शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

जग विष्णुमय असल्याचे ज्ञान झाले तोच खरा भक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 19:03 IST

सर्व प्राणीमात्रात भगवंत आणि भगवंतांमध्येच सर्व प्राणीमात्रांना जो बघतो तोच खरा भागवत.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी 

श्रीमद् भागवतात वसुदेवाने देवर्षी नारदांना विश्व कल्याण करणारा भागवत धर्म जाणून घेण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारला, त्यावेळी नारदांनी वसुदेवाला राजा जनक व नऊ योगेश्वरांचा  संवाद सांगितला. राजा जनकाने एकदा योगेश्वरांना विचारले महाराज, मनुष्यामध्ये भागवत कोणाला म्हणावे? भगवत् भक्तांचा धर्म कोणता? भगवत् भक्त माणसांशी कसा वागतो? कसा बोलतो? त्याचा स्वभाव कसा असतो? आणि तो कोणत्या लक्षणांमुळे भगवंताला प्रिय होतो..? राजा जनकाच्या या प्रश्नाचे उत्तर देताना हरी नावाचे योगेंद्र राजाला म्हणाले, राजा... सर्व प्राणीमात्रात भगवंत आणि भगवंतांमध्येच सर्व प्राणीमात्रांना जो बघतो तोच खरा भागवत.  दृश्य प्रपंचात ब्रह्म आणि ब्रह्मा, जो दृश्य प्रपंचाला बघतो ना तोच खरा भागवत भक्त. ज्याला हे जग विष्णुमय असल्याचे ज्ञान झाले तोच खरा भक्त समजावा. 

संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी देखील विष्णू भक्ताचे असाधारण धर्मरूप लक्षण सांगताना असेच सांगितले आहे. आप-पर भावरहित आचरण असणं हा खरा भागवत धर्म आहे. योगेश्वरांनी भागवत धर्माचे रहस्य सांगताना भक्ताचे १) प्राकृत भक्त २) मध्यम भक्त ३) उत्तम भक्त असे तीन प्रकारे वर्णन  केले आहे. प्राकृत भक्ताचे वर्णन करताना महर्षी व्यास म्हणाले, जो फक्त मूर्तीची पूजा करतो, भगवत भक्तांची शुश्रूषा करीत नाही, माझीच भक्ती सर्वश्रेष्ठ आहे, माझाच देव, माझाच धर्म सर्वात श्रेष्ठ आहे, असे जो मानतो तो प्राकृत भक्त समजावा. या भक्ताला स्वत:च्या देवाबद्दल, धर्माबद्दल, खूप मोठा अभिनिवेश असतो. इतर देवाबद्दल, धर्माबद्दल त्याच्या मनात असहिष्णुता असते, असा भक्त प्राकृत भक्त समजावा. बहुतांशी अशा प्रकारचे भक्त आज विपुल प्रमाणात आपल्याला दिसतात. आज माणसं तासनतास देवाची पुजा करतात, पारायणं करतात, व्रतवैकल्यं करतात, वारी करतात, पण चालत्या बोलत्या जिवंत माणसांचा तिरस्कार करतात. ज्याला जिवंत माणसावर प्रेम करता येत नाही, तो न दिसणाऱ्या देवावर कसा प्रेम करणार? धर्मबाह्य आचरण देवाला तरी आवडेल का ?

मध्यम भक्तांचे लक्षण सांगताना शास्त्रकार म्हणतात हा भक्त भगवंताची दास्य भक्ती करतो. या भक्ताच्या अंत:करणात भगवंताबद्दल आत्यंतिक प्रेम असते. इश्वर भक्तांबद्दल मैत्रीपूर्ण भाव असतो पण मध्यम भक्तांची भक्ती उदात्त असली तरी व्यापक नाही. कारण अशा भक्तांची भक्ती ही आत्मोद्धाराच्या साधनेनेच चाललेली असते. समाज कल्याणाची किंवा समाज उद्धाराची तळमळ त्यात नसते. ब्रह्मज्ञान मिळवून स्वत:चा उद्धार करतो पण इतर जिवांचा करीत नाही. त्याचे ज्ञान खरे नसून भंडपण आहे असे नाथ महाराजांनी खडसावून सांगितले आहे. वैयिक्तक मोक्षामागे लागलेले योगी, संत महात्मे यांच्यात हाच फार मोठा फरक आहे. जगाला ब्रह्मरूप समजून जगातीलप्राणीमात्रांकडे ब्रह्मभावाने बघणे, हाच खरा भागवत धर्म आहे.इश्वर सर्वत्र भरलेला आहे, या अद्वैत भूमिकेतून भक्तीची साधना झाली तरच आत्मोद्धार आणि विश्वोद्धार होईल म्हणूनच सर्व भूतमात्रांमध्ये इश्वर भाव ठेवून जो भक्ती करतो तोच उत्तम भक्त होय. 

उत्तम भक्तांचे लक्षण सांगताना, श्रीमद् भागवतकार म्हणतात, उत्तम भक्ताच्या चित्ताला राग, द्वेष, इर्षा, मोह, हर्ष, विषाद इत्यादी विकार कधीच शिवत नाहीत.  त्याचे चित्त फक्त श्रीहरीच्याच ठिकाणी स्थिर असते, त्यामुळे कामविकार निर्माण होत नाही. काम नाही म्हणून त्यापासून निर्माण होणारे कर्म नाही. कारण कर्माला कारण असणारे अज्ञानाचे बीजच नष्ट झालेले असते. तो कर्म करून देखील अकर्मीच राहतो. भक्ती साधनेतूनच सर्व भूतमात्रात एक परमेश्वर भरलेला असल्याची प्रचिती त्याला आलेली असते.

(  लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत. भ्रमणध्वनी : 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक