शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

गरिबीची नेमकी कारणं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 04:19 IST

खोटे बोलणे, चोरी, उद्धट वागणे, अर्वाच्य बोलणे, दिलेला शब्द न पाळणे, जबाबदारी न स्वीकारणे, थोडक्यात समाधान मानणे अशा अनेक अवगुणांमुळे गरिबीचा उच्चांक वाढतच जातो.

- विजयराज बोधनकरएका प्रसिद्ध लेखकाला कार्यालयीन कामासाठी चुणचुणीत तरुणाची गरज असते. आपल्या प्राध्यापक मित्राला तो हे सांगतो. त्याच्या कॉलेजमध्ये एक गरीब विद्यार्थी असतो. त्याच्या वडिलांचा दारूमुळे मृत्यू झालेला असतो. आई घरकाम करून मुलांचे शिक्षण, घर चालवीत असते. प्राध्यापक त्या मुलाला लेखकाकडे पार्टटाइम नोकरीला पाठवतो. महिना-दीड महिना तो आनंदात काम करतो. गरीब मुलाला या कामातून चार पैसे मिळतात याचा आनंद लेखकाला होतो. लेखनाची आवड असलेला मुलगा अध्येमध्ये त्याने लिहिलेल्या कविता दाखवत असतो. याचा लेखकाला आनंद होतो, पण एक दिवस विचित्र घटना घडते.एके दिवशी मुलगा ऑफिस सुटल्यावर इमारतीखाली उतरतो. लेखकाचे घरही त्याच इमारतीत असते, लेखकाची बायको खिडकीतून बघते. मुलाच्या पाठीवरची बॅग जड सामानाने भरल्यासारखी वाटते. शंका आल्याने ती त्याला घरी बोलावते. बॅग तपासते तेव्हा त्यात ऑफिसमधली महागडी दहा-बारा पुस्तके आढळतात. कसून चौकशी केल्यानंतर तो सांगतो की, मी ही पुस्तके रद्दीत विकून पैसे मिळवतो. आतापर्यंत त्याने लेखकाच्या संग्रहातली बरीच पुस्तके विकलेली असतात. चोरी करून तो मोठा विश्वासघात करतो. त्याला कामावरून काढले जाते. ही बातमी कॉलेजमध्ये पसरते, त्याच्यावर चोर म्हणून शिक्का बसतो. प्राध्यापकाच्या मनातून तो कायमचा उतरतो. खरेतर, त्याला गरिबीतून वैचारिक आणि आर्थिक श्रीमंत होण्याची संधी प्राध्यापक देतात; पण त्याचे कुकर्म आडवे येते.यालाच ‘वैचारिक गरिबी’ म्हणतात. अशा घातक वृत्तीची गरिबी सतत पाठलाग करते. याचा दोष ही माणसे दैवाला देऊन मोकळी होतात. आयुष्यभर गरिबीच्या बाभुळीला खतपाणी घालतात. खोटे बोलणे, चोरी, उद्धट वागणे, अर्वाच्य बोलणे, दिलेला शब्द न पाळणे, जबाबदारी न स्वीकारणे, थोडक्यात समाधान मानणे अशा अनेक अवगुणांमुळे गरिबीचा उच्चांक वाढतच जातो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक