शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

पूर्वसंस्कारांमुळे बनतो स्वभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 19:46 IST

प्रकृती म्हणजे स्वभाव. स्वभाव हा पूर्वसंस्कारामुळे असतो.

प्रकृती म्हणजे स्वभाव. स्वभाव हा पूर्वसंस्कारामुळे असतो. अनेक जन्मांचा संसार, विषयसेवन त्यात, गुणदोष न पाहणे हा स्वभाव असा आहे, की तो जाता जात नाही. कारण म्हणच आहे, स्वभावाला औषध नाही. माणूस कितीही मोठा झाला तरी तो आपला स्वभाव सोडत नाही. त्याची वृत्ती त्याकडेच धाव घेते. आपण ज्या संस्कारातून आलो, तसा त्याचा स्वभाव असतो. अनेक जन्मापासून तो संस्कार आहे.

समजा एखाद्याचा स्वभाव चांगला आहे. हे त्याच्या काही लक्षणावरून आपण जाणतो. एखाद्याची वृत्ती वाईट असेल, पशुप्रमाणे ती व्यक्ती वागत असेल तर आपण सहज म्हणतो, त्याचा स्वभावच तसा आहे. याकरिता पश्वादी वृत्तीचा त्याग करून स्वधर्माकडे आपली मनोभूमी लावावी. कारण स्वधर्म पाळला पाहिजे. आपण आपल्या धर्माप्रमाणे वागले पाहिजे. येथे धर्म शब्दाचा अर्थही व्यापकदृष्टीने घेऊ हा धर्म - म्हणजे कर्तव्य. आपण आपल्या कर्तव्यापासून वंचित राहू नये. आपण आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे. म्हणजे धर्म पाळणे होय.

स्वधर्माचरण हे काही प्रारब्धाचे स्थान नाही. उद्योगाचे आहे. ज्या बऱ्या-वाईट कर्माचे फल स्वर्ग-नरक आहे, असे आपण समजतो. माणसे काही प्रारब्धाला दोष देतात. अरे बाबा प्रारब्ध आपणच बनवतो ना? आपण शुभ-अशुभ, पाप-पुण्य या मार्गाने विचार करावा. आपल्या प्रयत्नाने पापही टळते व पुण्याचरणही करता येते. प्रारब्धावर विसंबून राहू नका. उदा. दशरथ राजाला पुत्रप्राप्ती नव्हती; पण प्रयत्नाने पुत्रकामेष्ठी यज्ञ करून त्यांना संतान झाले. थोडक्यात म्हणजे कर्म चांगले करा. सर्व चांगले होईल. आपली अधोगती आपण करतो किंवा आपली आत्मन्नोती आपणच करतो. सर्व काही मनुष्याच्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणून चांगले कर्तव्य करा. म्हणजे कर्म चांगले होईल. ज्याला ज्याला जे जे सुख अथवा दु:ख प्राप्त होते, ते ते त्याच्या कर्माने त्याला प्राप्त होते. कोणाकडूनही कोणाला सुख अथवा दु:ख प्राप्त होत नाही. ते सर्व त्याच्या कर्मानुसार त्याला प्राप्त होते.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)