शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

पुण्योदयाने पाच इंद्रियांची प्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 17:10 IST

मानवाला पुण्योदयाने पाच इंद्रिये प्राप्त झालेली आहेत. त्यामध्ये कान, डोळे, नाक, जीभ व त्वचा सर्व इंद्रिये महत्वाची.

अहमदनगर : मानवाला पुण्योदयाने पाच इंद्रिये प्राप्त झालेली आहेत. त्यामध्ये कान, डोळे, नाक, जीभ व त्वचा सर्व इंद्रिये महत्वाची. पण त्यातल्या त्यात डोळ्यांना प्रमुख स्थान प्रदान केले आहे. डोळ्यांना सतत पाहण्याचे कार्य आहे. परंंतु एकदा जर भगवंताचे दर्शन केले तर डोळ्यांना अन्यत्र कोठेही शांती मिळणार नाही. ज्याने क्षीर समुद्राचे दूध प्राशन केले, त्याला समुद्राचे खारट पाणी पिण्याची इच्छा होत नाही. रत्नप्राप्ती झाल्यानंतर चमकणाऱ्या तुकड्यांकडे कोण आकर्षिक होईल. त्याचप्रमाणे कानांनी संतवचन ऐकल्यास कान पवित्र होतात. आपल्या जीवनाचा कायापालट होतो. आम्रपाली राजनर्तकी असूनही एकदा भगवान बुध्दांची वाणी ऐकली. जीवनात अमूल्य परिवर्तन झाले. संत सौम्यमूर्ती पाहूनच अभिभूत होतात. म्हणतात.. आकृती गुणान्कथयती, चेहरा पाहूनच व्यक्तीच्या गुणांची कल्पना येते. सौम्यता चार प्रकारची सांगितलेली आहे. आकृतीची सौम्यता : चेहरा जर सौम्य असेल तर ती व्यक्ती सर्वप्रीय बनू शकते. जसे श्रेणिक महाराज वनभ्रमणासाठी निघाले असताना उद्यानामध्ये संत दिसतात. त्यांचा शांत, सौम्य चेहरा पाहून आश्चर्यचकीत होतात. स्वभावाची सौम्यता : स्वभावात सौम्यता असावी. उर्मटपणा वा उग्रता नसावी. सौम्य स्वभाव असेल तर सगळे आपले बनू शकतात. वाणीची सौम्यता : मुखातही वाणीची सौम्यता म्हणजे गोडवा असावा. गोडवा असेल तर शत्रुही आपले मित्र बनतात. कटूता असेल तर आपले स्वजन, मित्र सुध्दा शत्रू बनू शकतात. विचारांची सौम्यता : विचारांची सौम्यता म्हणजे सगळ्यांबद्दल मनात शुभविचार असावेत. सर्वांच्या कल्याणाची, कुशलक्षेत्राची भावना असावी. विचार शुध्द असतील तर आपले वर्तनही सौम्य बनेल.- साध्वी सन्मतीजी महाराज.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर