्ण जगावर आज पडत आहे आणि हा प्रभाव समजण्यासाठी, तंत्रज्ञानाचा समज घेण्यासाठी, आपल्या मुलांना उत्तम शिक्षण, अर्थपुर्ण शिक्षण आणि व्यावहारीक शिक्षणासह काळाच्या सोबत चालणे खुप महत्वाचे आहे. ज्या प्रकारे विना शस्त्र युध्द केले जावू शकत नाही त्याचप्रमाणे शिक्षणाशिवाय जीवन सार्थक आणि सत्य बनवू शकत नाही. आपण सर्वांचे आद्य आणि सर्वोत्तम कर्तव्य हेच आहे की, आपल्या संततीला सुशिक्षित व सुसंस्कारीत बनविणे कारण सुशिक्षित व सुसंस्कारीत परिवार - समाज आणि देशाच्या विकासामध्ये खुप महत्वाची भूमिका पार पाडू शकेल आणि देशाचा एक जबाबदार नागरीक बनुन त्यांचे कर्तव्य व जबाबदारी यातून समाजाचा व देशाचा विकास करू शकेल.

शिक्षणामध्ये संस्कार समाविष्ट आहे. कारण भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, भारतीय जीवन मुल्य हे शिक्षणाचा आधार आहे. सनातन धर्म हेच शिकवीत आलेला आहे की मनुष्यामनुष्यामध्ये प्रेम, बंधुता, एकता, सहकार्य आणि एकमेकांच्या सुखदु:खात सहकार्य करणे हीच खरी भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीचा हेच वैशिष्ट्य आहे की सर्व संस्कृती त्यात सामावलेल्या आहेत आणि त्याने त्याचे अस्तित्व सुध्दा टिकवून ठेवले आहे.

- मीना चंदनदहिगाव ता. तेल्हारा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक