शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

गरिबीची नेमकी कारणं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 04:19 IST

खोटे बोलणे, चोरी, उद्धट वागणे, अर्वाच्य बोलणे, दिलेला शब्द न पाळणे, जबाबदारी न स्वीकारणे, थोडक्यात समाधान मानणे अशा अनेक अवगुणांमुळे गरिबीचा उच्चांक वाढतच जातो.

- विजयराज बोधनकरएका प्रसिद्ध लेखकाला कार्यालयीन कामासाठी चुणचुणीत तरुणाची गरज असते. आपल्या प्राध्यापक मित्राला तो हे सांगतो. त्याच्या कॉलेजमध्ये एक गरीब विद्यार्थी असतो. त्याच्या वडिलांचा दारूमुळे मृत्यू झालेला असतो. आई घरकाम करून मुलांचे शिक्षण, घर चालवीत असते. प्राध्यापक त्या मुलाला लेखकाकडे पार्टटाइम नोकरीला पाठवतो. महिना-दीड महिना तो आनंदात काम करतो. गरीब मुलाला या कामातून चार पैसे मिळतात याचा आनंद लेखकाला होतो. लेखनाची आवड असलेला मुलगा अध्येमध्ये त्याने लिहिलेल्या कविता दाखवत असतो. याचा लेखकाला आनंद होतो, पण एक दिवस विचित्र घटना घडते.एके दिवशी मुलगा ऑफिस सुटल्यावर इमारतीखाली उतरतो. लेखकाचे घरही त्याच इमारतीत असते, लेखकाची बायको खिडकीतून बघते. मुलाच्या पाठीवरची बॅग जड सामानाने भरल्यासारखी वाटते. शंका आल्याने ती त्याला घरी बोलावते. बॅग तपासते तेव्हा त्यात ऑफिसमधली महागडी दहा-बारा पुस्तके आढळतात. कसून चौकशी केल्यानंतर तो सांगतो की, मी ही पुस्तके रद्दीत विकून पैसे मिळवतो. आतापर्यंत त्याने लेखकाच्या संग्रहातली बरीच पुस्तके विकलेली असतात. चोरी करून तो मोठा विश्वासघात करतो. त्याला कामावरून काढले जाते. ही बातमी कॉलेजमध्ये पसरते, त्याच्यावर चोर म्हणून शिक्का बसतो. प्राध्यापकाच्या मनातून तो कायमचा उतरतो. खरेतर, त्याला गरिबीतून वैचारिक आणि आर्थिक श्रीमंत होण्याची संधी प्राध्यापक देतात; पण त्याचे कुकर्म आडवे येते.यालाच ‘वैचारिक गरिबी’ म्हणतात. अशा घातक वृत्तीची गरिबी सतत पाठलाग करते. याचा दोष ही माणसे दैवाला देऊन मोकळी होतात. आयुष्यभर गरिबीच्या बाभुळीला खतपाणी घालतात. खोटे बोलणे, चोरी, उद्धट वागणे, अर्वाच्य बोलणे, दिलेला शब्द न पाळणे, जबाबदारी न स्वीकारणे, थोडक्यात समाधान मानणे अशा अनेक अवगुणांमुळे गरिबीचा उच्चांक वाढतच जातो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक