शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

संकल्प-विकल्प धनुष्यबाण। रामाहाती दीधले।।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 21:38 IST

बाबांकडून अर्थ समजून घेतल्यापासून त्याच्या डोळ्यासमोर श्रीरामाची मनोमन केलेली पूजा प्रत्यक्ष उभी राही. विशेषत: श्रीरामाच्या हातात दिलेले संकल्प-विकल्पांचे धनुष्यबाण!

- रमेश सप्रे 

सकाळी लवकर उठणारी मुलं ही आजकाल निर्वंश होत चाललेली प्रजाती किंवा जमात आहे. तसं लवकर उठण्याची संस्कृतीच लुप्त होऊ लागलीय म्हणा. या ना त्या कारणानं रात्री उशीरा झोपण्याची सवय अंगी बाणली गेलीय. विशेषत: मुलं नि तरुणाई ‘लवकर निजे, लवकर उठे! तथा आरोग्य सुख संपत्ती भेटे।।’ यावर विश्वास ठेवीनाशी झालीयत. अगदी पाश्चात्य मंडळीही ‘अर्ली टू बेड, अर्ली टू राईज, मेक्स मॅन हेल्दी हॅपी अॅन्ड वाईज’ या शिकवणुकीपासून दुरावत चालली आहेत. 

..अन् म्हणूनच आनंदाचं पहाटे उठणं अनेकांच्या कौतुकाचा विषय झालं होतं. पण त्याला तसंच एक कारण होतं. आनंदाला बाबा म्हणायचे ती सद्गुरुंची काकडारती खूप आवडत असे. आता सोप्या मराठी रचनेचा अर्थ समजण्याएवढा तो मोठा झाला होता. त्याला जसाजसा अर्थ उमगत जाई तसं तसं त्या अर्थाचं चित्र, दृश्य त्याच्या डोळ्यासमोर उभं राही. त्याचं मन अगदी हरखून जाई. हेच पहा ना 

आर्त आवाजात बाबा मानसपूजेच्या ओव्या म्हणत

प्राणांचा लाविला धूप। नेत्रांचे लाविले दीप।

इच्छेची पक्वान्ने अनेक। रामासी भोजन घातले।।

इंद्रियांचा तांबूल जाण। षड्रिपूंची दक्षिणा सुवर्ण।

संकल्प-विकल्प धनुष्यबाण। रामाहाती दीधले।।

बाबांकडून अर्थ समजून घेतल्यापासून त्याच्या डोळ्यासमोर श्रीरामाची मनोमन केलेली पूजा प्रत्यक्ष उभी राही. विशेषत: श्रीरामाच्या हातात दिलेले संकल्प-विकल्पांचे धनुष्यबाण!

संकल्प म्हणजे विचार -होकारात्मक विचार आणि त्याच्या उलट, विकल्प म्हणजे नकारात्मक विचार. शिक्षक असल्यामुळे बाबांनी फार प्रभावीपणे सांगितलं होतं

‘कल्प’ म्हणजे कल्पना अन् विचार म्हणजे दोन्हीही. हे करूया, असं करूया असे सकारात्मक विचार, त्यानुसार योजना हे सारे संकल्प आपल्या मनात सतत येत राहतात. त्याच बरोबर ‘हे आता करावं की नंतर करावं, असं करावं की तसं करावं, आपण करावं की दुस-यांनी करावं, मुख्य म्हणजे करावे की न करावं?’ अशा विचारांच्या लाटा आपल्या मनात अखंड उठत असतात. त्यात नकारात्मक बाजू बहुतेकवेळा निवडली जाते नि प्रत्यक्ष काम एक तर पुढे ढकलली जातात किंवा चक्क टाळली जातात. 

अशा या संकल्प-विकल्पांना जर धनुष्यबाण बनवून ते श्रीरामाच्या हातात दिले की निश्चितपणे कामे केली जातात. मनात संशय, धाकधुक, अस्वस्थता काही उरत नाही हे चित्र दिवसातून अनेकदा वारंवार मनात उभं करायचं नि छान, आनंदात राहायचं. अशी जीवनशैली अर्थातच भावात्मक (सकारात्मक) बनून जाते. अभावात्मक राहत नाही. साहजिकच ती अधिक प्रभावी बनते. आनंदमयी, आनंददायिनी बनते, हीच तर मानसपूजेची फलश्रुती असते प्रचीती असते. 

आनंदाला संकल्प-विकल्पांची जोडी आणखी एका श्लोकात भेटे. ज्या तीन श्लोकांनी बाबांची उपासना संपायची त्यातला अखेरचा श्लोक. तो म्हणून झाल्यावर डोळे मिटून काहीवेळ शांतस्तब्ध बसायचं. हृदयमंदिरातून मनोदेवतेचा त्या प्रार्थनेला हुंकार उमटला की आनंदात उठायचं. पुढचा सारा दिवस आनंदात घालवण्याचा निर्धार करूनच. हा परिपाठ किंवा नित्यपाठ आनंद मोठय़ा आनंदात करायचा. बाबांबरोबर तोही म्हणायचा

विकल्पाचिया मंदिरी दीप नाही।

सदा शुद्ध संकल्प हे आत्मदेही।

यश:श्री सदानंद कल्याणमस्तु।

तथास्तु.. तथास्तु.. तथास्तु.. तथास्तु!

किती खरंय? सतत विचार-प्रतिविचार, उलट-सुलट विचार करणा-या व्यक्तीच्या मनोमंदिरात साधा दिवासुद्धा लागणं अवघड. तिथं कृतींचा, कार्याचा प्रकाश कुठून येणार? ‘तमसो मा ज्योतिगमय’ ही प्रार्थना केवळ शब्दांचे बुडबुडेच ठरणार. मनातला अंधार म्हणजे निराशा, उदासी, खिन्नता, विफलतेची भावना. थोडक्यात नकारात्मकता. याच्या उलट जर मनात चांगल्या विचारांचे, विधायक कल्पनांचे, मंगल कर्मसंकल्पांचे दीप प्रज्वलीत केले तर सर्वाचीच जीवन उजळू निघतील. मग काय निरंतर दिवाळीच! एकूण काय शुभ संकल्प नित्य दिवाळी अन् विकल्प ही आनंदाची राखरांगोळी. दुसरं काय?

टॅग्स :spiritualअध्यात्मिक